शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

लोककलांचे ‘रिडिझायनिंग’ करायला हवे

By admin | Updated: February 8, 2017 02:40 IST

लोककलेसंबंधी शासनाच्या योजना कागदोपत्री पाहिल्या तर भरघोस दिसतात. तरीही सध्याच्या परिस्थितीमध्ये लोककलेची अवस्था पूर्वीसारखीच का आहे?

लोककलेसंबंधी शासनाच्या योजना कागदोपत्री पाहिल्या तर भरघोस दिसतात. तरीही सध्याच्या परिस्थितीमध्ये लोककलेची अवस्था पूर्वीसारखीच का आहे? लोककला ही अजूनही आर्थिक रेषेखाली का आहे? याचा विचार होताना दिसत नाही. आज योजना केवळ तयार केल्या जात आहेत. त्याचा उपयोग होत नाही. या योजना कागदोपत्री न ठेवता त्यांच्या फलितांचे आॅडिट आणि लोककलांचे ’रिडिझायनिंग’ व्हायला हवे, अशी अपेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे यांनी व्यक्त केली. समाजामधील कुठलीही व्यक्ती खुर्चीवर बसून ठरवू शकत नाही की लोककलेकडे कसे आणि कुठल्या दृष्टिकोनातून बघायला हवे. समाज केवळ एकच विचार करतो, की आम्हाला ज्या मनोरंजनाची गरज आहे ते मिळते का नाही! आजची सामाजिक परिस्थिती पाहिली तर मनोरंजनाची गरज भागविण्यासाठी मल्टिप्लेक्स, दूरचित्रवाहिन्या यांच्यासह अगदी मोबाईलसारखी साधने उपलब्ध आहेत, या सर्व सुख-सुविधा सोडून लोकांनी रस्त्यावरच्या किंवा मंदिरातील लोककलेला महत्त्व देणे हे भाबडेपणाचे लक्षण म्हणता येईल. लोककला ही नवीन पद्धतीने कशा प्रकारे समाजापर्यंत पोहोचेल, यासाठी शासन आणि कलावंतांनीही प्रयत्न करायला हवा. लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी शासनस्तरावर कागदोपत्री विविध योजनांची आखणी केली जाते. दिसायला या योजना भरघोस असल्याचे भासते, पण तरीही लोककलांची परिस्थिती बदललेली नाही. लोककला ही अद्यापही आर्थिक रेषेखालीच आहे. फक्त योजना तयार केल्या जात आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने या योजनांचा काही उपयोग होत नाही, अशी परिस्थिती आहे. शासनाने या योजना केवळ कागदोपत्री न ठेवता त्या योजनांचे फलित आहे त्या प्रत्यक्षात कशा अमलात येतील, याचे ‘आॅडिट’ करून त्याचे रिडिझायनिंग करायला हवे. लोककला जगवायची असेल तर लोककलावंतांना जगवायला हवं. कलावंतांचे आरोग्य आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे. उदा : कोकणातील चित्रकथी करणारी शेवटची पिढी आजच्या काळात वीटभट्टीवर कामाला आहे. शासनाने/विद्यापीठाने या कलावंतांना आर्थिक मदत केली असती तर वीटभट्टीवर काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. या कलावंतांसाठी, त्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी त्यांच्या कलांचे सादरीकरण आकाशवाणी, दूरदर्शनवर व्हायला हवे. लोककला केंद्रांनी काय कराव अथवा काय करू नये, हे आपण त्यांना सांगू शकत नाही आणि ठरवूही शकत नाही. त्यासाठी शासनाने आणि सर्व विद्यापीठांनी लोककलेचा दर्जा कशा प्रकारे उंचावेल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत या कलावंतांसाठी फिरती ओपीडी तसेच फिरती शाळा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ज्या ज्या ठिकाणी तमाशाचे प्रयोग होतात त्या त्या भागात फिरती ओपीडी जाऊन कलावंतांवर मोफत उपचार करणार आहे. कलावंतांच्या व्यवसायामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सातत्याने केल्या जाणाऱ्या भटकंतीमुळे शाळांशी त्यांची ओळखच होत नाही. ही मुले साक्षर झाली तर स्वत:च्या पायावर उभी राहू शकणार आहेत, याच जाणिवेतून त्यांच्या मुलांसाठीही फिरती शाळा निर्माण केली जाणार आहे. विद्यापीठातर्फे लोककलेचा अभ्यास, संशोधन आणि त्यांचे कल्याण अशा तीन पातळीवर काम सुरू आहे. लोककलेला आधुनिक पद्धतीने समाजासमोर मांडण्याच्या दृष्टीनेदेखील प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे कलावंतांसाठी ‘ट्रॅव्हलिंग मॅप’ तयार केला जात आहे. राज्यात कुठल्या भागात तमाशा कुठे सुरू आहे ते ठिकाण माहीत होण्यासाठी या नकाशाचा नक्कीच उपयोग होईल. या नकाशाद्वारे लोककलांपर्यंत फिरती ओपीडी आणि फिरती शाळा पोहोचविणेही शक्य होईल.