शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरच्या पाण्यात कपात, हिवाळ्यामध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 04:35 IST

उन्हाळा सुरू होण्यासाठी वेळ असला, तरी भर हिवाळ्यात लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून हडपसरला होणाºया पाणीपुरवठ्यात ४८ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रोज १२३ एमएलडी पाण्याची गरज असताना

हडपसर : उन्हाळा सुरू होण्यासाठी वेळ असला, तरी भर हिवाळ्यात लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून हडपसरला होणाºया पाणीपुरवठ्यात ४८ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रोज १२३ एमएलडी पाण्याची गरज असताना, प्रत्यक्षात केवळ ७६ एमएलडी पाणी मिळत आहे. परिणामी, कमीदाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे.रामटेकडीवरील पाण्याची टाकी वारंवार शून्यपातळीला जाते. त्यामुळे लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून अधिकचे पाणी पंपिंग करून, या टाकीत पाणी भरणे गरजेचे आहे.याबाबत हडपसर, कोंढवा, मुंढवा आणि वानवडी भागांतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. आयुक्त कुणाल कुमार यांनी संबंधित अधिकाºयांना सर्वेक्षण करून, दोन दिवसांत हडपसर विभागास पूर्ववत व नियमित पाणीपुरवठा करण्याचा आदेश अधिकाºयांना दिला.याप्रसंगी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, नगरसेवक वैशाली बनकर, चंचला कोद्रे, प्रशांत जगताप, बंडू गायकवाड, नंदा लोणकर, योगेश ससाणे, चंचला कोद्रे, रुक्साना इनामदार, हमिदा सुंडके, परवीन शेख, माजी नगरसेवक सुनील बनकर आदींच्या शिष्टमंडळाचा समावेश होता. या बैठकीसाठी लष्कर पाणीपुरवठा अधिकारी, विद्युत विभागाचे अधिकारी व संबंधित विभागाचे अभियंते उपस्थित होते.आठ दिवस पाणीपुरवठा नाही1 हडपसर परिसरातील हिंगणेआळी, मगरआळी, रामेशीआळी, पांढरेमळा, गरडूवस्ती, अल्हाटवस्ती, काळेपडळ या भागात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. हडपसर गावठाण, गाडीतळ, माळवाडी, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, आकाशवाणी, गाडीतळ या भागात पूर्वी दोन तास पाणी येत होते. सध्या केवळ अर्धा तास पाणी येते. पाण्याची वेळ अनियमित असते.2 परिणामी, काही भागात नगरसेवकांकडून टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे; मात्र तो पुरेसा नाही. परिणामी, पैसे देऊनही सोसायट्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. रामटेकडीवर नव्याने बांधण्यात आलेली ८० लाख लिटर पाण्याची टाकी वापराविना पडून आहे. लष्कर जलशुद्धीकरण केंद्र हे १०० एमएलडीचे असून, त्याची मुदत संपली आहे. दुरवस्था झाल्याने ते कोणत्याही क्षणी बंद पडू शकते. त्यामुळे या ठिकाणी नवीन २०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची मागणी या नगरसेवकांनी केली आहे.3 लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पावरा म्हणाले की, लष्कर पाणीपुरवठा ते रामटेकडी टाकीदरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होण्यास सात महिने लागतील.पाणीपुरवठा सुरळीत न होण्याची कारणे :पर्वती येथून लष्कर जलशुद्धीकरण केंद्रात पाणी कमी येते. नवीन जलवाहिन्या टाकणे गरजेचे. शहरातील काही भागांत चोवीस तास पाणीपुरवठा होतो.रामटेकडी येथील पाण्याच्या टाक्याची पातळी वारंवार शून्य होते. रामटेकडीवर बांधलेल्या नवीन टाकीतून पाणी सोडण्याची आवश्यकता.दाब कमी असल्याने उंच भागातील नळांना पाणी येत नाही.

टॅग्स :Puneपुणे