शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

बहुतेक शाळांचा निकाल शंभर टक्के

By admin | Updated: May 29, 2017 02:44 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता बारावीच्या परीक्षेचा शहरातील बहुतेक सीबीएसई शाळांचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता बारावीच्या परीक्षेचा शहरातील बहुतेक सीबीएसई शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शहरातील शाळांकडून प्राप्त निकालावरून वानवडी येथील आर्मी पब्लिक स्कूलमधील नंदिनी देसीराजू ही विद्यार्थीनी ९८.२ टक्के गुणांसह शहरांत पहिली तर दिल्ली पब्लिक स्कूलमधील अक्षत चुघ हा ९८ टक्के गुण मिळवून दुसरा आल्याची शक्यता आहे. ‘सीबीएसई’मार्फत रविवारी इयत्ता बारावीचा निकाल आॅनलाईन जाहीर केला. निकालामध्ये देशात यंदाही मुलींनी बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९.५ने अधिक आहे. देशात एकूण ८७. ५० टक्के मुली तर ७८ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहे. देशभरातील हा कल पुण्यातही दिसून येत आहे. शहरात मानसनिती शाखेतील नंदिनी राजू हिला सर्वाधिक ९८.२ टक्के गुण मिळाल्याचे दिसून येते. त्याखालोखाल ९८ टक्के गुण मिळविलेला अक्षत हा जेईई (मुख्य) परीक्षेत महाराष्ट्रात पहिला तर देशात सातवा आला होता. औंध येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमधील विज्ञान शाखेतील रोहित सहस्त्रबुद्धे तर वाणिज्य शाखेतील इशा धर्मानी यांनी ९७.४ टक्के गुण मिळवत शहरात तिसरा क्रमांक मिळविल्याचे दिसते.दिल्ली पब्लिक स्कूल शाळेचा निकाल १०० टक्के लागला. शाळेतील १२६ विद्यार्थ्यांपैकी ७३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. शाळेतील अक्षत चुघ याने ९८ टक्के गुण मिळवित शाळेत पहिला क्रमांक पटकावला. त्याला गणित आणि संगणकशास्त्र या दोन्ही विषयांत १०० गुण मिळाले आहेत. विज्ञान शाखेत शिवांग दलाल (९५.८ टक्के) आणि समृद्धी बोथरा (९५.६ टक्के) यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. शाळेमध्ये वाणिज्य विज्ञान शाखेतून तनया गुप्ता (९६ टक्के) ही पहिली आली आहे. तर अर्जुन खुराणा (९५.६ टक्के) आणि यतीन आदित्य ध्रिंगा (९४.८ टक्के) हे अनुक्रमे दुसरे व तिसरे आले. मानसनिती या शाखेमधून एम. व्ही. संप्रिती (९४.६ टक्के), सुखमणी माल्ही (९४ टक्के) आणि वनजा तुलसी शेट्टी (९३.८ टक्के) या तिघी अनुक्रमे पहिल्या तीन टॉपर ठरल्या. औंध येथील डीएव्ही पब्लीक स्कुलमधील ६७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.1 वानवडी येथील आर्मी पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण ३०५ विद्यार्थ्यांपैकी २२ जणांना ९५ टक्क्यांहून अधिक तर ५१ जणांना ९० ते ९५ टक्के गुण मिळाले. अमोघ रत्नपारखी याने विज्ञान शाखेत ९७.२ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर वाणिज्य शाखेत पौर्णिमा जोसेफ ही विद्यार्थीनी ९५.४ टक्के गुण मिळवून पहिली आली. 2खडकी येथील आर्मी पब्लिक स्कूलचा निकालही शंभर टक्के लागला असून विज्ञान शाखेत किर्ती ही विद्यार्थीनी ९५.४ टक्के गुण मिळवून पहिली आली. तर तिस्ता सिंग (९४ टक्के) आणि अस्मिता सेन (९४.६ टक्के) यांनी अनुक्रमे वाणिज्य व मानसनिती या शाखेत प्रथम क्रमांक मिळविला.3बाणेर येथील आॅर्चिड शाळेमध्ये श्री दिव्य श्रेया गांगुला हा विद्यार्थी ९३ टक्के गुणांसह प्रथम आला. तर राघव अय्यंगार (९१.२ टक्के) आणि शुभंकर गायकवाड (९० टक्के) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.२३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुणवानवडी येथील सिटी इंटरनॅशनल स्कुलचा निकाल ९७.५ टक्के लागला असून श्रमोना रॉय हा ९७.२ टक्के मिळवून पहिला आला आहे. तर त्याखालोखाल शामसुंदर गौड (९५.६ टक्के) आणि यु. प्रतिक्षा (९५.४ टक्के) यांचा क्रमांक लागला. शाळेतील २३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले.संस्कृती शाळेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. शाळेतील ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले असून ७० टक्के विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना ६८ टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत. निशांत रमण या विद्यार्थ्याने ९६ टक्के गुण मिळवत पहिला येण्याचा मान मिळवला. तर माहिक मिलिंद जोशी हिला (पीसीबी) ९५.३ टक्के गुण मिळाले आहेत.