शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नववीचीही जूनमध्ये होणार फेरपरीक्षा, अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 05:28 IST

शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांनी जून २०१८मध्ये फेरपरीक्षा घेऊन त्यांना आणखी एक संधी देण्याचे परिपत्रक माध्यमिकचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी शनिवारी काढले. यामुळे इयत्ता नववीमध्ये मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

पुणे : शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांनी जून २०१८मध्ये फेरपरीक्षा घेऊन त्यांना आणखी एक संधी देण्याचे परिपत्रक माध्यमिकचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी शनिवारी काढले. यामुळे इयत्ता नववीमध्ये मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.प्रगत शैक्षणिक धोरणांतर्गत सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता ९ वीत अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जावी, याबाबतचे परिपत्रक शिक्षण संचालकांनी काढले आहे. सर्व विभागीय उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, मुंबईतील शिक्षण निरीक्षक यांना या आदेशाची प्रत देण्यात आली असून त्यांच्या अदिनस्त असलेल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाल्यानंतर जून २०१८ च्या शेवटच्या आठवडयात फेरपरीक्षेचे आयोजन केले जावे. केवळ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच ही फेरपरीक्षा देता येईल.फेरपरीक्षेसाठी मूल्यमापन पध्दती इयत्ता ९ वी मध्ये असलेल्या सरासरी पध्दतीप्रमाणेच राहील. मानसिकदृष्टया दिव्यांग असलेल्या ८० टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वीतील मूलभूत संबोधांवर आधारीत प्रश्नपत्रिका आवश्यकता भासल्यास तयार करावी. गंभीर आजाराने (कॅन्सर इत्यादी) पिडीत विद्यार्थ्यांना मानसिकदृष्टया दिव्यांगांसाठी तयार केलेल्या मूलभूत संबोध प्रश्नावलीची सवलत देण्यात यावी.नापास करण्याला बसेल आळाविद्यार्थ्यांना इयत्ता ८ वीपर्यंत नापास करता येत नाही; त्यामुळे ९ वीमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने नापास करण्याचे प्रमाण शाळांमध्ये जास्त आहे. दहावीत शाळेचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून विद्यार्थी थोडा जरी मागे पडला तर त्याला नापास केले जाते. विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळाल्याने नववीत नापास होणाºयांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :examपरीक्षा