शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

डेपोला आग लागल्याने पुन्हा कचराकोंडी

By admin | Updated: April 12, 2015 00:27 IST

उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे : उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेकडून सध्या टाकल्या जात असलेल्या कचऱ्याच्या ढिगालाच ही आग लागली. त्यामुळे दोन दिवसांपासून तब्बल दीड हजार टन कचरा शहरातच साठवून ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. आगीमुळे उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावाच्या परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा गाड्या डेपोवर येऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. शहरात दररोज किमान पंधराशे ते सोळाशे टन मिश्र कचरा तयार होतो. पालिकेने केलेल्या विनंतीनुसार, या कचऱ्यातील केवळ ५०० टन सुका कचरा डेपोवर टाकला जातो. तर उर्वरित कचरा शेतकऱ्यांना देऊन काही कचरा शहरातच जिरवला जातो. त्यामुळे शहरातील कचरा समस्या काही प्रमाणात सुटली असतानाच गुरुवारी या कचरा डेपोला पुन्हा आग लागली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग आणखी भडकली आहे. विशेष म्हणजे, पालिकेकडून ज्या ठिकाणी ५०० टन सुका कचरा कँपिंगसाठी घेतला जात होता, त्याच ठिकाणी आग लागल्याने ती आटोक्यात येईपर्यंत एकही गाडी डेपोवर पाठविणे पालिकेस शक्य नाही. त्यामुळे गुरुवारपासून एकही गाडी पालिकेकडून डेपोवर पाठविली नसल्याने सुक्या कचऱ्याची समस्या शहरात निर्माण झाली आहे.ग्रामस्थ आक्रमक ४आगीमुळे कचरा डेपोच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे गावांमधील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील नागरिक आक्रमक झाले आहेत. यापुढे डेपोवर एकही गाडी येऊ देणार नाही, अशी भूमिका तेथील ग्रामस्थांनी घेतली आहे. आग आटोक्यात आल्यानंतरही ग्रामस्थांनी ही आक्रमक भूमिका कायम ठेवल्यास शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.४कचरा डेपोवरील आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेची अग्निशमन यंत्रणा तीन दिवसांपासून २४ तास कार्यरत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग भडकत आहे. त्यातच काही दिवसांपासून शहरासह उपनगरांत ढगाळ वातावरण आहे. या परिसरात जोराचा पाऊस झाल्यास आगीवर नियंत्रण मिळण्यास प्रशासनास मदत होणार आहे.आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे डेपोवर गाड्या पाठविणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात कचरा शहरातच पडून आहे.- सुरेश जगताप, घनकचरा विभाग प्रमुख