शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

डेपोला आग लागल्याने पुन्हा कचराकोंडी

By admin | Updated: April 12, 2015 00:27 IST

उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे : उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेकडून सध्या टाकल्या जात असलेल्या कचऱ्याच्या ढिगालाच ही आग लागली. त्यामुळे दोन दिवसांपासून तब्बल दीड हजार टन कचरा शहरातच साठवून ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. आगीमुळे उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावाच्या परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा गाड्या डेपोवर येऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. शहरात दररोज किमान पंधराशे ते सोळाशे टन मिश्र कचरा तयार होतो. पालिकेने केलेल्या विनंतीनुसार, या कचऱ्यातील केवळ ५०० टन सुका कचरा डेपोवर टाकला जातो. तर उर्वरित कचरा शेतकऱ्यांना देऊन काही कचरा शहरातच जिरवला जातो. त्यामुळे शहरातील कचरा समस्या काही प्रमाणात सुटली असतानाच गुरुवारी या कचरा डेपोला पुन्हा आग लागली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग आणखी भडकली आहे. विशेष म्हणजे, पालिकेकडून ज्या ठिकाणी ५०० टन सुका कचरा कँपिंगसाठी घेतला जात होता, त्याच ठिकाणी आग लागल्याने ती आटोक्यात येईपर्यंत एकही गाडी डेपोवर पाठविणे पालिकेस शक्य नाही. त्यामुळे गुरुवारपासून एकही गाडी पालिकेकडून डेपोवर पाठविली नसल्याने सुक्या कचऱ्याची समस्या शहरात निर्माण झाली आहे.ग्रामस्थ आक्रमक ४आगीमुळे कचरा डेपोच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे गावांमधील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील नागरिक आक्रमक झाले आहेत. यापुढे डेपोवर एकही गाडी येऊ देणार नाही, अशी भूमिका तेथील ग्रामस्थांनी घेतली आहे. आग आटोक्यात आल्यानंतरही ग्रामस्थांनी ही आक्रमक भूमिका कायम ठेवल्यास शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.४कचरा डेपोवरील आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेची अग्निशमन यंत्रणा तीन दिवसांपासून २४ तास कार्यरत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग भडकत आहे. त्यातच काही दिवसांपासून शहरासह उपनगरांत ढगाळ वातावरण आहे. या परिसरात जोराचा पाऊस झाल्यास आगीवर नियंत्रण मिळण्यास प्रशासनास मदत होणार आहे.आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे डेपोवर गाड्या पाठविणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात कचरा शहरातच पडून आहे.- सुरेश जगताप, घनकचरा विभाग प्रमुख