शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जनसमुदायाच्या आदरायुक्त भावनेने डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला विविध संस्था, दल, संघटना आणि राजकीय नेते ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला विविध संस्था, दल, संघटना आणि राजकीय नेते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पुतळा परिसरात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत उपस्थित होते. दरवर्षी अतिशय उत्साहात जनसागर दिसून येत असे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून तुरळक गर्दीच्या स्वरूपात अभिवादन केले. नागरिकांनी मेणबत्ती लावून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. तर काहींनी पुष्पहार अर्पण करूनही अभिवादन केले. नागरिकांनी फोटो काढण्याचा आनंदही लुटला. पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे बाहेरच्या परिसरात वाहतूककोंडी झाली नाही. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांनी पोलिसांना सहकार्य केल्याचे दिसून आले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पोलीसही या शिबिरात सहभागी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

----

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सर्व समाज एकत्र यावा. समाजाचे तुकडे होऊ नयेत. बाबासाहेब कधीही थांबले नाहीत. त्यांनी नेहमी अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्याचप्रमाणे आताही दलित आणि कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देत राहू.

प्रकाश साळवे, पुणे शहराध्यक्ष, दलित पँथर

----

काही नागरीक संविधानासंदर्भात अज्ञान राहिलेले आहेत. सर्व जाती धर्माचा विचार करूनच बाबासाहेबांनी संविधान लिहिले आहे. सर्वांनी समानतेने वागायला हवे.

- सुखदेव सोनवणे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, दलित पँथर

---

बाबासाहेबांना आदरांजली वाहताना शब्द आणि सुमन यापेक्षा कृतीतून काहीतरी होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचू शकतात. हा रक्तदान शिबीर भरवण्यामागचा हेतू आहे.

-उमेश चव्हाण, अध्यक्ष,रुग्ण हक्क परिषद

.------

आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

चंद्रकांत पाटील म्हणाले,

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन दिल्ली पुरते मर्यादित राहणार नाही असे विधान शरद पवारांनी केले आहे. परंतु, काही झाले तरी कायदा रद्द होणार नाही. त्यामध्ये फक्त बदल केला जाईल. तसेच सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा तयार केला आहे. त्या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली. कायदा होण्याअगोदर असे काही नव्हते. प्रश्न फक्त एमएसपीचा होता. तो केंद्र सरकार ऑन पेपर एम एसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आम्ही आंदोलन करणार, भारत बंद करणार याला काही अर्थ नाही. देशात केलेल्या कृषी कायद्यावरून विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी सर्वांना शुभेच्छा आहेत.