शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

हडपसरच्या पाण्यात कपात, हिवाळ्यामध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 04:35 IST

उन्हाळा सुरू होण्यासाठी वेळ असला, तरी भर हिवाळ्यात लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून हडपसरला होणाºया पाणीपुरवठ्यात ४८ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रोज १२३ एमएलडी पाण्याची गरज असताना

हडपसर : उन्हाळा सुरू होण्यासाठी वेळ असला, तरी भर हिवाळ्यात लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून हडपसरला होणाºया पाणीपुरवठ्यात ४८ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रोज १२३ एमएलडी पाण्याची गरज असताना, प्रत्यक्षात केवळ ७६ एमएलडी पाणी मिळत आहे. परिणामी, कमीदाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे.रामटेकडीवरील पाण्याची टाकी वारंवार शून्यपातळीला जाते. त्यामुळे लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून अधिकचे पाणी पंपिंग करून, या टाकीत पाणी भरणे गरजेचे आहे.याबाबत हडपसर, कोंढवा, मुंढवा आणि वानवडी भागांतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. आयुक्त कुणाल कुमार यांनी संबंधित अधिकाºयांना सर्वेक्षण करून, दोन दिवसांत हडपसर विभागास पूर्ववत व नियमित पाणीपुरवठा करण्याचा आदेश अधिकाºयांना दिला.याप्रसंगी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, नगरसेवक वैशाली बनकर, चंचला कोद्रे, प्रशांत जगताप, बंडू गायकवाड, नंदा लोणकर, योगेश ससाणे, चंचला कोद्रे, रुक्साना इनामदार, हमिदा सुंडके, परवीन शेख, माजी नगरसेवक सुनील बनकर आदींच्या शिष्टमंडळाचा समावेश होता. या बैठकीसाठी लष्कर पाणीपुरवठा अधिकारी, विद्युत विभागाचे अधिकारी व संबंधित विभागाचे अभियंते उपस्थित होते.आठ दिवस पाणीपुरवठा नाही1 हडपसर परिसरातील हिंगणेआळी, मगरआळी, रामेशीआळी, पांढरेमळा, गरडूवस्ती, अल्हाटवस्ती, काळेपडळ या भागात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. हडपसर गावठाण, गाडीतळ, माळवाडी, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, आकाशवाणी, गाडीतळ या भागात पूर्वी दोन तास पाणी येत होते. सध्या केवळ अर्धा तास पाणी येते. पाण्याची वेळ अनियमित असते.2 परिणामी, काही भागात नगरसेवकांकडून टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे; मात्र तो पुरेसा नाही. परिणामी, पैसे देऊनही सोसायट्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. रामटेकडीवर नव्याने बांधण्यात आलेली ८० लाख लिटर पाण्याची टाकी वापराविना पडून आहे. लष्कर जलशुद्धीकरण केंद्र हे १०० एमएलडीचे असून, त्याची मुदत संपली आहे. दुरवस्था झाल्याने ते कोणत्याही क्षणी बंद पडू शकते. त्यामुळे या ठिकाणी नवीन २०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची मागणी या नगरसेवकांनी केली आहे.3 लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पावरा म्हणाले की, लष्कर पाणीपुरवठा ते रामटेकडी टाकीदरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होण्यास सात महिने लागतील.पाणीपुरवठा सुरळीत न होण्याची कारणे :पर्वती येथून लष्कर जलशुद्धीकरण केंद्रात पाणी कमी येते. नवीन जलवाहिन्या टाकणे गरजेचे. शहरातील काही भागांत चोवीस तास पाणीपुरवठा होतो.रामटेकडी येथील पाण्याच्या टाक्याची पातळी वारंवार शून्य होते. रामटेकडीवर बांधलेल्या नवीन टाकीतून पाणी सोडण्याची आवश्यकता.दाब कमी असल्याने उंच भागातील नळांना पाणी येत नाही.

टॅग्स :Puneपुणे