शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कात्रज डोंगरफोडीकडे महसूल विभागाचा ‘अर्थ’पूर्ण काणाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:48 IST

या भागातील सर्व डोंगरफोडीचे पुन्हा पंचनामे तेही जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या उपस्थितीत करून घेणे अपेक्षित आहे.

कात्रज : एकीकडे एखाद्या गरीब व्यक्तीने आपल्या आयुष्याची सर्व जमापुंजी एकत्र करून डोंगरमाथ्यावर घेतलेल्या एक - अर्धा गुंठ्यावरील बांधकामांना तातडीने नोटीस जाते, त्याचे बांधकाम पाडले जाते. मात्र ऐतिहासिक वारसा असलेल्या दक्षिण पुण्याची डोंगराची कमान गोडाऊन व हॉटेलचालकाने अक्षरश: पोखरून काढली तरी याकडे तहसील कार्यालयांच्या अधिकाऱ्यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

या भागातील सर्व डोंगरफोडीचे पुन्हा पंचनामे तेही जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या उपस्थितीत करून घेणे अपेक्षित आहे. कारण येथील सर्व पंचनामेच संशयाच्या भोवºयात अडकले आहेत. तसेच विनापरवाना डोंगरफोड करणाºयांवर गुन्हे दाखल झाले तरच या भागातील डोंगरफोड थांबेल अन्यथा पुढच्या पिढीला या भागात कधी कात्रजचे डोंगर होते हेच माहीत होणार नाही.

या डोंगरफोडीमुळे याच डोंगराच्यावर राहणारे नागरिकदेखील जीव मुठीत घेऊन आहेत. कारण खालून डोंगर पोखरले गेल्यामुळे कुठल्याही क्षणी विपरीत घटना या भागात घडू शकते.तसेच रत्याच्या दुसºया बाजूला असलेल्या गुजरवाडी, मांगडेवाडी, कात्रजचा काही भाग या ठिकाणीही मोठा पाऊस आला तर माळीणची किंवा शिंदेवाडीची पुनरावृत्ती होऊ शकते.या भागातील सर्व्हे नंबरची पाहणी करून येथील डोंगर फोडलेले सर्व खरेदी खताचे व्यवहार थांबवले पाहिजेत. कारण डोंगर फोडून प्लॉटिंगचे व्यवहार या पुणे-सातारा महामार्गावर होत आहेत. काही दिवसांपूर्वी कात्रज टेकडीवर कारवाई झाली. अनेकांची घरे पाडण्यात आली.मात्र या अधिकाºयांना या राष्ट्रीय महामार्गावर चाललेली डोंगराची कत्तल दिसली नाही. पुणे शहर मेट्रो शहर होत आहे. मात्र पुण्याचे खरे सौंदर्य व पुण्याचा इतिहास सामावून घेणाºया या टेकड्याच आहेत. याच्यावरच घाला घातला जात असेल तर हा पुणेकरांचा अधिकाºयांकडून होणारा विश्वासघात आहे.

फक्त वरिष्ठ अधिकाºयांना दाखवण्यापुरती कारवाई करायची, असा प्रकार या भागात सुरू आहे. येथे कारवाई करणाºया अधिकाºयाला व डोंगर पोखरणाºया व्यक्तीला वाटेल तेवढा दंड आकारायचा व काही दिवस काम थांबवायचे. त्यानंतर पुन्हा डोंगरफोड सुरूच. जर नियमानुसार दंडवसुली झाली तर कोट्यवधीचा महसूल होईल गोळा.

टॅग्स :katrajकात्रज