शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:12 IST

आसाममधील गुवाहाटीच्या जवळील मेघालयातील डोंगररांगांमध्ये खासी आणि जयंतीया या वंशाच्या आदिवासींची छोटी - छोटी राज्ये होती. त्यातील नोंगखालो राज्याचा ...

आसाममधील गुवाहाटीच्या जवळील मेघालयातील डोंगररांगांमध्ये खासी आणि जयंतीया या वंशाच्या आदिवासींची छोटी - छोटी राज्ये होती. त्यातील नोंगखालो राज्याचा उ-हेन-सिंग या राजाच्या मृत्यूनंतर तिरथसिंह या दहा वर्षांच्या मुलाची निवड राजा म्हणून झाली. लहान वयामुळे आई काक्सान राज्य चालवू लागली. तिरथसिंह या नावाचा उल्लेख उ. तिरोत सिंग असाही केला जातो. १८२७ च्या सुमारास इंग्रजांचे लक्ष आसाम, मेघालय, मणिपूरकडे वळले. १७५७ च्या प्लासी लढाईमुळे बंगाल ताब्यात आला. पूर्वेकडची राज्ये ताब्यात घेतानाच काछार जिंकून सिलचरला आलेल्या इंग्रजांना गुवाहाटीच्या मुख्य विभागाला जोडणारा रस्ता करायचा होता; पण मधल्या डोंगराळ प्रदेशात तिरथसिंहाचे राज्य होते. भूलथापा देत कमांडर स्कॉटने रस्ता बनविण्याची परवानगी मागितली. तरुण तिरथसिंहाने इंग्रजांचा कावा ओळखत ती नाकारली. पण स्कॉटने राजाच्या आईला भेटून परवानगी मिळवत रस्त्याचे काम सुरू केले. प्रदेशातील आदिवासींच्या तक्रारी तिरथसिंहाकडे येऊ लागल्या. इंग्रज रस्त्याच्या नावाखाली प्रदेश ताब्यात घेत खासी लोकांवर जुलूम करत. तिरथसिंहाने ताबडतोब काम थांबवण्याचा हुकूम दिला. त्याला न जुमानता लेफ्टनंट बेंचने खासी पर्वतातील नोग्खालो राज्यावर आक्रमण केले. युद्ध चार वर्षे चालले; पण गनिमी काव्याने तिरथसिंहाच्या सैन्याने इंग्रजांचे मोठे नुकसान केले. राज्य जिंकता न आल्याने इंग्रजांनी प्रजेला भडकावण्याचे प्रयत्न केले. अखेर लोकाग्रहास्तव तिरथसिंह मिल्लोन येथील 'लुम मैडांग' येथे इंग्रजांबरोबर चर्चेला गेला; पण विश्वासघाताने त्यांना कैद करून खटला चालवत आजीवन कारावासासाठी ढाका जेलमध्ये पाठविण्याचे ठरले. मात्र, तिथे एका घरात दोन नोकरांबरोबर नजरकैदेत ठेवलेल्या तिरथसिंह यांचा १८४१ च्या सुमारास नजरकैदेत असतानाच मृत्यू झाला. १८५७ पूर्वी देशात छोटे-मोठे उठाव झाले, त्यात तिरथसिंह यांनी खासी आदिवासींना एकत्र करून दिलेला लढा महत्त्वाचा आहे.