शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उजनीतून भीमा नदीत पाणी सोडा, जलसंपदाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:24 IST

येत्या १५ मार्च रोजी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे, असा आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास..

इंदापूर  : येत्या १५ मार्च रोजी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे, असा आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैैठकीत गुरुवारी दिला. 

उजनी धरणालगतचे भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने जलचर मृत्युमुखी पडले. नदीकाठच्या पुणे व सोलापूर जिल्ह्यातील गावांमधील पिकांचा प्रश्न गंभीर झाला होता. याची माध्यमांनी दखल घेतल्यानंतर प्रशासनाला जाग आली. 

आमदार दत्तात्रय भरणे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार हनुमंत डोळस, आमदार नारायण पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आदींच्या शिष्टमंडळाने बुधवारी  उजनी प्रकल्पाचे मुख्य अभियंता बिराजदार, अधीक्षक अभियंता चौगुले यांच्यासमवेत जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात उन्हाळी हंगाम कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली. या वेळी निवेदन देण्यात आले. विस्तृत चर्चा झाली. चर्चेनंतर जलसंपदा मंत्री महाजन यांनी वरील आदेश दिले.

इंदापूर तालुक्यातील भीमा नदीवर भाटनिमगाव येथे बांधण्यात आलेल्या बंधाºयाच्या पाण्यावर श्रीभैरवनाथ सुरवड भांडगाव सहकारी पाणीपुरवठा संस्था, अवसरी सहकारी पाणीपुरवठा संस्था, श्रीनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था अशा प्रत्येकी पाचशे ते सहाशे सभासदांच्या उपसा सिंचन योजना अवलंबून आहेत. सुरवड, गलांडवाडी नं.२, भांडगाव, भाटनिमगाव, बाभुळगाव, अवसरी, बेडशिंगे या इंदापूर तालुक्यातील गावांसह सोलापूर जिल्ह्यातील रांझणी, आलेगाव, रुई या गावांमधील शेतकºयांच्या छोट्या मोठ्या उपसा सिंचन योजना सुरूआहेत.

चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाला. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे पाटबंधारे खात्याच्या नियमानुसार पाणी मागणी अर्ज करून संस्थांनी पिके घेतली आहेत. मागील काही दिवसांपासून नदीत पाणी नसल्याने या संस्था बंद आहेत. त्यामुळे संस्थेच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होणार आहे. जनावरांच्या चाºयाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे, अशी वस्तुस्थिती आहे.

भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असून असंख्य जलचर मृत्युमुखी पडल्याचे व पिकाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे सचित्र वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.

फोटो ओळी : उजनी प्रकल्पाचे मुख्य अभियंता बिराजदार यांच्याकडे निवेदन देताना आमदार दत्तात्रय भरणे व इतर.