शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

डेपोला आग लागल्याने पुन्हा कचराकोंडी

By admin | Updated: April 12, 2015 00:27 IST

उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे : उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेकडून सध्या टाकल्या जात असलेल्या कचऱ्याच्या ढिगालाच ही आग लागली. त्यामुळे दोन दिवसांपासून तब्बल दीड हजार टन कचरा शहरातच साठवून ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. आगीमुळे उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावाच्या परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा गाड्या डेपोवर येऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. शहरात दररोज किमान पंधराशे ते सोळाशे टन मिश्र कचरा तयार होतो. पालिकेने केलेल्या विनंतीनुसार, या कचऱ्यातील केवळ ५०० टन सुका कचरा डेपोवर टाकला जातो. तर उर्वरित कचरा शेतकऱ्यांना देऊन काही कचरा शहरातच जिरवला जातो. त्यामुळे शहरातील कचरा समस्या काही प्रमाणात सुटली असतानाच गुरुवारी या कचरा डेपोला पुन्हा आग लागली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग आणखी भडकली आहे. विशेष म्हणजे, पालिकेकडून ज्या ठिकाणी ५०० टन सुका कचरा कँपिंगसाठी घेतला जात होता, त्याच ठिकाणी आग लागल्याने ती आटोक्यात येईपर्यंत एकही गाडी डेपोवर पाठविणे पालिकेस शक्य नाही. त्यामुळे गुरुवारपासून एकही गाडी पालिकेकडून डेपोवर पाठविली नसल्याने सुक्या कचऱ्याची समस्या शहरात निर्माण झाली आहे.ग्रामस्थ आक्रमक ४आगीमुळे कचरा डेपोच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे गावांमधील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील नागरिक आक्रमक झाले आहेत. यापुढे डेपोवर एकही गाडी येऊ देणार नाही, अशी भूमिका तेथील ग्रामस्थांनी घेतली आहे. आग आटोक्यात आल्यानंतरही ग्रामस्थांनी ही आक्रमक भूमिका कायम ठेवल्यास शहरात पुन्हा कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.४कचरा डेपोवरील आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेची अग्निशमन यंत्रणा तीन दिवसांपासून २४ तास कार्यरत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग भडकत आहे. त्यातच काही दिवसांपासून शहरासह उपनगरांत ढगाळ वातावरण आहे. या परिसरात जोराचा पाऊस झाल्यास आगीवर नियंत्रण मिळण्यास प्रशासनास मदत होणार आहे.आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे डेपोवर गाड्या पाठविणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात कचरा शहरातच पडून आहे.- सुरेश जगताप, घनकचरा विभाग प्रमुख