शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन केंद्र उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनिती, प्रशासन, आणि त्यांच्या जीवनातील घटनांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनिती, प्रशासन, आणि त्यांच्या जीवनातील घटनांचा आढावा घेणारा एक अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याचाच पुढील टप्पा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर संशोधन करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीमध्ये संशोधन केंद्र आणि जगभरातील सर्वोत्तम ग्रंथालयाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पुण्यात केली.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे लिखित ‘माती पंख आणि आकाश’ या पुस्तकाला गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानिमित्त डॉ. मुळे यांचा सत्कार सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी सामंत यांनी रत्नागिरीत शिवाजी महाराज यांच्यावर संशोधन करता येईल, असे केंद्र उभारणार असल्याचे सांगितले. संवाद पुणे तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, सचिन ईटकर आदी या वेळी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, रत्नागिरीतील संशोधन केंद्राच्या ठिकाणी जागतिक दर्जाचे भव्य ग्रंथालय उभारण्यात येणार असून शिवाजी महाराजांसह महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासाची पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध होणार आहेत,

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, डॉ. मुळे यांनी यशाच्या माध्यमातून आकाशात अनेक भराऱ्या घेतल्या तरीही त्यांनी मातीशी नाळ तुटू दिली नाही. संधी मागून मिळत नाही ती खेचून आणावी लागते असे काम त्यांनी केले आहे. साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून लवकरच प्रबोधनकार ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रबोधन या नियतकालिकाच्या शंभर अंकांच्या संचाचे प्रकाशन करण्यात येणार

सत्काराला उत्तर देताना डॉ. मुळे म्हणाले, दिल्लीत महाराष्ट्र झळकला पाहिजे, ही आपली अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. यशासाठी शंभर पावले टाकण्याची प्रतिज्ञा केली जाते पण शंभरावे पाऊल टाकताना मराठी तरुण अडखळतो. यामुळेच मराठी माणूस मागे राहिला ही बोचरी जाणीव आहे. महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाय हवी, राजकारण वाईट नाही, सगळ्या चांगल्या व्यक्तींनी राजकारणात जरूर यावे. समाजपरिवर्तन झाले पाहिजे, निवृत्ती ही प्रवृत्ती व्हावी आणि रिटायरमेंट ही रि-अटायरमेंट असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सावनी विनिता यांनी सूत्रसंचालन केले तर निकिता मोघे यांनी आभार मानले.

----------------------