शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

विषयाचा अभ्यास करून पुस्तक लिहिणाऱ्यांचा आदर केला पाहिजे - न्यायमूर्ती अभय ओक

By नम्रता फडणीस | Updated: December 2, 2023 17:54 IST

पुणे बार असोसिएशनच्या वतीने एस.पी देव यांनी लिहिलेल्या 'न्यायशास्त्र' (प्राचीन हिंदू न्यायपद्धतीसह) या पुस्तकाचे प्रकाशन न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते झाले...

पुणे : आजच्या काळात एखादी व्यक्ती विषयाचा अभ्यास करून पुस्तक लिहिते, त्यावर आपली मते मांडते. तेव्हा त्यांचा आदर केला पाहिजे. राज्य घटनेच्या कलम २१ नुसार प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार आहे मग ती चुकीची मतं का असेना. त्या व्यक्तीला जे वाटते ते तो लिहितो आणि मांडतो, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले.

पुणे बार असोसिएशनच्या वतीने अँड  एस.पी देव यांनी लिहिलेल्या 'न्यायशास्त्र' (प्राचीन हिंदू न्यायपद्धतीसह) या पुस्तकाचे प्रकाशन न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीश राजेंद्र अवचट, मुंबई उच्च न्यायालय न्यायधीश शाम चांडक, प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. पी. नांदेडकर, महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशन उपाध्यक्ष राजेंद्र उमप तसेच लेखक अँड एस.पी देव उपस्थित होते.

न्यायमूर्ती अभय ओक म्हणाले, मी वीस वर्ष या क्षेत्रात आहे. आपल्याकडे कुणी केस घेऊ आल्यानंतर काही वकील कायद्याचा अभ्यास करतात. पण कितीतरी वकील असेही आहेत जे खटला नसतानाही विविध कायद्यांचा अभ्यास करत असतात. त्यामुळे हे नुसते पुस्तक नाही तर कायद्याचे विवेचन आहे. कायदा म्हणजे काय? त्याचा उहापोह पुस्तकात आहे. त्यांनी कटिंग पेस्टींग जॉब केलेला नाही. त्यांनी ग्रंथ वाचले . मेहनत आणि अभ्यास करून त्यांनी पुस्तक लिहिले हे नक्कीच कौतुकास्पद आहे. एखादी व्यक्ती विषयाचा अभ्यास करून विचार करून पुस्तक लिहिते, त्यावर आपली मते मांडते. तेव्हा त्याचा आदर केला पाहिजे. कुठलीही व्यवस्था मग ती राज्यव्यवस्था असो की न्यायव्यवस्था. कोणतीही व्यवस्था ही आदर्श नसते. त्यात दोष असतातच. सतराव्या शतकातला इतिहास पाहिला तर न्यायव्यवस्था मागासलेली होती, राजाच्या हुकुमानुसार ती चालविली जायची. ती न्यायव्यवस्था स्वतंत्र नव्हती. त्यामुळे त्या न्यायव्यस्थेला आदर्श म्हणता येणार नाही. महाराष्ट्रात आदर्श व आधुनिक व्यवस्था आणण्याचा पहिला प्रयत्न छञपती शाहूमहाराज आणि त्यानंतर ब्रिटीशांनी केला, असेही न्यायमूर्ती ओक यांनी सांगितले.

न्यायाधीश शाम चांडक आणि के.पी नांदेडकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे यांनी प्रास्ताविक केले. एस.पी देव यांनी पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली.

... बरं झालं तेव्हा न्यायाधीश नव्हतोप्राचीन काळातील कायदा सांगतो की एखाद्या न्यायाधीशाने चुकीचा निर्णय दिला तर तो गुन्हा होऊ शकतो. त्यामुळे बरं झालं तेव्हा न्यायाधीश नव्हतो, अशी मिश्कील टिप्पणी न्यायमूर्ती अभय ओक यांनी केली.

एक किंवा दोन हजार वर्षांपूर्वी चांगल्या गोष्टी होत्या. पण जुनं ते सोन म्हणणं पटत नाही. जुन्यातले चांगले जरूर घ्यावे पण सगळे चांगलेच असते असे नाही. आजची न्यायव्यवस्था चांगली आहे असे नाही. त्यात दोष देखील आहेत. जुन्याचा विचार करताना आधुनिकतेची कास धरली पाहिजे- अभय ओक, न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालय