शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

तुमचे शुल्क कमी केले; आमचे कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांकडून दिल्या जात असलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांवरील खर्च कमी झाला आहे. त्यामुळेच शासनाने यंदा आरटीई ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांकडून दिल्या जात असलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांवरील खर्च कमी झाला आहे. त्यामुळेच शासनाने यंदा आरटीई शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम कमी केली. शासनाने स्वत:च्या तिजोरीतून द्यावे लागणारे शुल्क कमी केले.आता पालकांना द्यावे लागणारे शुल्क शासन केव्हा कमी करणार, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

सुमारे दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून केवळ ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळा बंद असल्याने शाळांकडून विद्यार्थ्यांवर केला जाणारा खर्च कमी झाला आहे. विद्यार्थी ग्रंथालय, प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब, क्रीडांगण, शाळेतील स्वच्छतागृह आदी गोष्टींचा वापर करत नाहीत. परिणामी, शाळांचा खर्च कमी झाला. त्यामुळे शासनाने आरटीई शुल्क प्रतिपूर्तीच्या रक्कमेत सुमारे ५० टक्के कपात केली आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवरील आरटीई शुल्क प्रतिपूर्तीचा भार कमी झाला आहे.

शासनाकडून शाळांना दिले जाणारे शुल्क कमी होत असेल, तर पालकांनीसुद्धा त्या नियमानुसार शाळांकडे ५० टक्के शुल्क कमी करून जमा केले पाहिजेत. परंतु, शाळा शुल्क कमी करण्यास तयार नाहीत. शुल्क न भरल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण शाळांनी बंद केले आहे. त्यामुळे शासनानेच याबाबत आदेश काढून पालकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा विविध शाळांच्या पालकांकडून केली जात आहे.

-------------------------

ऑनलाइन शिक्षणामुळे शाळांचा खर्च कमी झाला असल्याने शुल्क कमी करावे, या मागणीसाठी पालकांनी अनेक आंदोलने करून शासनाला निवेदने दिली. आता शासनानेच आरटीईचे शुल्क कमी केले आहे. त्याच निकषानुसार शाळांनी पालकांकडून शुल्क आकारणी करायला हवी. तसेच मागील वर्षाचे शुल्क भरले नाही म्हणून अनेक विद्यार्थ्यांना शाळांनी प्रवेशही दिलेला नाही, याबाबत शासनानेच शाळांना आदेश द्यावेत.

- आनंद मेश्राम ,पालक

------------------

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांचे शुल्क भरताना अनेक अडचणी येतात. शाळांचा खर्च कमी झाला असेल तर शासनानेच आदेश काढून पालकांना दिलासा द्यायला हवा. शाळा शुल्क कमी करण्यास तयार नाहीत. शासनही याबाबत ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी कुणाकडे न्याय मागावा, असा प्रश्न उपस्थित होतो.

- कुलदीप बारभाई, पालक

--------------

आरटीईच्या विद्यार्थ्यांचे शुल्क कमी होत असेल, तर इतर विद्यार्थ्यांचे शुल्क सुद्धा कमी झाले पाहिजे. तसेच अद्याप शासनाने शाळांची आरटीईची शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम दिली नाही. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेशावर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी.

- दिलीपसिंग विश्वकर्मा, अध्यक्ष, महापॅरेंटस्