शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

विद्यार्थ्यांना मिळेना प्रवेश , प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:31 IST

बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यात अडचणी येत आहेत. प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याचे कारण सांगून महाविद्यालयांकडून या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात

पुणे : बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यात अडचणी येत आहेत. प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याचे कारण सांगून महाविद्यालयांकडून या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याची तक्रार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे केली आहे.राज्य शिक्षण मंडळाने मागील आठवड्यात इयत्ता बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्य शासनाच्या निर्णयानुसार या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण व एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया केंद्रीय समितीकडून सुरू आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत नाही. मात्र, प्रथम वर्षाचे प्रवेश महाविद्यालय पातळीवर होतात. या महाविद्यालयांवरील प्रवेशप्रक्रियेवर विद्यापीठाचे नियंत्रण नसते. त्यामुळे सध्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नेमक्या महाविद्यालयात रिक्त जागा आहेत, याची माहिती कुठेही एकत्रित उपलब्ध होत नाही. परिणामी, त्यांना प्रत्येक महाविद्यालयात जाऊन याबाबत विचारणा करावी लागत आहे.काही विद्यार्थी महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांना प्रवेशप्रक्रिया संपल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात घेण्याला काहीच अर्थ राहणार नाही, अशी नाराजी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋषी परदेशी यांनी शुक्रवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेतली व त्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी