शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

‘नाटा’चा निकाल वादाच्या भोवऱ्यात, अनेकांनी घेतला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 05:45 IST

देशातील वास्तुशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्टरचा (नाटा) निकाल वादाच्या भोव-यात अडकला आहे.

पुणे : देशातील वास्तुशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्टरचा (नाटा) निकाल वादाच्या भोव-यात अडकला आहे. निकाल जाहीर करण्यापासून ते विद्यार्थ्यांना रेखाचित्र (ड्रॉर्इंग) विषयात मिळालेल्या कमी गुणांवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. काही विद्यार्थ्यांना तर शून्य गुण मिळाले आहेत. यावर वास्तुशास्त्र परिषदेच्या काही सदस्यांनीही नाराजी व्यक्तकेली आहे.मागील काही वर्षांपासून देशातील वास्तुशास्त्र महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी परिषदेकडून ‘नाटा’ ही परीक्षा घेतली जाते. यावर्षी ही परीक्षा दि.२९ एप्रिल रोजी झाली. या परीक्षेला देशभरातून ४९ हजार ३९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४४ हजार २६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून एकूण ३० हजार ५६० विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा अंतिम निकाल ‘नाटा’ संकेतस्थळावर दि.६ जून रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, त्यापूर्वी तीन वेळा हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. पहिल्यांदा दि. १७ मे रोजी गणित व सामान्य बुद्धिमत्ता पेपरचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर दोन काही प्रश्नांवर हरकती आल्याने पुन्हा सुधारित निकाल दि. २४ मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर दि.४ जून रोजी रेखाचित्र पेपरचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला.या निकालानंतर अनेक विद्यार्थी व पालकांना धक्का बसला. काही विद्यार्थ्यांना रेखाचित्र पेपरला शून्य गुण मिळाले आहेत. तर काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा खूप कमी गुण मिळाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी निर्माण झाली. याबाबत काही विद्यार्थ्यांनी परिषदेकडे तक्रारी करूनही त्यात सुधारणा झालेली नाही. बुधवारी (दि.६) परिषदेने अंतिम निकाल जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. भारतीय कला प्रसारणी सभेच्या वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य पुष्कर कानविंदे म्हणाले, ‘काही विद्यार्थ्यांच्या शून्य गुण मिळाल्याच्या तक्रारी आहेत. त्यांनी या पेपर सोडविला असेल तर त्यांना शून्य गुण मिळू शकत नाहीत.’ काही पालकांनीही कानविंदे यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. ‘रेखाचित्र या पेपरला शून्य गुण मिळणे बुद्धिला पटत नाही. तसेच माझ्या मुलीलाही अपेक्षेपेक्षा ३० गुण कमी मिळाले आहेत. त्यामुळे या परीक्षेत गोंधळ झाल्याचे स्पष्ट होते,’ असे एका पालकांनी सांगितले.पहिल्यांदाच एवढा गोंधळमागील आठ वर्षांपासून परिषदेकडून ‘नाटा’ ही परीक्षा घेतली जात आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच असा गोंधळ झाला आहे, अशी नाराजी परिषदेतील एका सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. शून्य गुण मिळणे हा खूप गंभीर विषय आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे परिषदेने याबाबत तातडीने समिती स्थापन करून चौकशीचा निर्णय घ्यायला हवा. याबाबत परिषदेने बैठक बोलवावी. त्यामध्ये हा मुद्दा उचलून धरू, असेही संबंधित सदस्याने स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणे