शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

विद्यार्थ्यांना मिळेना प्रवेश , प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:31 IST

बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यात अडचणी येत आहेत. प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याचे कारण सांगून महाविद्यालयांकडून या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात

पुणे : बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यात अडचणी येत आहेत. प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याचे कारण सांगून महाविद्यालयांकडून या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याची तक्रार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे केली आहे.राज्य शिक्षण मंडळाने मागील आठवड्यात इयत्ता बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्य शासनाच्या निर्णयानुसार या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण व एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया केंद्रीय समितीकडून सुरू आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत नाही. मात्र, प्रथम वर्षाचे प्रवेश महाविद्यालय पातळीवर होतात. या महाविद्यालयांवरील प्रवेशप्रक्रियेवर विद्यापीठाचे नियंत्रण नसते. त्यामुळे सध्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नेमक्या महाविद्यालयात रिक्त जागा आहेत, याची माहिती कुठेही एकत्रित उपलब्ध होत नाही. परिणामी, त्यांना प्रत्येक महाविद्यालयात जाऊन याबाबत विचारणा करावी लागत आहे.काही विद्यार्थी महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांना प्रवेशप्रक्रिया संपल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात घेण्याला काहीच अर्थ राहणार नाही, अशी नाराजी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋषी परदेशी यांनी शुक्रवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेतली व त्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी