शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

उजनीतून भीमा नदीत पाणी सोडा, जलसंपदाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:24 IST

येत्या १५ मार्च रोजी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे, असा आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास..

इंदापूर  : येत्या १५ मार्च रोजी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे, असा आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैैठकीत गुरुवारी दिला. 

उजनी धरणालगतचे भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने जलचर मृत्युमुखी पडले. नदीकाठच्या पुणे व सोलापूर जिल्ह्यातील गावांमधील पिकांचा प्रश्न गंभीर झाला होता. याची माध्यमांनी दखल घेतल्यानंतर प्रशासनाला जाग आली. 

आमदार दत्तात्रय भरणे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार हनुमंत डोळस, आमदार नारायण पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आदींच्या शिष्टमंडळाने बुधवारी  उजनी प्रकल्पाचे मुख्य अभियंता बिराजदार, अधीक्षक अभियंता चौगुले यांच्यासमवेत जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात उन्हाळी हंगाम कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली. या वेळी निवेदन देण्यात आले. विस्तृत चर्चा झाली. चर्चेनंतर जलसंपदा मंत्री महाजन यांनी वरील आदेश दिले.

इंदापूर तालुक्यातील भीमा नदीवर भाटनिमगाव येथे बांधण्यात आलेल्या बंधाºयाच्या पाण्यावर श्रीभैरवनाथ सुरवड भांडगाव सहकारी पाणीपुरवठा संस्था, अवसरी सहकारी पाणीपुरवठा संस्था, श्रीनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था अशा प्रत्येकी पाचशे ते सहाशे सभासदांच्या उपसा सिंचन योजना अवलंबून आहेत. सुरवड, गलांडवाडी नं.२, भांडगाव, भाटनिमगाव, बाभुळगाव, अवसरी, बेडशिंगे या इंदापूर तालुक्यातील गावांसह सोलापूर जिल्ह्यातील रांझणी, आलेगाव, रुई या गावांमधील शेतकºयांच्या छोट्या मोठ्या उपसा सिंचन योजना सुरूआहेत.

चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाला. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे पाटबंधारे खात्याच्या नियमानुसार पाणी मागणी अर्ज करून संस्थांनी पिके घेतली आहेत. मागील काही दिवसांपासून नदीत पाणी नसल्याने या संस्था बंद आहेत. त्यामुळे संस्थेच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होणार आहे. जनावरांच्या चाºयाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे, अशी वस्तुस्थिती आहे.

भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असून असंख्य जलचर मृत्युमुखी पडल्याचे व पिकाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे सचित्र वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.

फोटो ओळी : उजनी प्रकल्पाचे मुख्य अभियंता बिराजदार यांच्याकडे निवेदन देताना आमदार दत्तात्रय भरणे व इतर.