शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

सव्वातीन लाखांची वसुली, धान्य घोटाळ्यातील अधिकाऱ्याकडून वसुलीचे जिल्हाधिका-यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:06 IST

शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामात घडलेल्या धान्य घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अन्नधान्य वितरण अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह ७ अधिकारी कर्मचा-यांकडून दरमहा दीड टक्का व्याजानुसार ९ लाख ८९ हजार ५९० रुपयांची वसुली करण्याचा अहवाल समितीने दिला आहे.

विशाल शिर्के पुणे : शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामात घडलेल्या धान्य घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अन्नधान्य वितरण अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह ७ अधिकारी कर्मचा-यांकडून दरमहा दीड टक्का व्याजानुसार ९ लाख ८९ हजार ५९० रुपयांची वसुली करण्याचा अहवाल समितीने दिला आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले असून, दोषींकडून व्याजासह प्रत्येकी ३ लाख २१ हजार ६५५ रुपयांप्रमाणे २२ लाख ५१ हजार ५८५ रुपयांची वसुली करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने ९ ते २४ डिसेंबर २०१० या कालावधीत शासकीय धान्य गोदामाची तपासणी केली होती. त्यात गव्हाच्या ६ हजार ६२९ गोण्या, तांदूळ ५ हजार ४४ आणि तूरडाळ १० किलो कमी अढळली होती. तर, पामतेल १८ हजार ५१८ लिटर अधिक आढळले होते. गहू ६७० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे २२ लाख २० हजार ७१५ रुपये आणि तांदूळ ९१० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे २२ लाख ९५ हजार २० रुपयांचा अपहार झाल्याचे निश्चित झाले. तर, तूरडाळ ५,५०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे ४४ हजार, अशी ४५ लाख ५९ हजार ७३५ रुपयांची रक्कम वसूल होणे गरजेचे होते.सहायक संचालक पुरवठा विभागाने १० मार्च २०११ ते १९ मार्च २०११ या कालावधीत त्याच घोटाळ्यासाठी पुन्हा गोदामाची फेरतपासणी केली. त्यात गहू २ हजार ९५४ गोणी (१ हजार ४७७ क्विंटल) कमी आढळून आला. त्याची६७० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे ९ लाख ८९ हजार ५९० रुपयांची वसुली करावी, असा अभिप्राय दिला. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.>दीड टक्का व्याजाने पैसे घेणारजिल्हाधिकारी राव यांनी समितीच्या अहवालावर तत्काळ कार्यवाही करून संबंधितांकडून अपहार झालेली ९ लाख ८९ हजार ५९० रुपयांची रक्कम मार्च २०११पासून मार्च २०१८पर्यंत दीड टक्का व्याजाने वसूल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अपहार झालेली रक्कम आणि व्याजाचे १२ लाख ६१ हजार ९९५ रुपये मिळून २२ लाख ५१ हजार ५८५ रुपये दोषींकडून वसूल करावेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही आस्थापना संकलनाने करावी, असेही त्यात म्हटले आहे.दोषी अधिकारी समितीने नोंदविलेला शेरा१) प्रदीप पाटील, तत्कालीन अन्नधान्य वितरण अधिकारी२/६/२००८ पासून कार्यरत, अशी केवळ दोनदा गोदामाला भेट,मात्र ११ मे व ६ जून २०१० साठा तपासणी नाही, पर्यवेक्षणात उणीवा२) पी. एस. भगत, एस. व्ही. चंदनशिवे लेखे अभिलेख अपूर्ण ठेवले, धान्य नासाडीसएच. एस. निंबाळकर, एल. एल, लाटकर जबाबदार, पर्यवेक्षीय उणिवासर्व सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी३) पी. बी. बलकवडे, गोदामपाल लेखे अपूर्ण, सर्व माहिती असताना वरिष्ठांच्यानिदर्शनास आणून न देणे४) पी. कºहाडकर, गोदामपाल कामात हलगर्जीपणा, कार्यभार हस्तांतर न करणे,लेखे अपूर्ण, नोंदी न घेणे, खाडाखोड करणे,अभिलेखावर स्वाक्षरी न करणे अथवा न घेणे>‘लोकमत’ने संबंधित घोटाळ्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे समोर आणले होते. तसेच, चौकशी समितीचा प्रशासनाकडून खेळखंडोबा केला जात असल्याचे दाखवून दिले होते. अखेर चौकशी समितीवर समिती नेमण्याचा कारभार झाल्यानंतर उपलेखापाल मंगेश खरात, उपलेखापाल एम. जी. वाघमारे आणि लेखाधिकारी जिल्हा पुरवठा कार्यालय एम. ए. कांबळे यांची समिती नेमली. अखेर या समितीने अधिकारी आणि कर्मचाºयांवर दोषनिश्चिती केली.