शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

नववीचीही जूनमध्ये होणार फेरपरीक्षा, अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 05:28 IST

शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांनी जून २०१८मध्ये फेरपरीक्षा घेऊन त्यांना आणखी एक संधी देण्याचे परिपत्रक माध्यमिकचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी शनिवारी काढले. यामुळे इयत्ता नववीमध्ये मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

पुणे : शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांनी जून २०१८मध्ये फेरपरीक्षा घेऊन त्यांना आणखी एक संधी देण्याचे परिपत्रक माध्यमिकचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी शनिवारी काढले. यामुळे इयत्ता नववीमध्ये मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.प्रगत शैक्षणिक धोरणांतर्गत सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता ९ वीत अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जावी, याबाबतचे परिपत्रक शिक्षण संचालकांनी काढले आहे. सर्व विभागीय उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, मुंबईतील शिक्षण निरीक्षक यांना या आदेशाची प्रत देण्यात आली असून त्यांच्या अदिनस्त असलेल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाल्यानंतर जून २०१८ च्या शेवटच्या आठवडयात फेरपरीक्षेचे आयोजन केले जावे. केवळ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच ही फेरपरीक्षा देता येईल.फेरपरीक्षेसाठी मूल्यमापन पध्दती इयत्ता ९ वी मध्ये असलेल्या सरासरी पध्दतीप्रमाणेच राहील. मानसिकदृष्टया दिव्यांग असलेल्या ८० टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वीतील मूलभूत संबोधांवर आधारीत प्रश्नपत्रिका आवश्यकता भासल्यास तयार करावी. गंभीर आजाराने (कॅन्सर इत्यादी) पिडीत विद्यार्थ्यांना मानसिकदृष्टया दिव्यांगांसाठी तयार केलेल्या मूलभूत संबोध प्रश्नावलीची सवलत देण्यात यावी.नापास करण्याला बसेल आळाविद्यार्थ्यांना इयत्ता ८ वीपर्यंत नापास करता येत नाही; त्यामुळे ९ वीमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने नापास करण्याचे प्रमाण शाळांमध्ये जास्त आहे. दहावीत शाळेचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून विद्यार्थी थोडा जरी मागे पडला तर त्याला नापास केले जाते. विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळाल्याने नववीत नापास होणाºयांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :examपरीक्षा