शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

रथास साखरे, शिंदेंची बैलजोडी

By admin | Updated: June 16, 2015 00:22 IST

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलैला होणार असून, या पालखी सोहळ्याच्या पालखी रथाला

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलैला होणार असून, या पालखी सोहळ्याच्या पालखी रथाला जुंपल्या जाणाऱ्या बैलजोडीचा मान हिंजवडीच्या गणेश सुरेश साखरे (रा. हिंजवडी, ता. मुळशी) यांच्या हिरा-तुरा व गणेश गोविंद शिंदे (रा. वडगाव शिंदे, ता. हवेली) यांच्या राजा व सुंदर या पांढऱ्या शुभ्र खिलारी जातीच्या बैलजोडीला मिळाला आहे. सांगुर्डी (ता. खेड) येथील प्रगतिशील शेतकरी अर्जुन तुकाराम भसे यांच्या बैलजोडीला चौघड्याच्या गाडीला जुंपण्याचा मान मिळाला आहे. या बैलजोडीची निवड पालखी सोहळ्याचे प्रमुख सुनीलमहाराज दिगंबर मोरे, अभिजितमहाराज बाळासाहेब मोरे व जालिंदरमहाराज मोरे यांच्या निवड समितीने केली आहे. या वेळी संस्थानचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे, विश्वस्त अशोक निवृत्ती मोरे, सुनीलमहाराज दामोदर मोरे आदी उपस्थित होते. पालखी रथाला जुंपण्यात येणाऱ्या बैलजोडीची या निवड समितीने जिल्ह्यातील १० बैलजोडींतून या बैलांची चाल, वशिंड, खूर, शेपटी, शिंगे, बैलांची क्षमता व ताकद, उंची पाहून व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने तपासणी अहवालानुसार व बैलांच्याबद्दल जाण असणाऱ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने या बैलजोडींची निवड करण्यात आल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी दिली. चौघड्याच्या गाडीसाठी मात्र अर्जुन भसे यांचा एकमेव अर्ज आलेला होता. त्यामुळे तो मान त्यांना देण्यात आला. सध्या या बैलांना चालण्याचा सराव, शेंगदाणा पैंड, विलायती घास गवत यांसारखा खुराक देण्यात येत असून, त्यांना चालण्याचा सराव देण्यात येत आहे. पालखी सोहळा काळात एखादा बैल आजारी झाल्यास अथवा अनुचित प्रकार घडल्यास त्याच्या ऐवजी सक्षम बैलाची व्यवस्था संबंधित मानकरी बैलजोडीमालक करू शकतात. पोलिसांना पालखी मार्गावर नेमका कधी व कोठे बंदोबस्त लावला पाहिजे, त्याचा अंदाज येणार असून, वाहतुकीची कोंडी टाळता येणार आहेत. प्रशासनाला योग्य वेळेत योग्य ठिकाणी सोयी-सुविधा पुरविण्यास वेळेचा अंदाज बांधता येणार आहे. यासाठी हे अ‍ॅप विकसित करण्यात येत असल्याची माहिती अभिजित मोरे यांनी दिली. (वार्ताहर)एका व्यक्तीने एक झाड बांधावर लावावेपालखी वर्षी ग्लोबल वॉर्मिंगमुळे सततच्या हवामानातील बदलामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना भविष्यात अधिक संकटाला सामोरे जावू लागू नये म्हणून श्री संत तुकाराम महाराजांची अभंगवाणी सत्यात अवतरण्यासाठी आणि शासनाच्या वृक्षसंवर्धन योजनेला सहकार्य करण्यासाठी वारीत सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना, वारकऱ्यांना व पालखी मार्गावरील शेतकऱ्यांना एक व्यक्ती एक झाड आपल्या बांधावर लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी संस्थानला पिंपरी-चिंचवड महापालिका व आणखी काही सेवाभावी संस्थांच्या वतीने चिंच, आंबा, वड, लिंब यांसारख्या सावली देणाऱ्या या झाडांची रोपे देण्यात येणार आहेत. ती रोपे शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर लावावीत व ती वाढवावीत. पुढील वर्षी यापैकी किमान निम्मी झाडे तरी जगली पाहिजेत. ज्यांना रोपे लगेच लावणे शक्य नाही, त्यांना विविध वृक्षांच्या बियांचे वाटप करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र अ‍ॅपश्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने विविध योजना आखल्या जात असून, त्यांचे साहित्य व त्यांचे विचार प्रत्येक व्यक्तीच्या हातात पडावे यासाठी गतवर्षी व्हर्चुअल दिंडी इंटरनेटद्वारा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. या वर्षी वारीमध्ये पालखीचा रथ नेमका कोठे आहे, कोणत्या रस्त्याने जात आहे, हे भाविकांना नेमकेपणाने कळावे यासाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या वंशातील स्वप्निल मोरे हे एक अ‍ॅप विकसित करीत असून, पालखी सोहळ्यापूर्वी ते सर्वांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पालखीच्या रथाला जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. याद्वारे भाविकांना पालखी रथ कोणत्या रस्त्यावर, काणत्या मार्गाने जात आहे, याची नेमकी माहिती दाखविणारे चिन्ह मोबाईलवर दिसणार आहे. याचा फायदा पोलीस यंत्रणेला, प्रशासकीय यंत्रणेला होणार आहे.