शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आत्महत्येचं टोक गाठण्यापूर्वी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST

पुणे : “सध्या ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ची खूप चर्चा आहे. आपली प्रतिष्ठा, सुख यांच्या प्रदर्शनाच्या नादात शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण ...

पुणे : “सध्या ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ची खूप चर्चा आहे. आपली प्रतिष्ठा, सुख यांच्या प्रदर्शनाच्या नादात शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण होतो आहे. ताणतणावातून उच्चपदस्थ व्यक्ती, सेलिब्रिटी आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलतात. सामान्य माणसांमध्येही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याचे धाडस वाढते आहे. ‘आयुष्य स्वस्त नाही, सुंदर आहे’ हे विविध माध्यमांमधून समाजमनावर बिंबवणे गरजेचे आहे,” असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अलीकडच्या काळात सुशांत सिंह राजपूत, भैय्यू महाराज, डॉ. शितल आमटे, अशा प्रसिद्ध व्यक्तींनी उचललेले आत्महत्येचे पाऊल धक्कादायक ठरले. यापैकी प्रत्येकाला मोठा अनुयायी वर्ग आहे. या अनुयायांवरही त्यांच्या आत्महत्येसारख्या कृत्यांचा परिणाम होतो का, असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अर्पिता जोशी म्हणाल्या की, आपल्या मनावर ताण आल्यास त्यातून बाहेर पडण्याची गरज असते. जवळच्या लोकांशी संवाद गरजेचा आहेच; मात्र, एखादी गोष्ट कोणाशीच शेअर करता न आल्यास घुसमट होते. अशा वेळी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्यात काहीच गैर नाही. मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याबाबतचा ‘टॅबू’ अजूनही कमी झालेला नाही. मात्र, लोकांना काय वाटते यापेक्षा आपली गरज काय आहे, हे जास्त महत्वाचे आहे. विविध थेरपी आणि औषधोपचारांच्या माध्यमातून नैराश्यावर नक्कीच मात करता येते.

चौकट

“गरजा वाढतात आणि पैसा कमी पडतो. प्रतिष्ठेचे मुखवटे समाजाला दाखवण्याच्या अट्टहासातून ताण निर्माण होतो. संतुलन साधता न आल्यास मानसिक अस्वस्थता येते, आत्मविश्वास कमी होतो. नैराश्याचे रुपांतर आत्महत्येच्या निर्णयात होते. वैयक्तिक गरजा, सामाजिक गरजा, अस्तित्वाची ओळख आणि नेतृत्व या चार पातळयांवर आपले मानसिक द्वंद्व सुरु होते. तुलना न करणे, स्वत:साठी जगण्याची गरज, मानसिक संतुलन गरजेचे आहे. पैसा हे माध्यम आहे, ध्येय नाही. आपल्या आयुष्यावर केवळ आपलाच हक्क आहे, हे स्वत:ला बजावता आले पाहिजे.”

- डॉ. पांडुरंग कदम, एमएस, सायकोथेरपिस्ट