शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बंडखोर नॉट रिचेबल अन् उमेदवार झाले हँग!

By admin | Updated: February 12, 2017 04:51 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवार (दि. १३) अखेरचा दिवस आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवार (दि. १३) अखेरचा दिवस आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु बहुतेक सर्व बंडखोर सध्या ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. परंतु, बंडखोरांच्या या पवित्र्यामुळे उमेदवारांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर मात्र हँग होण्याची पाळी आली आहे. बंडखोरी रोखली नाही तर निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी ५२९, तर पंचायत समितीच्या १५० गणांसाठी ९०५ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यातील बहुतेक अनेक इच्छुक उमेदवारांनी गेल्या पाच वर्षांपासून तयारी केली आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन गेल्या पाच वर्षामध्ये विविध कार्यक्रम आणि उपक्रमही राबविले होते. पक्षश्रेष्ठींच्या सर्व आदेशांचे इमानइतबारे पालन करत आंदोलन- मोर्चे काढलेले आहेत. गटातील प्रत्येकासाठी रात्रं-दिवस धावले आहेत. गटातील मुलांच्या बारश्यापासून, लग्न, एकसष्ठी, अंत्यसंस्कार, ते दशक्रिया विधी मध्ये नियमित हजेरी लावलेली आहे. असे असताना बंडखोरांनी माघारी न घेतल्यास केलेल्या साऱ्यावर पाणी फिरणार आहे. गावातील रखडलेल्या कामासाठी जिल्हा परिषदमध्ये पाठपुरावा करत होते. अनेक जण तर मी सदस्य झाल्यानंतर तत्काळ कामे करणार, अशी ग्वाही देत होते. पक्षश्रेष्ठीनीही उमेदवारांची धडपड पाहून यंदा तुम्हाला संधी असल्याचे जाहीर केले होते. यामुळे अधिक जोमाने कार्यकर्ते कामाला लागले होते. आरक्षणामुळे अनेकांना प्रथमच संधी मिळणार होते. पक्ष संधी देणार या आशेवर अनेकांनी अपक्ष अर्ज भरला आहे. सर्वच पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी गुपचुप उमेदवारांना हाती एबी फॉर्म दिला. उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. जिल्हा परिषदेच्या एका गटामध्ये जवळपास दहा जणांनी अर्ज भरले आहेत. पंचायत समितीच्या एका गणामध्ये सहा जणांनी अर्ज भरले आहेत. जवळपास सर्वच पक्षामध्ये थोड्या-अधिक प्रमाणात बंडखोरी झाली आहे.या नाराजांनी अपक्ष किंवा आघाडी करून लढण्याबाबत विचार व चर्चा करत आहे. गट व गणातील नाराजांनी एकत्र करून आघाडी केल्यास किती फायदा होईल याची चाचपणी केली जात आहे. बंडखोराच्या या चाचपणीमुळे उमेदवार संकटामध्ये आले आहे. बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवार स्वत: घरी जाऊन भेट घेत आहे. उमेदवार पक्षातील आमदार, वरिष्ठ नेत्यांना एकदा माज्यासाठी अर्ज मागे घेण्यासाठी सांगा असे सांगत आहे. बंडखोरांना पक्षातील वरिष्ठ पद, समितीमध्ये सदस्य अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभने दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप बंडखोर आपल्या विचारावर ठाम असल्याचे सांगित आहे. काही जण तर देवदर्शन, पर्यटनाला गेले आहे. अशा साऱ्यांचे फोन नॉट रिचेबल लागत असल्याने उमेदवारांचे मात्र बीपी हाय होत आहे.बंडखोरी रोखणार : नेत्यांचा दावाजिल्ह्यात सर्वाधिक बंडखोरी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये झाली आहे. यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद व तालुकास्तरावर आमदार, अन्य पदाधिकारी पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी व अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी विनंती करीत आहे.परंतु, काही बंडखोर उमेदवारांचा थेट संपर्कच होत नसल्याने पदाधिकारी टेन्शनमध्ये आले आहे. याबाबत कामठे यांनी सांगितले की, पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरू असून, आम्हाल नक्की यश मिळेल.