शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे शुल्क कमी केले; आमचे कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांकडून दिल्या जात असलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांवरील खर्च कमी झाला आहे. त्यामुळेच शासनाने यंदा आरटीई ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांकडून दिल्या जात असलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांवरील खर्च कमी झाला आहे. त्यामुळेच शासनाने यंदा आरटीई शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम कमी केली. शासनाने स्वत:च्या तिजोरीतून द्यावे लागणारे शुल्क कमी केले.आता पालकांना द्यावे लागणारे शुल्क शासन केव्हा कमी करणार, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

सुमारे दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून केवळ ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळा बंद असल्याने शाळांकडून विद्यार्थ्यांवर केला जाणारा खर्च कमी झाला आहे. विद्यार्थी ग्रंथालय, प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब, क्रीडांगण, शाळेतील स्वच्छतागृह आदी गोष्टींचा वापर करत नाहीत. परिणामी, शाळांचा खर्च कमी झाला. त्यामुळे शासनाने आरटीई शुल्क प्रतिपूर्तीच्या रक्कमेत सुमारे ५० टक्के कपात केली आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवरील आरटीई शुल्क प्रतिपूर्तीचा भार कमी झाला आहे.

शासनाकडून शाळांना दिले जाणारे शुल्क कमी होत असेल, तर पालकांनीसुद्धा त्या नियमानुसार शाळांकडे ५० टक्के शुल्क कमी करून जमा केले पाहिजेत. परंतु, शाळा शुल्क कमी करण्यास तयार नाहीत. शुल्क न भरल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण शाळांनी बंद केले आहे. त्यामुळे शासनानेच याबाबत आदेश काढून पालकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा विविध शाळांच्या पालकांकडून केली जात आहे.

-------------------------

ऑनलाइन शिक्षणामुळे शाळांचा खर्च कमी झाला असल्याने शुल्क कमी करावे, या मागणीसाठी पालकांनी अनेक आंदोलने करून शासनाला निवेदने दिली. आता शासनानेच आरटीईचे शुल्क कमी केले आहे. त्याच निकषानुसार शाळांनी पालकांकडून शुल्क आकारणी करायला हवी. तसेच मागील वर्षाचे शुल्क भरले नाही म्हणून अनेक विद्यार्थ्यांना शाळांनी प्रवेशही दिलेला नाही, याबाबत शासनानेच शाळांना आदेश द्यावेत.

- आनंद मेश्राम ,पालक

------------------

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांचे शुल्क भरताना अनेक अडचणी येतात. शाळांचा खर्च कमी झाला असेल तर शासनानेच आदेश काढून पालकांना दिलासा द्यायला हवा. शाळा शुल्क कमी करण्यास तयार नाहीत. शासनही याबाबत ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी कुणाकडे न्याय मागावा, असा प्रश्न उपस्थित होतो.

- कुलदीप बारभाई, पालक

--------------

आरटीईच्या विद्यार्थ्यांचे शुल्क कमी होत असेल, तर इतर विद्यार्थ्यांचे शुल्क सुद्धा कमी झाले पाहिजे. तसेच अद्याप शासनाने शाळांची आरटीईची शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम दिली नाही. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेशावर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी.

- दिलीपसिंग विश्वकर्मा, अध्यक्ष, महापॅरेंटस्