शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

नागरिकांच्या सहभागाची आवश्यकता

By admin | Updated: June 30, 2017 03:26 IST

केंद्र आणि राज्य शासनाकडून नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधांचा पुरवठा केला जातो. या सुविधा पुरविण्यासाठी अगोदर त्यासंदर्भातील

केंद्र आणि राज्य शासनाकडून नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधांचा पुरवठा केला जातो. या सुविधा पुरविण्यासाठी अगोदर त्यासंदर्भातील आवश्यक ती माहिती संकलित करावी लागते. त्यासाठी शासनाचे विविध विभाग कार्यरत असतात. यापैकीच म्हणजे केंद्र शासनाचे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी खाते. या खात्याच्या कामाबद्दल सामान्य नागरिकांना फारशी माहिती नसते. मात्र, देशाच्या विकासाचे धोरण निश्चित करण्यासाठी या खात्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. या खात्यांतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रादेशिक सर्वेक्षण केले जाते. हे सर्वेक्षण शासनाच्या विविध धोरणांची निश्चिती करण्यासाठी केले जाते. यासाठी नागरिकांनी अशा सर्वेक्षणाला मोकळ्या मनाने माहिती देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या प्रादेशिक विभागाच्या संचालिका सुप्रिया रॉय यांनी केले. सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था, वाहतूक सेवा, वस्तू उत्पादन अशा एक ना अनेक क्षेत्रांशी संबंध येत असतो. या क्षेत्रांमधील सुविधांमुळे आपले जीवन सुलभ होते. कधी-कधी अनेक समस्याही भेडसावत असतात. अशा समस्याचे निराकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी विकास धोरण राबवून सोयी-सुविधा पुरविण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जातो. मात्र या सुविधा नेमक्या कशा प्रकारच्या असाव्यात? शिवाय त्या कोणकोणत्या भागात असल्या पाहिजेत, याची विश्वसनीय माहिती सरकारकडे असणे आवश्यक असते. ही माहिती संकलित करण्याची जबाबदारी या सांख्यिकी खात्याकडे असते. सरकारला नेमकी कशाप्रकारची माहिती आवश्यक आहे, त्यानुसार राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाला (एनएसएसओ) माहिती दिली जाते. या सूचनांच्या आधारे प्रादेशिक कार्यालयांकडून सर्वेक्षण करुन माहिती संकलनाचे काम केले जाते. प्रादेशिक कार्यालयाकडून केंद्र सरकारला दिली जाते. या माहितीच्या आधारेच शासनाकडून विकासाची धोरणे आखली व राबविली जातात. केंद्रीय सांख्यिकी आणि क्रार्यक्रम अंमलबजावणी कार्यक्रम खात्याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. महाराष्ट्रात चार प्रादेशिक कार्यालये असून पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत नऊ जिल्हे अंतर्भूत होतात. त्यात पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद व अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. केंद्र शासनाच्या आदेशानुसार मुख्य कार्यालयाकडून सर्वेक्षणाचे निर्देश दिले जातात. राज्य शासनाच्या अर्थ आणि सांख्यिकी विभागाकडूनही समांतर सर्वेक्षण केले जाते. हे दोन्ही सर्व्हेक्षण पडताळूनच निष्कर्ष काढले जातात. त्यामुळे त्यात अचूकता येते.येत्या १ जुलैपासून शिक्षण आणि आरोग्य यावर होणारा कौटुंबिक खर्च आणि केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान यांबाबतचा सर्वेक्षण कार्यक्रम सुरु होणार आहे. यामध्ये सामान्य कुटुंबाचा शिक्षणावर किती खर्च होतो, कोणी मधूनच शिक्षण सोडून देतो, त्यामागील कारणे काय याचा शोध प्रश्नावलीच्या मार्फत घेतला जातो. तसेच काही भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे का, जन्मदर काय आहे, आणखी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत याची माहिती घेतली जाणार आहे. सामान्य नागरिकांना या खात्यात नेमके कोणते काम चालते याची माहिती नसल्याने सर्वेक्षण करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सर्वेक्षणात नागरिकांना विविध अंगांनी प्रश्न विचारणे आवश्यक असतात. मात्र आमच्या कर्मचाऱ्यांनी काही प्रश्न विचारले की, काही नागरिक उत्तर देणे टाळतात. शहरामध्ये असा बऱ्याच वेळा अनुभव येतो. व्यग्र जीवनशैलीमुळे असे असेल कदाचित. मात्र, ग्रामीण भागात याउलट अनुभव येत असतो. तेथील लोक मोकळेपणाने प्रश्नावलीला उत्तरे देतात. त्यामुळे आम्हाला लोकांच्या समस्या जाणण्यास मदतच होते. आमच्याकडून केले जाणारे सर्वेक्षण आणि त्यावरून तयार केलेली माहिती समोर ठेवूनच शासनाकडून सामान्य नागरिकांच्या हितासाठी योजना व सुविधा राबविल्या जातात. नागरिकांनी योग्य माहिती दिली, तर राबविण्यात येणाऱ्या सुविधांची योग्य अंमलबजावणी होईल आणि याचा सर्वांना लाभ देता येईल.