शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

उजनीतून भीमा नदीत पाणी सोडा, जलसंपदाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:24 IST

येत्या १५ मार्च रोजी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे, असा आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास..

इंदापूर  : येत्या १५ मार्च रोजी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे, असा आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैैठकीत गुरुवारी दिला. 

उजनी धरणालगतचे भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने जलचर मृत्युमुखी पडले. नदीकाठच्या पुणे व सोलापूर जिल्ह्यातील गावांमधील पिकांचा प्रश्न गंभीर झाला होता. याची माध्यमांनी दखल घेतल्यानंतर प्रशासनाला जाग आली. 

आमदार दत्तात्रय भरणे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार हनुमंत डोळस, आमदार नारायण पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आदींच्या शिष्टमंडळाने बुधवारी  उजनी प्रकल्पाचे मुख्य अभियंता बिराजदार, अधीक्षक अभियंता चौगुले यांच्यासमवेत जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात उन्हाळी हंगाम कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली. या वेळी निवेदन देण्यात आले. विस्तृत चर्चा झाली. चर्चेनंतर जलसंपदा मंत्री महाजन यांनी वरील आदेश दिले.

इंदापूर तालुक्यातील भीमा नदीवर भाटनिमगाव येथे बांधण्यात आलेल्या बंधाºयाच्या पाण्यावर श्रीभैरवनाथ सुरवड भांडगाव सहकारी पाणीपुरवठा संस्था, अवसरी सहकारी पाणीपुरवठा संस्था, श्रीनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था अशा प्रत्येकी पाचशे ते सहाशे सभासदांच्या उपसा सिंचन योजना अवलंबून आहेत. सुरवड, गलांडवाडी नं.२, भांडगाव, भाटनिमगाव, बाभुळगाव, अवसरी, बेडशिंगे या इंदापूर तालुक्यातील गावांसह सोलापूर जिल्ह्यातील रांझणी, आलेगाव, रुई या गावांमधील शेतकºयांच्या छोट्या मोठ्या उपसा सिंचन योजना सुरूआहेत.

चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाला. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे पाटबंधारे खात्याच्या नियमानुसार पाणी मागणी अर्ज करून संस्थांनी पिके घेतली आहेत. मागील काही दिवसांपासून नदीत पाणी नसल्याने या संस्था बंद आहेत. त्यामुळे संस्थेच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होणार आहे. जनावरांच्या चाºयाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे, अशी वस्तुस्थिती आहे.

भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असून असंख्य जलचर मृत्युमुखी पडल्याचे व पिकाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे सचित्र वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.

फोटो ओळी : उजनी प्रकल्पाचे मुख्य अभियंता बिराजदार यांच्याकडे निवेदन देताना आमदार दत्तात्रय भरणे व इतर.