शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

रागामुळे ५ वर्षांनतर फुटली महिलेच्या खुनाला वाचा

By admin | Updated: May 7, 2015 04:58 IST

रागाच्या भरात आरोपीने दिलेल्या कबुलीने तब्बल पाच वर्षापूर्र्वी पाणी भरण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या एका खुनाचा गुन्हा उघडकीस आला़

लोणी काळभोर : रागाच्या भरात आरोपीने दिलेल्या कबुलीने तब्बल पाच वर्षापूर्र्वी पाणी भरण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या एका खुनाचा गुन्हा उघडकीस आला़ याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांना तिघांना अटक केली आहे़ तर दोन आरोपी फरारी आहेत. अजित रावसाहेब सावंत, शांताबाई रावसाहेब सावंत व राजू त्रिंबक चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ बेबीताई विलास मकवाने व गंगूबाई पवार या दोघी फरारी झाल्या आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार हिराबाई उत्तम चव्हाण (वय ५०, रा. गांधनखिळा, फुरसुंगी, ता. हवेली) यांचा खून झाला असून ही घटना १० एप्रिल २०१० रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या संदर्भात विजय उत्तम चव्हाण (वय. २२, रा. गांधणखिळा, फुरसुंगी, ता. हवेली, हल्ली मुक्काम जाधव वस्ती, थेऊर, ता. हवेली ) यांनी हरविल्याची तक्रार दिली होती़ विजय व त्यांचा भाऊ संजय चव्हाण हे गवंडी काम करतात. गांधणखिळा येथे या दोघांसह संजयची पत्नी, विजयची पत्नी, मुले व आई हिराबाई असे सर्व जण राहत होते. पाच वर्षापूर्वी मांढरदेवी काळूबाईचे दर्शन घेऊन आल्यानंतर विजय एका नातेवाईकाबरोबर गवंडी काम करण्यासाठी मुंढवा येथे गेला होता. १२ दिवसांनी परत आल्यावर त्याला आई दिसली नाही म्हणून त्याने चौकशी केली, परंतू आई सापडली नाही. म्हणून त्याने २५ एप्रिल २०१० रोजी लोणी काळभोर पोलिसांकडे आई हरविल्याची तक्रार दाखल केली होती. परंतू तब्बल पाच वर्षे हिराबाईचा तपास लागला नाही. विजयचा भाऊ संजय हा २ मे २०१५ रोजी कवडी गांव येथे काम करत असताना पाच वर्षापूर्वी त्यांच्या शेजारी राहणारा अजित सावंत भेटला. एकमेकांकडे पाहण्यावरुन त्यांच्यात तेव्हा वाद झाला़ तेव्हा तो रागाच्या भरात संजयला म्हणाला की पाच वर्षापूर्र्वी जसे तुझ्या आईला फाशी देऊन मारले, तसेच तुला सुद्धा मारेन. ही हकिकत संजयने विजयला सांगितली़ त्यावर विजयने लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रणजीतसिंग परदेशी, हवालदार दत्तात्रय गिरमकर, गणेश पोटे, बाळासाहेब चोरामले, स्वप्नील अहिवळे, रामदास जगताप यांच्या कडे सोपविला. या पथकाने अजित सावंत याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता ५ वर्षापूर्वी घडलेला खुनाचा प्रकार उघडकीस आला. (वार्ताहर)बेवारस म्हणून अत्यंसंस्कारहिराबाई यांचा मृतदेह कॅनॉलमधून वाहत वाहत सोरतापवाडी येथे गेला़ १२ एप्रिलला तो सापडला़ पोलिसांनी तो ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला़ मात्र, तोपर्यंत हिराबाई हरविल्याची तक्रार नसल्याने या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही़ बेवारस म्हणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़