शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

जनसमुदायाच्या आदरायुक्त भावनेने डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला विविध संस्था, दल, संघटना आणि राजकीय नेते ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला विविध संस्था, दल, संघटना आणि राजकीय नेते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पुतळा परिसरात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत उपस्थित होते. दरवर्षी अतिशय उत्साहात जनसागर दिसून येत असे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून तुरळक गर्दीच्या स्वरूपात अभिवादन केले. नागरिकांनी मेणबत्ती लावून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. तर काहींनी पुष्पहार अर्पण करूनही अभिवादन केले. नागरिकांनी फोटो काढण्याचा आनंदही लुटला. पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे बाहेरच्या परिसरात वाहतूककोंडी झाली नाही. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांनी पोलिसांना सहकार्य केल्याचे दिसून आले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पोलीसही या शिबिरात सहभागी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

----

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सर्व समाज एकत्र यावा. समाजाचे तुकडे होऊ नयेत. बाबासाहेब कधीही थांबले नाहीत. त्यांनी नेहमी अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्याचप्रमाणे आताही दलित आणि कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देत राहू.

प्रकाश साळवे, पुणे शहराध्यक्ष, दलित पँथर

----

काही नागरीक संविधानासंदर्भात अज्ञान राहिलेले आहेत. सर्व जाती धर्माचा विचार करूनच बाबासाहेबांनी संविधान लिहिले आहे. सर्वांनी समानतेने वागायला हवे.

- सुखदेव सोनवणे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, दलित पँथर

---

बाबासाहेबांना आदरांजली वाहताना शब्द आणि सुमन यापेक्षा कृतीतून काहीतरी होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचू शकतात. हा रक्तदान शिबीर भरवण्यामागचा हेतू आहे.

-उमेश चव्हाण, अध्यक्ष,रुग्ण हक्क परिषद

.------

आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

चंद्रकांत पाटील म्हणाले,

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन दिल्ली पुरते मर्यादित राहणार नाही असे विधान शरद पवारांनी केले आहे. परंतु, काही झाले तरी कायदा रद्द होणार नाही. त्यामध्ये फक्त बदल केला जाईल. तसेच सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा तयार केला आहे. त्या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली. कायदा होण्याअगोदर असे काही नव्हते. प्रश्न फक्त एमएसपीचा होता. तो केंद्र सरकार ऑन पेपर एम एसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आम्ही आंदोलन करणार, भारत बंद करणार याला काही अर्थ नाही. देशात केलेल्या कृषी कायद्यावरून विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी सर्वांना शुभेच्छा आहेत.