शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

भरती गैरव्यवहाराचा चेंडू शासनाकडे

By admin | Updated: August 3, 2015 04:12 IST

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध पदांची भरती प्रक्रिया राबविली जाते. तसेच, संबंधित उमेदवाराकडे दावा केल्याप्रमाणे त्याच्याकडे आवश्यक

पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध पदांची भरती प्रक्रिया राबविली जाते. तसेच, संबंधित उमेदवाराकडे दावा केल्याप्रमाणे त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहे का? हे तपासले जाते. ती कागदपत्रे खरी की खोटी, हे तपासण्याचे काम शासनाच्या संबंधित विभागाचे आहे, असे एमपीएससीचे अध्यक्ष व्ही. एन. मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे शिक्षणाधिकारी भरती घोटाळ्याचा चेंडू आता शासनाचा कोर्टात आला आहे. एमपीएससीकडून शिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या भरतीप्रक्रियेत निवड झालेल्या बहुसंख्य उमेदवारांनी चुकीची व खोट्या माहितीच्या आधारावरील नॉन किमिलेअर प्रमाणपत्र सादर करून शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती मिळवल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे.राज्याच्या शिक्षण विभागाच्या उपसचिवांनीही शिक्षण आयुक्तांकडे या संदर्भातील अहवाल मागविला आहे. एक वर्षानंतर का होईना आयुक्त कार्यालयाने या प्रकरणी चौकशी सुरू केली असून, लवकरच याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. एमपीएससीच्या माध्यमातून प्रथम दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. शिक्षण अधिकाऱ्यांच्या भरतीत गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर त्याबाबत आता शासनस्तरावर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या मंत्रालयीन विभागांतर्गत पदोन्नतीच्या व सरळसेवा भरतीच्या परीक्षांच्या कामासाठी नियुक्त केलेले शासन सेवेतील अधिकारी परीक्षांचे काम करण्यास नकार देत असल्याचे समोर आले होते. तसेच, विहित कालावधीत काम पूर्ण करत नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी कामात दिरंगाई अथवा टाळाटाळ करू नये, असा फतवा राज्य शासनाने काढला आहे.एमपीएससीतर्फे मंत्रालय विभागांतर्गत पदोन्नतीच्या व सरळ सेवा प्रवेशोत्तर विभागीय परीक्षांसाठी शासन सेवेतील अधिकाऱ्यांची परीक्षक, नियामक व तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली जाते. मात्र, नियुक्त केलेले काही अधिकारी परीक्षेचे कामकाज नाकारत असल्याचे एमपीएससीने शासनाच्या निदर्शनास आणले आहे.