शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरू; नदी काठावरील काही शेतकऱ्यांच्या वीजपंपांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:31 IST

भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरु करण्यात आले आहे. धरणातून मंगळवारी सायंकाळी ६०० क्युसेस वेगाने सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती झाली आहे.

ठळक मुद्देपाणी सोडण्याची पूर्वकल्पना जलसंपदा विभागाने दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज पंपांचे नुकसाननदीत पाणी असूनही पिके जळतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे

आंबेठाण : भामा आसखेडचे दुसरे आवर्तन सुरु करण्यात आले आहे. धरणातून मंगळवारी सायंकाळी ६०० क्युसेस वेगाने सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती झाली आहे. पाणी सोडण्याची पूर्वकल्पना जलसंपदा विभागाने दिली नसल्याने नदी काठावरील काही शेतकऱ्यांच्या वीज पंपांचे नुकसान झाले. तर नदीला पाणी आल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.भामा आसखेड धरणातून मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास धरणाच्या दोन दरवाजांतून ६०० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले होते. बुधवारी सकाळपासून पाणी सोडण्याचा वेग वाढवून तो ९५० करण्यात आला. त्यामुळे नदीपात्र भरून वाहत होते. या पाण्याचा फायदा खेड, शिरूर, दौंड, हवेली या चार तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. हे दुसरे आवर्तन असून दहा दिवस चालणार आहे.पाणी सोडण्याअगोदार दोन ते तीन तास पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती, असे पिंपरी खुर्द आणि गोनवडी गावच्या शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र अचानक नदीतील पाणीत वाढ झाल्याने विजपंप नदीपात्रातून वर काढता आले नाही. यापैकी अनेक शेतकऱ्यांचे विजपंप चालू होते. त्यामुळे  विजपंपात पाणी गेल्याने विजपंप जळून गेले आहेत. त्यामुळे नदीत पाणी असूनही पिके जळतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.पाणी सोडण्यासाठी एक व चार नंबरचे दरवाजे १५ सेंटीमीटरने वर उचलण्यात आले आहेत. पाणी सोडण्यास सुरुवात करण्याआगोदर धरणातील पाणीसाठा ८४.११ टक्के होता. तर पाणी पातळी ६६९.१६ मीटर इतकी होती. आजपर्यंत धरण परिसरात १२९२ मिली पावसाची नोंद झाली आहे.सध्याच्या दुसऱ्या आवर्तनात भीमा आणि भामा नदीवरील एकूण असणारे १८ बंधारे भरले जाणार आहेत.धरणातील पाण्याचा फायदा खेड तालुक्यातील करंजविहिरे, आसखेड खुर्द, शेलू, भांबोली, वराळे, सावरदरी, कुरकुंडी, धामणे, कोये, किवळे, चांदूस, पिंपरी ब्रुदुक, रोहकल, भाम, गोणवडी, बोरदरा, पिंपरी खुर्द, कोरेगाव खुर्द, वाकी खुर्द, कोरेगाव खुर्द, वाकी ब्रुदुक, काळुस, भोसे व शेलगाव अशा अनेक गावातील शेतीपिकांना व गावच्या पाणी योजनांना होणार आहे. पाणी सोडण्यात आल्याने भामानदी काठावरील गावच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Puneपुणे