शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पंजाबातील अस्वस्थतेचे मराठीत प्रतिबिंब

By admin | Updated: November 14, 2016 06:48 IST

‘गाडी ढळली, गाडीत जागा होते अडवून बसले, काही लांडगे नि काही मेंढरे, ओलांडत गेली गाडी कैक स्टेशने, नद्या, पहाड, जंगले, शिवारे, उजाड झालेली गावे नि वसलेली शहरे ही कविता वाचल्यानंतर

पुणे : ‘गाडी ढळली, गाडीत जागा होते अडवून बसले, काही लांडगे नि काही मेंढरे, ओलांडत गेली गाडी कैक स्टेशने, नद्या, पहाड, जंगले, शिवारे, उजाड झालेली गावे नि वसलेली शहरे ही कविता वाचल्यानंतर मनात प्रश्न येईल ही नक्की आहे कुणाची? पंजाबच्या अस्वस्थ वर्तमानावर भाष्य करणाऱ्या कवी आणि विश्व पंजाबी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष सुरजितसिंग पातर यांची! पातर यांच्या कवितांचे मराठीमध्ये प्रतिबिंब उमटले आहे. डॉ. अनुपमा उजगरे यांनी अनुवादाच्या माध्यमातून केलेले उत्तम संकलन पुस्तकरूपात मराठी साहित्याचा कायमस्वरूपी ठेवा बनणार आहे. पुण्यात होत असलेल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनादरम्यान या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. पंजाब जसा खाद्यसंस्कृतीमुळे परिचित आहे, तसाच तो सामाजिक अस्वस्थतेचेही प्रतिनिधित्व करीत आहे. या अंधारातील भीषण वास्तवाला अनेक पंजाबी साहित्यिकांनी लेखणीतून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातील एक नाव म्हणजे सुरजितसिंग पातर. पंजाबच्या दुखऱ्या आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या भूतकाळाच्या कड्या पातर यांच्या एकेक कवितेत बांधल्या गेल्या आहेत. त्यांची कविता आपल्या भवतालचे चित्रण करीत असतानाच अंतर्मुख होत आत्मनिष्ठेची आणि सामाजिकतेची बेमालूम सांगड घालीत आपल्या पृथक शैलीत अभिव्यक्त होताना दिसते.डॉ. अनुपमा उजगरे यांच्या ‘सुरजित पातर यांची कविता’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी संमेलनधाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके आणि प्रभा गणोरकर यांच्या उपस्थितीत विश्व पंजाबी साहित्य संमेलनच्या उद्घाटन सोहळ्याच्या एक दिवस आधी होणार आहे.