शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
5
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
6
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
8
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
9
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
10
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
11
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
13
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
14
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
15
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
16
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
17
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
18
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
19
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
20
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन

मुदतवाढीचा सुधारीत प्रस्तावही अर्धवट

By admin | Updated: March 5, 2015 00:22 IST

पालिकेकडून मुख्यसभेत मान्य करण्यात आलेला ठराव गेल्या आठवडयात नगररचना विभागाकडे पाठविला होता.

पुणे : शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारीत विकास आराखडयास राज्यशासनाने मुदतवाढ द्यावी, यासाठी पालिकेकडून मुख्यसभेत मान्य करण्यात आलेला ठराव गेल्या आठवडयात नगररचना विभागाकडे पाठविला होता. मात्र या ठरावासह दिलेली माहिती अपूर्ण असल्याने नगररचना विभागाने मुदतवाढ मागणारा प्रस्ताव पुन्हा पालिकेकडे पाठविला होता. नगररचना विभागाच्या सूचनेनुसार सुधारीत माहिती असलेला प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून बुधवारी नगररचना विभागाकडे पाठविला आहे. यामध्ये निवडणकांमधील आचारसंहितेमुळे पालिकेच्या वाया गेलेल्या दिवसांच्या माहितीचा समावेश आहे. हा विकास आराखडा नियोजन समितीने केलेल्या शिफारशींसह अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. मंजुरीनंतर या आराखड्यामध्ये बदल करून तो प्रसिद्ध करायचा व ७ एप्रिलपर्यंत राज्य शासनाच्या मंजूरीसाठी पाठवावा लागणार आहे. परंतू समितीच्या शिफारशींमुळे झालेल्या बदलांचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाकडून मुदत वाढवून मिळावी, असा प्रस्ताव २० फेब्रुवारीला मंजूर करण्यात आला होता. परंतू यासंदर्भात दिलेल्या उपसूचनेमध्ये त्रुटी राहील्याने २४ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत त्या दुरूस्त करून पुन्हा शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर हा ठराव पालिकेकडून नगररचना विभागाकडे मुदतवाढीच्या मागणीसाठी पाठविण्यात आला. त्यात केवळ वरील दोन्ही निवडणूकांच्या आचारसंहितेचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच त्याबाबत देण्यात आलेली माहितीही अपूर्ण होती. त्यामुळे नगररचना विभागाने या प्रस्तावासंदर्भात पालिकेला पत्र पाठविले. त्यामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कारणास्तव किती कालावधी गेला. मुख्य ठरावाच्या तारखा संदर्भातील स्पष्टीकरण, आदेश, नगर नियोजन समितीच्या सदस्यांची नियुक्ती कशी झाली, अशी कोणतीही कारणे पालिकेने दिली नसल्याने मुदतवाढीसंदर्भात निर्णय होवू शकत नसल्याचे पालिकेला कळविले. त्यानुसार पालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने आज नगररचना विभागाकडून मागण्यात आलेली माहिती पाठविण्यात आली आहे. त्यानुसार, दोन दिवसांत मुदतवाढीवर निर्णय होणे अपेक्षीत आहे. (प्रतिनिधी)४विकास आराखड्यास मुदतवाढ मिळण्यासाठी सर्वच स्तराव प्रशासन तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांकडून हालचाली सुरू आहेत. प्रशासनाकडून नगररचना विभागाकडे याबाबतचे प्रस्ताव पाठविले जात आहेत. मात्र, आधी मुख्यसभेतील ठरावात चुका, त्यानंतर प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या माहितीबाबत अक्षेप यामुळे सर्वच बाबींवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.