शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सुरक्षारक्षक हाकताहेत कारभार, रात्रीच्या वेळेत अधिकारी व कर्मचारी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:26 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी मध्यवर्ती सोयीचे व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा औंध येथील जिल्हा रुग्णालयातील हजारो रुपये पगार घेणारे अधिकारी व कर्मचारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर गायब होतात.

रहाटणी/वाकड : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी मध्यवर्ती सोयीचे व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा औंध येथील जिल्हा रुग्णालयातील हजारो रुपये पगार घेणारे अधिकारी व कर्मचारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर गायब होतात. त्यानंतर रात्री आलेल्या रुग्णांचा केस पेपर काढण्यापासून ते देखभालीची व्यवस्था सुरक्षारक्षकांच्या हाती सोपविण्यात येत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे. सुरक्षारक्षकांना रुग्णालयाची सुरक्षा करण्याऐवजी रुग्णसेवकांची भूमिका पार पाडावी लागत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा कारभार ‘आयजीच्या जिवावर बायजी उधार’ अशी स्थिती असून, रुग्णालयाची सुरक्षा रामभरोसे आहे.रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘लोकमत’चे प्रतिनिधी पोहोचले. भव्य व प्रशस्त असलेल्या या रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षारक्षक तैनात नसल्याचे दिसून आले. केस पेपर काढण्याच्या खिडकीवर गेले असता, काही सुरक्षारक्षक केस पेपर लिहिण्याचे काम करत होते. तर काही जन मोबाइलवर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप पाहण्यात दंग होते. या वेळी प्रतिनिधीने केस पेपर खिडकीच्या आत खुर्चीवर बसलेल्या सुरक्षारक्षकाला केस पेपर देण्याची मागणी केली. त्याने जणूकाय केस पेपर देणाराच अधिकृत कर्मचारी असल्याच्या आविर्भावात पेशंट कुठे आहे, त्याला काय झाले, नाव व गाव काय, वय किती अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार केला. त्या वेळी पेशंटच्या पोटात दुखत असून पेशंट घरी आहे, अवघ्या काही मिनिटांत येथे येणार आहे़ त्यामुळे आपण आम्हास केस पेपर द्यावे, अशी मागणी करताच त्याने केस पेपर लिहिण्यास सुरुवात केली. वास्तविक सकाळी दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत व पुन्हा सायंकाळी चार ते सहा या वेळेत नवीन केस पेपर देणे, जुना केस पेपर काढण्यासाठी कर्मचारी असतात.>या प्रकाराला जबाबदार कोण?या केस पेपर खिडकीच्या शेजारी रुग्णालयातील मनुष्यबळ व्यवस्थापन करणाºया जमादाराची कॅबिन आहे़ मात्र त्या कॅबिनला कुलूप असल्याचे दिसून आले. त्यामुळे एवढ्या मोठ्या रुग्णालयातील व्यवस्थापन कुचकामी असून, येथील कारभार कशा प्रकारे चालतो, असा प्रश्न पडतो. रुग्णालयातील वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी व सुरक्षारक्षक एजन्सी या दोन्ही बाबी वेगळ्या आहेत. रुग्णालय प्रशासनात काम करणाºया कर्मचाºयांना शासनाचा हजारो रुपये पगार असतो, तरी आपल्या जबाबदारीत कसूर करण्याचे धाडस कर्मचारी करताना दिसून येत आहेत. त्यांना कोण पाठिशी घालत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.>तेरी भी चूपमेरी भी चूपरात्रपाळीला देखील या कामासाठी कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे़ मात्र हे कर्मचारी आपली जबाबदारी व कर्तव्याचे भान न ठेवता या कामाची जबाबदारी सुरक्षारक्षकांच्या माथी मारून स्वत: मात्र बिनधास्त मजा मारत फिरत असल्याचे येथील रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले. सुरक्षारक्षक व कर्मचारी दोघेही आपआपली जबाबदारी विसरून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे म्हणत उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करतात. मात्र, एखादा तातडीचा रुग्ण दाखल झाल्यास सर्वांची धावपळ होते. वेळेवर रुग्णांना उपचार मिळत नाहीत. कोणीही जबाबदारी घेत नाही, अशी माहिती येथील रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली.>घटनेनंतर येणार का जाग?जिल्हा रुग्णालयात रात्रभर रुग्णांची व नातेवाइकांची तसेच परिसरातील पोलीस स्टेशनमधील आरोपींची मेडिकल चाचणीसाठी मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. तसेच अपघातात जखमी झालेले रुग्णदेखील तातडीच्या सेवेसाठी दाखल होतात़ मात्र रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कोणत्याच प्रकारची सुरक्षा व सुरक्षारक्षक नसल्याने कधीही ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशी परिस्थिती या रुग्णालयाची आहे.तुम्ही कधीही आत जा आणि केव्हाही बाहेर पडा तुम्हाला विचारणारा व अटकाव करणारा कोणीही भेटणार नाही़ यातूनच काही अपवादात्मक घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.