शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बाजारभावापेक्षा रेडी रेकनरचे दर कमीच

By admin | Updated: March 4, 2016 00:24 IST

राज्यात लागू करण्यासाठी राज्यशासनाने तयार केलेले रेडी रेकनरचे नवे दर हे सध्या बाजारात असलेल्या भावांपेक्षा कमी असल्याचे सत्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केलेल्या पाहणीतून पुढे आले आहे

पुणे : राज्यात लागू करण्यासाठी राज्यशासनाने तयार केलेले रेडी रेकनरचे नवे दर हे सध्या बाजारात असलेल्या भावांपेक्षा कमी असल्याचे सत्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केलेल्या पाहणीतून पुढे आले आहे. सध्या घरांसाठी असलेल्या किमतींचे दर हे शासनाच्या रेडिरेकनरच्या दरापेक्षा ६० ते ११३ टक्क्यांपर्यंत जास्त असल्याचे वास्तव या पाहणीतून समोर आले आहे.राज्यात नवे रेडी रेकनरचे दर लागू करण्याच्या हालचाली गेल्यावर्षी राज्यशासनाने सुरू केल्या होत्या. प्रचलित दरापेक्षा नवे दर हे जास्त असल्याने राज्यातील घरांच्या किमती मोठया प्रमाणात वाढतील. त्यामुळे मागणी घटेल आणि बांधकाम व्यावसायावर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी ओरड करण्यात आली होती. त्यामुळे राज्यशासनाने १ जानेवारीपासून हे नवे दर लागू करण्याचा निर्णय थांबविला होता आणि १ एप्रिलपासून हे नवे दर राज्यात लागू होतील, असे स्पष्ट केले होते.याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक डॉ. एन. रामास्वामी म्हणाले, राज्यशासनाने काढलेले नवे रेडी रेकनरचे दर हे खरोखरच जास्त आहेत का, याची सत्यता पडताळण्याचे काम राज्यशासनाने हाती घेतले होते. त्यानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने पुणे, मुंबई, ठाणे आदी भागांमध्ये पाहणी करण्यास सुरूवात केली होती. या भागांमध्ये गृहप्रकल्पांसंदर्भात भरविण्यात आलेल्या मेळाव्यांमध्ये विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहणी केली आणि घरांच्या किमतींचे दर काढले. या दरांचा आणि नव्या प्रस्तावित रेडी रेकनरच्या दरांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात दिसून आले की, सध्या बाजारात घरांच्या असलेल्या किमती या प्रस्तावित रेडी रेकनर दरापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. पुणे आणि ठाणे जिल्हयात बाजारातील घरांच्या किमती या प्रस्तावित रेडिरेकनरच्या दरापेक्षा ६० ते ७० टक्क्यांनी अधिक आहेत तर मुंबईत ही टक्केवारी सर्वाधिक ११३ टक्के असल्याचे दिसून आले आहे.(प्रतिनिधी)