शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सव्वातीन लाखांची वसुली, धान्य घोटाळ्यातील अधिकाऱ्याकडून वसुलीचे जिल्हाधिका-यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:06 IST

शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामात घडलेल्या धान्य घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अन्नधान्य वितरण अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह ७ अधिकारी कर्मचा-यांकडून दरमहा दीड टक्का व्याजानुसार ९ लाख ८९ हजार ५९० रुपयांची वसुली करण्याचा अहवाल समितीने दिला आहे.

विशाल शिर्के पुणे : शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामात घडलेल्या धान्य घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अन्नधान्य वितरण अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह ७ अधिकारी कर्मचा-यांकडून दरमहा दीड टक्का व्याजानुसार ९ लाख ८९ हजार ५९० रुपयांची वसुली करण्याचा अहवाल समितीने दिला आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले असून, दोषींकडून व्याजासह प्रत्येकी ३ लाख २१ हजार ६५५ रुपयांप्रमाणे २२ लाख ५१ हजार ५८५ रुपयांची वसुली करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने ९ ते २४ डिसेंबर २०१० या कालावधीत शासकीय धान्य गोदामाची तपासणी केली होती. त्यात गव्हाच्या ६ हजार ६२९ गोण्या, तांदूळ ५ हजार ४४ आणि तूरडाळ १० किलो कमी अढळली होती. तर, पामतेल १८ हजार ५१८ लिटर अधिक आढळले होते. गहू ६७० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे २२ लाख २० हजार ७१५ रुपये आणि तांदूळ ९१० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे २२ लाख ९५ हजार २० रुपयांचा अपहार झाल्याचे निश्चित झाले. तर, तूरडाळ ५,५०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे ४४ हजार, अशी ४५ लाख ५९ हजार ७३५ रुपयांची रक्कम वसूल होणे गरजेचे होते.सहायक संचालक पुरवठा विभागाने १० मार्च २०११ ते १९ मार्च २०११ या कालावधीत त्याच घोटाळ्यासाठी पुन्हा गोदामाची फेरतपासणी केली. त्यात गहू २ हजार ९५४ गोणी (१ हजार ४७७ क्विंटल) कमी आढळून आला. त्याची६७० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे ९ लाख ८९ हजार ५९० रुपयांची वसुली करावी, असा अभिप्राय दिला. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.>दीड टक्का व्याजाने पैसे घेणारजिल्हाधिकारी राव यांनी समितीच्या अहवालावर तत्काळ कार्यवाही करून संबंधितांकडून अपहार झालेली ९ लाख ८९ हजार ५९० रुपयांची रक्कम मार्च २०११पासून मार्च २०१८पर्यंत दीड टक्का व्याजाने वसूल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अपहार झालेली रक्कम आणि व्याजाचे १२ लाख ६१ हजार ९९५ रुपये मिळून २२ लाख ५१ हजार ५८५ रुपये दोषींकडून वसूल करावेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही आस्थापना संकलनाने करावी, असेही त्यात म्हटले आहे.दोषी अधिकारी समितीने नोंदविलेला शेरा१) प्रदीप पाटील, तत्कालीन अन्नधान्य वितरण अधिकारी२/६/२००८ पासून कार्यरत, अशी केवळ दोनदा गोदामाला भेट,मात्र ११ मे व ६ जून २०१० साठा तपासणी नाही, पर्यवेक्षणात उणीवा२) पी. एस. भगत, एस. व्ही. चंदनशिवे लेखे अभिलेख अपूर्ण ठेवले, धान्य नासाडीसएच. एस. निंबाळकर, एल. एल, लाटकर जबाबदार, पर्यवेक्षीय उणिवासर्व सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी३) पी. बी. बलकवडे, गोदामपाल लेखे अपूर्ण, सर्व माहिती असताना वरिष्ठांच्यानिदर्शनास आणून न देणे४) पी. कºहाडकर, गोदामपाल कामात हलगर्जीपणा, कार्यभार हस्तांतर न करणे,लेखे अपूर्ण, नोंदी न घेणे, खाडाखोड करणे,अभिलेखावर स्वाक्षरी न करणे अथवा न घेणे>‘लोकमत’ने संबंधित घोटाळ्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे समोर आणले होते. तसेच, चौकशी समितीचा प्रशासनाकडून खेळखंडोबा केला जात असल्याचे दाखवून दिले होते. अखेर चौकशी समितीवर समिती नेमण्याचा कारभार झाल्यानंतर उपलेखापाल मंगेश खरात, उपलेखापाल एम. जी. वाघमारे आणि लेखाधिकारी जिल्हा पुरवठा कार्यालय एम. ए. कांबळे यांची समिती नेमली. अखेर या समितीने अधिकारी आणि कर्मचाºयांवर दोषनिश्चिती केली.