शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘स्मार्ट ग्राम’चा निकाल लागेना, राजकीय दबाव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:26 IST

राज्य शासनाच्या स्मार्ट ग्रामसाठी पुणे जिल्ह्यातील तीन गावांची एप्रिल महिन्यात तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर १ मे रोजी जिल्हास्तरावरील ‘स्मार्ट ग्राम’ चा निकाल जिल्हा परिषदेने जाहीर करणे अपेक्षित होते. परंतु स्पर्धेत असलेल्या एका नेत्याच्या गावाची निवड करण्यासाठी प्रशासनावर प्रचंड दबाव येत असल्याने तब्बल तीन महिने झाले निकालच जाहीर केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : राज्य शासनाच्या स्मार्ट ग्रामसाठी पुणे जिल्ह्यातील तीन गावांची एप्रिल महिन्यात तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर १ मे रोजी जिल्हास्तरावरील ‘स्मार्ट ग्राम’ चा निकाल जिल्हा परिषदेने जाहीर करणे अपेक्षित होते. परंतु स्पर्धेत असलेल्या एका नेत्याच्या गावाची निवड करण्यासाठी प्रशासनावर प्रचंड दबाव येत असल्याने तब्बल तीन महिने झाले निकालच जाहीर केला नसल्याची माहिती समोर आली आहे.पर्यावरण संतुलित ग्राम योजनेतील निकष बदलल्याने नंतर राज्य सरकारने २०१६ मध्ये स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रथम प्रत्येत तालुक्यात एका गावाची तालुकास्तराव ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून निवड करण्यात आली. पुणे जिल्ह्यात तेरा तालुक्यात १३ गावांना स्मार्ट ग्राम म्हणून घोषित करण्यात आले. या सर्व गावांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. यात दुस-या टप्प्यात तालुकास्तरावरील गावांमधून एका गावांची जिल्हास्तरावरील ‘स्मार्ट गाव’ म्हणून निवड करण्यात येणार आहे. या गावाला तब्बल ४० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.जिल्हास्तरावरील ‘स्मार्ट ग्राम’ साठी तीन गावांचे प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत. यामध्ये हवेली तालुक्यातील सांगरुण, जुन्नरमधील टिकेकरवाडी आणि शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडी या गावांचा सामावेश आहे. या गावांची तापसणी व निवड करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने या तिन्ही गावांची तपासणी करण्यात आली. पंरतु तीन महिने झाले अद्यापही निवड समितीने गावांचा निकाल जाहीर केलेला नाही. याबाब जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी ‘स्मार्ट ग्राम’ चा त्वरीत निकाल जाहीर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या आहेत.स्मार्ट ग्रामसाठी असे असेल गुणांकनस्वच्छतेसाठी (वैयक्तिक, सार्वजनिक शौचालये, पाणी गुणवत्ता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन) २० गुण, व्यवस्थापनासाठी (पायाभूत सुविधा, शिक्षण सुविधा, केंद्र व राज्याच्या योजनांची अंमलबजावणी, प्लॉस्टिक बंदी, बचत गट) २५ गुण, दायित्वासाठी (करवसुली, पाणीपुरवठा, वीज बिलांचा नियमित भरणा, अपंगांवरील खर्च, लेखा परीक्षण पूर्तता, ग्रामसभा आयोजन, लेखा पूर्तता) २० गुण, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरणासाठी (एलईडी दिवे, सौर दिव्यांचा वापर, बायोगॅस यंत्रणा, कृषी लागवड, जलसंधारण) २० गुण आणि पारदर्शकता व तंत्रज्ञानास (ग्रामपंचायत अभिलेखांचे संगणकीकरण, ई-सुविधा, १०० टक्?के आधार नोंदणी, ग्रामंपचायतीचे संकेतस्थळ, संगणकीय वापर) १५ गुण असे १०० गुणांकन होईल.