शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

सुरक्षारक्षक हाकताहेत कारभार, रात्रीच्या वेळेत अधिकारी व कर्मचारी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:26 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी मध्यवर्ती सोयीचे व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा औंध येथील जिल्हा रुग्णालयातील हजारो रुपये पगार घेणारे अधिकारी व कर्मचारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर गायब होतात.

रहाटणी/वाकड : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी मध्यवर्ती सोयीचे व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा औंध येथील जिल्हा रुग्णालयातील हजारो रुपये पगार घेणारे अधिकारी व कर्मचारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर गायब होतात. त्यानंतर रात्री आलेल्या रुग्णांचा केस पेपर काढण्यापासून ते देखभालीची व्यवस्था सुरक्षारक्षकांच्या हाती सोपविण्यात येत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे. सुरक्षारक्षकांना रुग्णालयाची सुरक्षा करण्याऐवजी रुग्णसेवकांची भूमिका पार पाडावी लागत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा कारभार ‘आयजीच्या जिवावर बायजी उधार’ अशी स्थिती असून, रुग्णालयाची सुरक्षा रामभरोसे आहे.रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘लोकमत’चे प्रतिनिधी पोहोचले. भव्य व प्रशस्त असलेल्या या रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षारक्षक तैनात नसल्याचे दिसून आले. केस पेपर काढण्याच्या खिडकीवर गेले असता, काही सुरक्षारक्षक केस पेपर लिहिण्याचे काम करत होते. तर काही जन मोबाइलवर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप पाहण्यात दंग होते. या वेळी प्रतिनिधीने केस पेपर खिडकीच्या आत खुर्चीवर बसलेल्या सुरक्षारक्षकाला केस पेपर देण्याची मागणी केली. त्याने जणूकाय केस पेपर देणाराच अधिकृत कर्मचारी असल्याच्या आविर्भावात पेशंट कुठे आहे, त्याला काय झाले, नाव व गाव काय, वय किती अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार केला. त्या वेळी पेशंटच्या पोटात दुखत असून पेशंट घरी आहे, अवघ्या काही मिनिटांत येथे येणार आहे़ त्यामुळे आपण आम्हास केस पेपर द्यावे, अशी मागणी करताच त्याने केस पेपर लिहिण्यास सुरुवात केली. वास्तविक सकाळी दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत व पुन्हा सायंकाळी चार ते सहा या वेळेत नवीन केस पेपर देणे, जुना केस पेपर काढण्यासाठी कर्मचारी असतात.>या प्रकाराला जबाबदार कोण?या केस पेपर खिडकीच्या शेजारी रुग्णालयातील मनुष्यबळ व्यवस्थापन करणाºया जमादाराची कॅबिन आहे़ मात्र त्या कॅबिनला कुलूप असल्याचे दिसून आले. त्यामुळे एवढ्या मोठ्या रुग्णालयातील व्यवस्थापन कुचकामी असून, येथील कारभार कशा प्रकारे चालतो, असा प्रश्न पडतो. रुग्णालयातील वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी व सुरक्षारक्षक एजन्सी या दोन्ही बाबी वेगळ्या आहेत. रुग्णालय प्रशासनात काम करणाºया कर्मचाºयांना शासनाचा हजारो रुपये पगार असतो, तरी आपल्या जबाबदारीत कसूर करण्याचे धाडस कर्मचारी करताना दिसून येत आहेत. त्यांना कोण पाठिशी घालत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.>तेरी भी चूपमेरी भी चूपरात्रपाळीला देखील या कामासाठी कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे़ मात्र हे कर्मचारी आपली जबाबदारी व कर्तव्याचे भान न ठेवता या कामाची जबाबदारी सुरक्षारक्षकांच्या माथी मारून स्वत: मात्र बिनधास्त मजा मारत फिरत असल्याचे येथील रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले. सुरक्षारक्षक व कर्मचारी दोघेही आपआपली जबाबदारी विसरून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे म्हणत उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करतात. मात्र, एखादा तातडीचा रुग्ण दाखल झाल्यास सर्वांची धावपळ होते. वेळेवर रुग्णांना उपचार मिळत नाहीत. कोणीही जबाबदारी घेत नाही, अशी माहिती येथील रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली.>घटनेनंतर येणार का जाग?जिल्हा रुग्णालयात रात्रभर रुग्णांची व नातेवाइकांची तसेच परिसरातील पोलीस स्टेशनमधील आरोपींची मेडिकल चाचणीसाठी मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. तसेच अपघातात जखमी झालेले रुग्णदेखील तातडीच्या सेवेसाठी दाखल होतात़ मात्र रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कोणत्याच प्रकारची सुरक्षा व सुरक्षारक्षक नसल्याने कधीही ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशी परिस्थिती या रुग्णालयाची आहे.तुम्ही कधीही आत जा आणि केव्हाही बाहेर पडा तुम्हाला विचारणारा व अटकाव करणारा कोणीही भेटणार नाही़ यातूनच काही अपवादात्मक घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.