शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन केंद्र उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनिती, प्रशासन, आणि त्यांच्या जीवनातील घटनांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनिती, प्रशासन, आणि त्यांच्या जीवनातील घटनांचा आढावा घेणारा एक अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याचाच पुढील टप्पा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर संशोधन करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीमध्ये संशोधन केंद्र आणि जगभरातील सर्वोत्तम ग्रंथालयाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पुण्यात केली.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे लिखित ‘माती पंख आणि आकाश’ या पुस्तकाला गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानिमित्त डॉ. मुळे यांचा सत्कार सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी सामंत यांनी रत्नागिरीत शिवाजी महाराज यांच्यावर संशोधन करता येईल, असे केंद्र उभारणार असल्याचे सांगितले. संवाद पुणे तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, सचिन ईटकर आदी या वेळी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, रत्नागिरीतील संशोधन केंद्राच्या ठिकाणी जागतिक दर्जाचे भव्य ग्रंथालय उभारण्यात येणार असून शिवाजी महाराजांसह महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासाची पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध होणार आहेत,

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, डॉ. मुळे यांनी यशाच्या माध्यमातून आकाशात अनेक भराऱ्या घेतल्या तरीही त्यांनी मातीशी नाळ तुटू दिली नाही. संधी मागून मिळत नाही ती खेचून आणावी लागते असे काम त्यांनी केले आहे. साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून लवकरच प्रबोधनकार ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रबोधन या नियतकालिकाच्या शंभर अंकांच्या संचाचे प्रकाशन करण्यात येणार

सत्काराला उत्तर देताना डॉ. मुळे म्हणाले, दिल्लीत महाराष्ट्र झळकला पाहिजे, ही आपली अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. यशासाठी शंभर पावले टाकण्याची प्रतिज्ञा केली जाते पण शंभरावे पाऊल टाकताना मराठी तरुण अडखळतो. यामुळेच मराठी माणूस मागे राहिला ही बोचरी जाणीव आहे. महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाय हवी, राजकारण वाईट नाही, सगळ्या चांगल्या व्यक्तींनी राजकारणात जरूर यावे. समाजपरिवर्तन झाले पाहिजे, निवृत्ती ही प्रवृत्ती व्हावी आणि रिटायरमेंट ही रि-अटायरमेंट असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सावनी विनिता यांनी सूत्रसंचालन केले तर निकिता मोघे यांनी आभार मानले.

----------------------