शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

आत्महत्येचं टोक गाठण्यापूर्वी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST

पुणे : “सध्या ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ची खूप चर्चा आहे. आपली प्रतिष्ठा, सुख यांच्या प्रदर्शनाच्या नादात शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण ...

पुणे : “सध्या ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ची खूप चर्चा आहे. आपली प्रतिष्ठा, सुख यांच्या प्रदर्शनाच्या नादात शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण होतो आहे. ताणतणावातून उच्चपदस्थ व्यक्ती, सेलिब्रिटी आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलतात. सामान्य माणसांमध्येही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याचे धाडस वाढते आहे. ‘आयुष्य स्वस्त नाही, सुंदर आहे’ हे विविध माध्यमांमधून समाजमनावर बिंबवणे गरजेचे आहे,” असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अलीकडच्या काळात सुशांत सिंह राजपूत, भैय्यू महाराज, डॉ. शितल आमटे, अशा प्रसिद्ध व्यक्तींनी उचललेले आत्महत्येचे पाऊल धक्कादायक ठरले. यापैकी प्रत्येकाला मोठा अनुयायी वर्ग आहे. या अनुयायांवरही त्यांच्या आत्महत्येसारख्या कृत्यांचा परिणाम होतो का, असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अर्पिता जोशी म्हणाल्या की, आपल्या मनावर ताण आल्यास त्यातून बाहेर पडण्याची गरज असते. जवळच्या लोकांशी संवाद गरजेचा आहेच; मात्र, एखादी गोष्ट कोणाशीच शेअर करता न आल्यास घुसमट होते. अशा वेळी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्यात काहीच गैर नाही. मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याबाबतचा ‘टॅबू’ अजूनही कमी झालेला नाही. मात्र, लोकांना काय वाटते यापेक्षा आपली गरज काय आहे, हे जास्त महत्वाचे आहे. विविध थेरपी आणि औषधोपचारांच्या माध्यमातून नैराश्यावर नक्कीच मात करता येते.

चौकट

“गरजा वाढतात आणि पैसा कमी पडतो. प्रतिष्ठेचे मुखवटे समाजाला दाखवण्याच्या अट्टहासातून ताण निर्माण होतो. संतुलन साधता न आल्यास मानसिक अस्वस्थता येते, आत्मविश्वास कमी होतो. नैराश्याचे रुपांतर आत्महत्येच्या निर्णयात होते. वैयक्तिक गरजा, सामाजिक गरजा, अस्तित्वाची ओळख आणि नेतृत्व या चार पातळयांवर आपले मानसिक द्वंद्व सुरु होते. तुलना न करणे, स्वत:साठी जगण्याची गरज, मानसिक संतुलन गरजेचे आहे. पैसा हे माध्यम आहे, ध्येय नाही. आपल्या आयुष्यावर केवळ आपलाच हक्क आहे, हे स्वत:ला बजावता आले पाहिजे.”

- डॉ. पांडुरंग कदम, एमएस, सायकोथेरपिस्ट