शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

अग्निशमनकडून कधी होणार नियमित तपासणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:01 IST

पुणे : अग्निशमन दलाकडून मॉल, थिएटर, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज, दुकाने आदी व्यावसायिक आस्थापनांच्या दर सहा महिन्यांनी योग्य प्रकारे तपासण्या होऊन त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण होणे आवश्यक आहे.

दीपक जाधवपुणे : अग्निशमन दलाकडून मॉल, थिएटर, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज, दुकाने आदी व्यावसायिक आस्थापनांच्या दर सहा महिन्यांनी योग्यप्रकारे तपासण्या होऊन त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण होणे आवश्यक आहे. मात्र मनुष्यबळाअभावी व तपासणीचे अधिकार फक्त वरिष्ठ अधिका-यांकडेच असल्याने प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन तपासण्या होऊ शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलातील जवानांना सेवाज्येष्ठतेनुसार याबाबतचे प्रशिक्षण आणि तपासणीचे अधिकार दिले जाणे आवश्यक आहे.मुंबईच्या कमला मिलमधील पबला गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले आहेत. पबमध्ये अग्निरोधक यंत्रणा नसल्याने आगीची तीव्रता वाढून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. याप्रकरणी अग्निशमन अधिका-यासह महापालिकेच्या ५ अधिका-यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. मात्र एखादी दुर्घटना घडून गेल्यानंतर कारवाईचा बडगा उचलण्यापेक्षा फायर अ‍ॅक्टमध्ये योग्य त्या सुधारणा केल्या जाणे आवश्यक आहे.व्यावसायिक आस्थापनांचे अग्निशमन परवान्याचे दर ६ महिन्यांनी नूतनीकरण करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्या वेळी अधिकाºयांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करणे आवश्यक आहे. या तपासण्या न होताच बहुतांश परवाने दिले जातात. त्यामुळे त्या ठिकाणी अनेकदा अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविलेली नसते. त्याचबरोबर अग्निशमन परवान्याचे नूतनीकरणही केले जात नाही. केंद्रप्रमुखांकडे नूतनीकरणासाठी येणाºया प्रत्येक आस्थापनेच्या जागेवर जाऊन तिथली तपासणी करणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार फायरमनना त्याबाबतचे प्रशिक्षण व अधिकार दिले जाणे आवश्यक आहे. केंद्रप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली अशी एखादी समिती स्थापन करून या तपासण्या होणे आवश्यक असल्याचे मत अग्निशमन दलातून व्यक्त केले जात आहे. व्यावसायिक आस्थापनांची थेट तपासणी करण्याचे अधिकार केवळ मुख्य अग्निशमन अधिका-यांना देण्यात आले आहेत. मात्र एखाद्या ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा योग्य प्रकारे ठेवण्यात आले नसल्याचे लक्षात आल्यास त्याची तपासणी करून कारवाई करण्याचे अधिकार केंद्रप्रमुखांना दिले जाणे आवश्यक आहे. मात्र अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याऐवजी तेकेवळ वरिष्ठ अधिकाºयांपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहेत. यामध्येबदल झाल्याशिवाय तपासण्या होणार नाहीत.सातत्याने आग लागण्याच्या दुर्घटना घडून त्यामध्ये होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर जास्तीत जास्त भर दिला जाणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अनधिकृत बांधकाम होणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.>आग नियंत्रणात आणण्याचा घसरू लागला दर्जाअग्निशमन दलात अधिकारी व जवानांकडून आग किती वेळात नियंत्रणात आणली, याला मोठे महत्त्व आहे. सध्या छोट्या आगी नियंत्रणात आणण्यासाठी जास्तीचा वेळ लागत आहे. दलातील जवानांच्या प्रशिक्षणाचा अभाव हे यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. त्याचबरोबर इतर कारणांचा शोध घेऊन आग नियंत्रणात आणण्याची वेळ कमीत कमी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.>लक्षात आणून देऊनहीहोईना चुकांची दुरुस्तीमहापालिकेच्या अधिकृत टिष्ट्वटरवरून शहरातील अग्निशमन केंद्रांचे चुकीचे नंबर पोस्ट केले जात आहेत. विशेष म्हणजे अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी रिटिष्ट्वट करत हे नंबर चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून देऊनही पुन्हा पुन्हा चुकीचे नंबर पोस्ट केले जात आहेत.>८ वर्षांत केवळ दोघांनापाठविले प्रशिक्षणालानागपूर येथे अग्निशमन उप-केंद्रप्रमुखपदाचा कोर्स करण्यासाठी ८ वर्षांत केवळ दोघा जवानांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणे जवळजवळ थांबलेले आहे. मनुष्यबळ नसल्याची तक्रार वारंवार प्रशासनाकडून केली जात आहे. त्याचवेळी अग्निशमनच्या जवानांना या प्रशिक्षणासाठी पाठविलेच जात नसल्याचे दिसून येत आहे.>संकलित माहितीचा अभावअग्निशमन दलाकडून शहरातील किती व्यावसायिक आस्थापना व निवासी इमारतींना ना-हरकत प्रमाणपत्र दिले. त्यापैकी किती ठिकाणांची तपासणी झाली. आग लागू शकतील, अशी संवेदनशील ठिकाणे कोणती, झोपडपट्ट्यांची अंतर्गत परिस्थिती आदी एकत्रित माहिती अग्निशमन दलाकडे उपलब्ध नाही.>आग लागल्यानंतर ही घ्यावी दक्षताबंद दारे व खिडक्या उघडाव्यातदार बंद करून खोली, बाथरूममध्ये थांबू नयेआगीची दिशा लक्षात घेऊन लवकरात लवकर मोकळ््या जागेत (टेरेस अथवा खाली) जावेधुराच्या त्रासापासून वाचण्यासाठी ओले कापड नाकाला बांधावेरांगत अथवा खाली वाकून बाहेर पडावे