शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अरण्येश्वरच्या टांगेवाला कॉलनीतील रहिवाशांना मिळणार हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:12 IST

पुणे : मागील दोन वर्षांपासून पुराचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या अरण्येश्वर येथील टांगेवला कॉलनीचे पुनर्वसन होणार आहे. ही वसाहत झोपडपट्टी ...

पुणे : मागील दोन वर्षांपासून पुराचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या अरण्येश्वर येथील टांगेवला कॉलनीचे पुनर्वसन होणार आहे. ही वसाहत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. याबाबतची पूर्वसूचना काढण्यात आली असून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्याची माहिती स्थानिक नगरसेविका अश्‍विनी कदम यांनी दिली.

सहकारनगर येथील अरण्येश्वर परिसरात नाल्याला अगदी चिकटून असलेल्या या वसाहतीमध्ये दोन वर्षांपूर्वी २५ सप्टेंबर २०१९ रोजी आलेल्या पुरामुळे वाताहत झाली होती. सात जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर, घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. हातावरचे पोट असलेल्या रहिवाशांच्या या वसाहतीच्या पुनर्वसनाची मागणी नगरसेविका कदम यांच्यासह स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासन तसेच एसआरएकडे केली होती. कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वारंवार याबाबत पाठपुरावा केला होता.

एसआरए आणि पालिकेच्या झालेल्या बैठकांमध्ये पुनर्वसनाबाबत विचार झाला. मान्यतेच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर एसआरएकडून ही जागा पुनर्वसन क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी ही वसाहत स्थलांतरित केली जाणार असल्याचे नगरसेविका कदम यांनी सांगितले.

-----

दहा वर्षांनंतर पुनर्वसनाचा प्रश्न लागणार मार्गी

एसआरएने घेतलेल्या निर्णयामुळे दहा वर्षांनंतर पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. पुनर्विकासासाठी विकसकाने एसआरएकडे प्रस्तावही सादर केलेला आहे.