शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:12 IST

आसाममधील गुवाहाटीच्या जवळील मेघालयातील डोंगररांगांमध्ये खासी आणि जयंतीया या वंशाच्या आदिवासींची छोटी - छोटी राज्ये होती. त्यातील नोंगखालो राज्याचा ...

आसाममधील गुवाहाटीच्या जवळील मेघालयातील डोंगररांगांमध्ये खासी आणि जयंतीया या वंशाच्या आदिवासींची छोटी - छोटी राज्ये होती. त्यातील नोंगखालो राज्याचा उ-हेन-सिंग या राजाच्या मृत्यूनंतर तिरथसिंह या दहा वर्षांच्या मुलाची निवड राजा म्हणून झाली. लहान वयामुळे आई काक्सान राज्य चालवू लागली. तिरथसिंह या नावाचा उल्लेख उ. तिरोत सिंग असाही केला जातो. १८२७ च्या सुमारास इंग्रजांचे लक्ष आसाम, मेघालय, मणिपूरकडे वळले. १७५७ च्या प्लासी लढाईमुळे बंगाल ताब्यात आला. पूर्वेकडची राज्ये ताब्यात घेतानाच काछार जिंकून सिलचरला आलेल्या इंग्रजांना गुवाहाटीच्या मुख्य विभागाला जोडणारा रस्ता करायचा होता; पण मधल्या डोंगराळ प्रदेशात तिरथसिंहाचे राज्य होते. भूलथापा देत कमांडर स्कॉटने रस्ता बनविण्याची परवानगी मागितली. तरुण तिरथसिंहाने इंग्रजांचा कावा ओळखत ती नाकारली. पण स्कॉटने राजाच्या आईला भेटून परवानगी मिळवत रस्त्याचे काम सुरू केले. प्रदेशातील आदिवासींच्या तक्रारी तिरथसिंहाकडे येऊ लागल्या. इंग्रज रस्त्याच्या नावाखाली प्रदेश ताब्यात घेत खासी लोकांवर जुलूम करत. तिरथसिंहाने ताबडतोब काम थांबवण्याचा हुकूम दिला. त्याला न जुमानता लेफ्टनंट बेंचने खासी पर्वतातील नोग्खालो राज्यावर आक्रमण केले. युद्ध चार वर्षे चालले; पण गनिमी काव्याने तिरथसिंहाच्या सैन्याने इंग्रजांचे मोठे नुकसान केले. राज्य जिंकता न आल्याने इंग्रजांनी प्रजेला भडकावण्याचे प्रयत्न केले. अखेर लोकाग्रहास्तव तिरथसिंह मिल्लोन येथील 'लुम मैडांग' येथे इंग्रजांबरोबर चर्चेला गेला; पण विश्वासघाताने त्यांना कैद करून खटला चालवत आजीवन कारावासासाठी ढाका जेलमध्ये पाठविण्याचे ठरले. मात्र, तिथे एका घरात दोन नोकरांबरोबर नजरकैदेत ठेवलेल्या तिरथसिंह यांचा १८४१ च्या सुमारास नजरकैदेत असतानाच मृत्यू झाला. १८५७ पूर्वी देशात छोटे-मोठे उठाव झाले, त्यात तिरथसिंह यांनी खासी आदिवासींना एकत्र करून दिलेला लढा महत्त्वाचा आहे.