शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पिण्यासाठी धरणे राखीव

By admin | Updated: August 23, 2015 04:16 IST

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच प्राधान्य

पुणे : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच प्राधान्य देऊन राखीव ठेवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे स्पष्ट केले. दरम्यान, हाताशी आलेले खरिपाचे पीक वाया जाऊ नये यासाठी शेवटचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.जिल्ह्यात धरणांतील पाणी साठ्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या धरणांमध्ये आलेल्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी बापट यांनी संबंधित सर्व लोकप्रतिनिधीच्या उपस्थित तातडीने कालवा समितीची बैठक घेतली. बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, दोन्ही महापालिकांचे महापौर, आयुक्त, संबंधित सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. या वेळी जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुठा खोऱ्यात ४१ टक्के, नीरा खोऱ्यात १३ टक्के, पवना प्रकल्पात ३ टक्के आणि कुकडी खोऱ्यात तब्बल ५६ टक्के पाणीसाठ्यात तूट असल्याचे निदर्शनास आणून दिले. पावसाची हीच स्थिती कायम राहिल्यास आगामी पावसाळ््यापर्यंत म्हणजे १५ जुलै २०१६ पर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन सर्व पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच पिण्याचे पाणीदेखील काटकसरीने वापर करून पाणीवापरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध आणण्याची आवश्यकता असल्याचे बापट यांनी सांगितले.बापट यांनी सांगितले, की पावसाचे नैसर्गिक संकट लक्षात घेता पाणीवाटप करताना शहरी-ग्रामीण वाद न करता शेतकरी, उद्योग आणि पिण्यासाठी पाणी या सर्वांचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार सध्या हाताशी आलेले खरिपाच्या पिकासाठी शेवटचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन सुरू असताना कॅनॉल लगतच्या विहिरी व साठवण तलाव भरून घेणे, मोठ्या प्रमाणात कॅनॉल दुरुस्ती करणे, बेकायदा पाणी उपशावर कारवाई करण्याचे आदेश बापट यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने जलसंपदाच्या विभागाने भरारी पथकांची नियुक्ती करून कारवाई चे आदेशही बापट यांनी दिले. (प्रतिनिधी)कृत्रिम पावसाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा राज्यात विविध ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग सुरू असून, सध्या पुण्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुण्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.