शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

टोमॅटो आगाराचे अर्थकारण कोलमडले

By admin | Updated: September 4, 2016 04:07 IST

पुरंदर तालुक्यात बेलसर पंचक्रोशीला ‘टोमॅटोचे आगार’ म्हणून संबोधले जाते. यंदाही मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड झाली आहे; मात्र बाजारभावाच कोसळल्याने येथील टोमॅटो उत्पादकांचे

- बी. एम. काळे , जेजुरी

पुरंदर तालुक्यात बेलसर पंचक्रोशीला ‘टोमॅटोचे आगार’ म्हणून संबोधले जाते. यंदाही मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड झाली आहे; मात्र बाजारभावाच कोसळल्याने येथील टोमॅटो उत्पादकांचे अर्थकारण पूर्णपणे कोसळले आहे. येथे भरणाऱ्या बाजारावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असल्याचे शेतकरीवर्गाचे म्हणणे आहे. दररोज सकाळी स्थानिक शेतकरी, व्यापारी येथील बेलसर ग्रामपंचायतीसमोर एकत्र येतात. एकत्र बसून मुंबई, पुणे आदी भागातील बाजारभाव विचारून इथला खरेदीचा बाजार ठरतो. व्यापारी माल खरेदी करून शेतकऱ्याला ठोक रक्कम देऊन व्यवहार पूर्ण करतात. सगळीकडेच बाजारभाव कोसळल्याने इथल्याही बाजारभावावर मोठा परिणाम झाला आहे. एकरी लाख-दीड लाख खर्च करून उत्पन्न मात्र निम्मेही होणार नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारणच कोलमडले आहे. या बाजारामुळे किमान खर्च तरी निघणार असल्याने शेतकरी बाजारात टोमॅटोची विक्री करीत आहेत. बेलसर परिसरात एक एकरापासून ते सात-आठ एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे. सुमारे पाचशे एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर १०५७, अक्षय, जेके ८११, आणि रसिका या जातीच्या टोमॅटोची लागवड झालेली आहे. गेल्या महिनाभरापासून येथे व्यापारी टोमॅटोच्या खरेदीसाठी ठाण मांडून बसलेले आहेत; मात्र बाजारभाव उठत नसल्याने शेतकरीवर्गात मोठी चिंता आहे. दररोज ठरणाऱ्या बाजारभावाच्या वेळी शेतकरी व व्यापाऱ्यांत चांगलीच चकमक झडत आहे; मात्र दोघांना ही गरज असल्याने तोडगाही निघत असल्याने बाजार सुरळीत पार पडत आहे. पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत टोमॅटोचे कॅरेट पाठविले, तर सर्व खर्च वजा जाता २५ किंवा ३० किलोंच्या कॅरेटला ५० ते ६० रुपयेच हातात येत असल्याने नाराजी आहे. येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी मामा गरूड, बाळासाहेब जगताप, सुनील गरूड, लक्षमण जगताप, प्रकाश बुधे, बंडू जगताप, बाळू बुधे, कैलास बनकर, नितीन गरूड, बाळासाहेब झगडे,चंद्रकांत लडकत यांनी मात्र यंदा टोमॅटो उत्पादक चांगलेच अडचणीत आले असल्याचे म्हटले आहे. इथे दररोज भरणाऱ्या बाजारावरच भवितव्य अवलंबून असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. हवामान खात्याने या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे जाहीर केल्याने या वर्षी टोमॅटोला चांगला बाजारभाव राहील अशी खात्री वाटल्यानेच शेतकऱ्यांनी बेलसर, वाळुंज, निळुंज, साकुर्डे, कोथळे, भोसलेवाडी, राणमळा, धालेवाडी, पारगाव आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. या संपूर्ण परिसरात एक हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड झालेली आहे; मात्र हवामान खात्याचा अंदाज फोल ठरल्याने सर्वत्रच टोमॅटोची पिके जोरदार आल्याने बाजारभावावर मोठा परिणाम झाला आहे.