शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो आगाराचे अर्थकारण कोलमडले

By admin | Updated: September 4, 2016 04:07 IST

पुरंदर तालुक्यात बेलसर पंचक्रोशीला ‘टोमॅटोचे आगार’ म्हणून संबोधले जाते. यंदाही मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड झाली आहे; मात्र बाजारभावाच कोसळल्याने येथील टोमॅटो उत्पादकांचे

- बी. एम. काळे , जेजुरी

पुरंदर तालुक्यात बेलसर पंचक्रोशीला ‘टोमॅटोचे आगार’ म्हणून संबोधले जाते. यंदाही मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड झाली आहे; मात्र बाजारभावाच कोसळल्याने येथील टोमॅटो उत्पादकांचे अर्थकारण पूर्णपणे कोसळले आहे. येथे भरणाऱ्या बाजारावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असल्याचे शेतकरीवर्गाचे म्हणणे आहे. दररोज सकाळी स्थानिक शेतकरी, व्यापारी येथील बेलसर ग्रामपंचायतीसमोर एकत्र येतात. एकत्र बसून मुंबई, पुणे आदी भागातील बाजारभाव विचारून इथला खरेदीचा बाजार ठरतो. व्यापारी माल खरेदी करून शेतकऱ्याला ठोक रक्कम देऊन व्यवहार पूर्ण करतात. सगळीकडेच बाजारभाव कोसळल्याने इथल्याही बाजारभावावर मोठा परिणाम झाला आहे. एकरी लाख-दीड लाख खर्च करून उत्पन्न मात्र निम्मेही होणार नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारणच कोलमडले आहे. या बाजारामुळे किमान खर्च तरी निघणार असल्याने शेतकरी बाजारात टोमॅटोची विक्री करीत आहेत. बेलसर परिसरात एक एकरापासून ते सात-आठ एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे. सुमारे पाचशे एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर १०५७, अक्षय, जेके ८११, आणि रसिका या जातीच्या टोमॅटोची लागवड झालेली आहे. गेल्या महिनाभरापासून येथे व्यापारी टोमॅटोच्या खरेदीसाठी ठाण मांडून बसलेले आहेत; मात्र बाजारभाव उठत नसल्याने शेतकरीवर्गात मोठी चिंता आहे. दररोज ठरणाऱ्या बाजारभावाच्या वेळी शेतकरी व व्यापाऱ्यांत चांगलीच चकमक झडत आहे; मात्र दोघांना ही गरज असल्याने तोडगाही निघत असल्याने बाजार सुरळीत पार पडत आहे. पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत टोमॅटोचे कॅरेट पाठविले, तर सर्व खर्च वजा जाता २५ किंवा ३० किलोंच्या कॅरेटला ५० ते ६० रुपयेच हातात येत असल्याने नाराजी आहे. येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी मामा गरूड, बाळासाहेब जगताप, सुनील गरूड, लक्षमण जगताप, प्रकाश बुधे, बंडू जगताप, बाळू बुधे, कैलास बनकर, नितीन गरूड, बाळासाहेब झगडे,चंद्रकांत लडकत यांनी मात्र यंदा टोमॅटो उत्पादक चांगलेच अडचणीत आले असल्याचे म्हटले आहे. इथे दररोज भरणाऱ्या बाजारावरच भवितव्य अवलंबून असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. हवामान खात्याने या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे जाहीर केल्याने या वर्षी टोमॅटोला चांगला बाजारभाव राहील अशी खात्री वाटल्यानेच शेतकऱ्यांनी बेलसर, वाळुंज, निळुंज, साकुर्डे, कोथळे, भोसलेवाडी, राणमळा, धालेवाडी, पारगाव आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. या संपूर्ण परिसरात एक हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड झालेली आहे; मात्र हवामान खात्याचा अंदाज फोल ठरल्याने सर्वत्रच टोमॅटोची पिके जोरदार आल्याने बाजारभावावर मोठा परिणाम झाला आहे.