शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नववीचीही जूनमध्ये होणार फेरपरीक्षा, अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 05:28 IST

शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांनी जून २०१८मध्ये फेरपरीक्षा घेऊन त्यांना आणखी एक संधी देण्याचे परिपत्रक माध्यमिकचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी शनिवारी काढले. यामुळे इयत्ता नववीमध्ये मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

पुणे : शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांनी जून २०१८मध्ये फेरपरीक्षा घेऊन त्यांना आणखी एक संधी देण्याचे परिपत्रक माध्यमिकचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी शनिवारी काढले. यामुळे इयत्ता नववीमध्ये मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.प्रगत शैक्षणिक धोरणांतर्गत सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता ९ वीत अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जावी, याबाबतचे परिपत्रक शिक्षण संचालकांनी काढले आहे. सर्व विभागीय उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, मुंबईतील शिक्षण निरीक्षक यांना या आदेशाची प्रत देण्यात आली असून त्यांच्या अदिनस्त असलेल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाल्यानंतर जून २०१८ च्या शेवटच्या आठवडयात फेरपरीक्षेचे आयोजन केले जावे. केवळ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच ही फेरपरीक्षा देता येईल.फेरपरीक्षेसाठी मूल्यमापन पध्दती इयत्ता ९ वी मध्ये असलेल्या सरासरी पध्दतीप्रमाणेच राहील. मानसिकदृष्टया दिव्यांग असलेल्या ८० टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वीतील मूलभूत संबोधांवर आधारीत प्रश्नपत्रिका आवश्यकता भासल्यास तयार करावी. गंभीर आजाराने (कॅन्सर इत्यादी) पिडीत विद्यार्थ्यांना मानसिकदृष्टया दिव्यांगांसाठी तयार केलेल्या मूलभूत संबोध प्रश्नावलीची सवलत देण्यात यावी.नापास करण्याला बसेल आळाविद्यार्थ्यांना इयत्ता ८ वीपर्यंत नापास करता येत नाही; त्यामुळे ९ वीमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने नापास करण्याचे प्रमाण शाळांमध्ये जास्त आहे. दहावीत शाळेचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून विद्यार्थी थोडा जरी मागे पडला तर त्याला नापास केले जाते. विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळाल्याने नववीत नापास होणाºयांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :examपरीक्षा