शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुदतवाढीचा सुधारीत प्रस्तावही अर्धवट

By admin | Updated: March 5, 2015 00:22 IST

पालिकेकडून मुख्यसभेत मान्य करण्यात आलेला ठराव गेल्या आठवडयात नगररचना विभागाकडे पाठविला होता.

पुणे : शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारीत विकास आराखडयास राज्यशासनाने मुदतवाढ द्यावी, यासाठी पालिकेकडून मुख्यसभेत मान्य करण्यात आलेला ठराव गेल्या आठवडयात नगररचना विभागाकडे पाठविला होता. मात्र या ठरावासह दिलेली माहिती अपूर्ण असल्याने नगररचना विभागाने मुदतवाढ मागणारा प्रस्ताव पुन्हा पालिकेकडे पाठविला होता. नगररचना विभागाच्या सूचनेनुसार सुधारीत माहिती असलेला प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून बुधवारी नगररचना विभागाकडे पाठविला आहे. यामध्ये निवडणकांमधील आचारसंहितेमुळे पालिकेच्या वाया गेलेल्या दिवसांच्या माहितीचा समावेश आहे. हा विकास आराखडा नियोजन समितीने केलेल्या शिफारशींसह अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. मंजुरीनंतर या आराखड्यामध्ये बदल करून तो प्रसिद्ध करायचा व ७ एप्रिलपर्यंत राज्य शासनाच्या मंजूरीसाठी पाठवावा लागणार आहे. परंतू समितीच्या शिफारशींमुळे झालेल्या बदलांचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाकडून मुदत वाढवून मिळावी, असा प्रस्ताव २० फेब्रुवारीला मंजूर करण्यात आला होता. परंतू यासंदर्भात दिलेल्या उपसूचनेमध्ये त्रुटी राहील्याने २४ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत त्या दुरूस्त करून पुन्हा शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर हा ठराव पालिकेकडून नगररचना विभागाकडे मुदतवाढीच्या मागणीसाठी पाठविण्यात आला. त्यात केवळ वरील दोन्ही निवडणूकांच्या आचारसंहितेचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच त्याबाबत देण्यात आलेली माहितीही अपूर्ण होती. त्यामुळे नगररचना विभागाने या प्रस्तावासंदर्भात पालिकेला पत्र पाठविले. त्यामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कारणास्तव किती कालावधी गेला. मुख्य ठरावाच्या तारखा संदर्भातील स्पष्टीकरण, आदेश, नगर नियोजन समितीच्या सदस्यांची नियुक्ती कशी झाली, अशी कोणतीही कारणे पालिकेने दिली नसल्याने मुदतवाढीसंदर्भात निर्णय होवू शकत नसल्याचे पालिकेला कळविले. त्यानुसार पालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने आज नगररचना विभागाकडून मागण्यात आलेली माहिती पाठविण्यात आली आहे. त्यानुसार, दोन दिवसांत मुदतवाढीवर निर्णय होणे अपेक्षीत आहे. (प्रतिनिधी)४विकास आराखड्यास मुदतवाढ मिळण्यासाठी सर्वच स्तराव प्रशासन तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांकडून हालचाली सुरू आहेत. प्रशासनाकडून नगररचना विभागाकडे याबाबतचे प्रस्ताव पाठविले जात आहेत. मात्र, आधी मुख्यसभेतील ठरावात चुका, त्यानंतर प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या माहितीबाबत अक्षेप यामुळे सर्वच बाबींवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.