शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरू; नदी काठावरील काही शेतकऱ्यांच्या वीजपंपांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:31 IST

भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरु करण्यात आले आहे. धरणातून मंगळवारी सायंकाळी ६०० क्युसेस वेगाने सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती झाली आहे.

ठळक मुद्देपाणी सोडण्याची पूर्वकल्पना जलसंपदा विभागाने दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज पंपांचे नुकसाननदीत पाणी असूनही पिके जळतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे

आंबेठाण : भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरु करण्यात आले आहे. धरणातून मंगळवारी सायंकाळी ६०० क्युसेस वेगाने सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती झाली आहे. पाणी सोडण्याची पूर्वकल्पना जलसंपदा विभागाने दिली नसल्याने नदी काठावरील काही शेतकऱ्यांच्या वीज पंपांचे नुकसान झाले. तर नदीला पाणी आल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.भामा आसखेड धरणातून मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास धरणाच्या दोन दरवाजांतून ६०० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले होते. बुधवारी सकाळपासून पाणी सोडण्याचा वेग वाढवून तो ९५० करण्यात आला. त्यामुळे नदीपात्र भरून वाहत होते. या पाण्याचा फायदा खेड, शिरूर, दौंड, हवेली या चार तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. हे दुसरे आवर्तन असून दहा दिवस चालणार आहे.पाणी सोडण्याअगोदार दोन ते तीन तास पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती, असे पिंपरी खुर्द आणि गोनवडी गावच्या शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र अचानक नदीतील पाणीत वाढ झाल्याने विजपंप नदीपात्रातून वर काढता आले नाही. यापैकी अनेक शेतकऱ्यांचे विजपंप चालू होते. त्यामुळे  विजपंपात पाणी गेल्याने विजपंप जळून गेले आहेत. त्यामुळे नदीत पाणी असूनही पिके जळतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.पाणी सोडण्यासाठी एक व चार नंबरचे दरवाजे १५ सेंटीमीटरने वर उचलण्यात आले आहेत. पाणी सोडण्यास सुरुवात करण्याआगोदर धरणातील पाणीसाठा ८४.११ टक्के होता. तर पाणी पातळी ६६९.१६ मीटर इतकी होती. आजपर्यंत धरण परिसरात १२९२ मिली पावसाची नोंद झाली आहे.सध्याच्या दुसऱ्या आवर्तनात भीमा आणि भामा नदीवरील एकूण असणारे १८ बंधारे भरले जाणार आहेत.धरणातील पाण्याचा फायदा खेड तालुक्यातील करंजविहिरे, आसखेड खुर्द, शेलू, भांबोली, वराळे, सावरदरी, कुरकुंडी, धामणे, कोये, किवळे, चांदूस, पिंपरी ब्रुदुक, रोहकल, भाम, गोणवडी, बोरदरा, पिंपरी खुर्द, कोरेगाव खुर्द, वाकी खुर्द, कोरेगाव खुर्द, वाकी ब्रुदुक, काळुस, भोसे व शेलगाव अशा अनेक गावातील शेतीपिकांना व गावच्या पाणी योजनांना होणार आहे. पाणी सोडण्यात आल्याने भामानदी काठावरील गावच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Puneपुणे