शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

राज्यसभा सदस्यत्व माझ्यासाठी सर्वांत वाईट काळ- अनु आगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 03:18 IST

'आयुष्याची सहा वर्षे वाया गेली, शत्रूही संसदेत बसू नये'

पुणे : राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी हा माझ्यासाठी सर्वांत वाईट काळ होता. माझ्या आयुष्याची सहा वर्षे तिथे वाया गेली. संसदेत कोणीही एकमेकांचा आदर करत नाही. शत्रूवरही संसदेत बसण्याची वेळ येऊ नये, अशा शब्दांत उद्योजिका आणि समाजसेविका अनु आगा यांनी निशाणा साधला. मतदारांनी योग्य आणि सक्षम लोकप्रतिनिधींचीच निवड करायला हवी. आपण ज्यांना निवडून दिले आहे, त्यांना परखडपणे प्रश्न विचारायला हवेत. योग्य राज्यकर्ते असतील तरच देशाचे भविष्य उज्ज्वल असेल, असा सल्लाही त्यांनी दिला. त्या २०१२ ते २०१८ या काळात राज्यसभेच्या सदस्य होत्या.जनसेवा फाउंडेशनतर्फे ‘मीट द स्टॉलवर्ट, भेटू या एका दिग्गजाला’ या कार्यक्रमांतर्गत अनु आगा यांची प्रकट मुलाखत पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यभेचे खासदार आणि अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विकफिल्ड ग्रुपचे चेअरमन बहारी बी.आर. मल्होत्रा होते. या वेळी डॉ. शां. ब. मुजुमदार, जॅकी मल्होत्रा, कृष्णकुमार गोयल, मोहन जोशी, विजय सराफ, संजय सिन्हा, विनोद शहा, राजेश शहा उपस्थित होते.‘मी कधीच टीव्ही पाहत नाही, तर पुस्तकांमध्ये रमते. आपण प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा प्रत्येकाचे आयुष्य जगू शकत नाही. मात्र, हा अनुभव पुस्तकांमधून मिळतो. पुस्तक हे सर्वात छान मित्र असतात. माझ्यावर महात्मा गांधीजी आणि माझे पती रोहिंटन आगा यांचा खूप प्रभाव आहे’, याकडेही आगा यांनी लक्ष वेधले.जनसेवा फाउंडेशनचे विनोद शहा यांनी प्रास्ताविक केले. आगा यांची मुलाखत नीरजा आपटे आणि डॉ. वर्धमान जैन यांनी घेतली. प्रा. जे. पी. देसाई आणि विवेक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.आपण नेहमीच स्वत:ला कमी लेखतो. आधी स्वत:वर विश्वास ठेवायला शिका. प्रत्येक सामान्य व्यक्तीमध्ये असामान्यत्व दडलेले असते. या असामान्यत्वाचा शोध आपणच लावायला हवा. त्याचवेळी मी असामान्य आहे, ही भावना आपल्यावर स्वार होता कामा नये. आयुष्यात किंवा व्यवसायात चढता आलेख, लाभ महत्त्वाचा असतो. मात्र, केवळ त्यावर लक्ष केंद्रित करुन चालणार नाही. आयुष्याचे ध्येय जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे कोठे स्वल्पविराम, पूर्णविराम द्यायचा, हे आपले आपणच ठरवायला हवे.- अनु आगाकाय म्हणाल्या अनु आगा?पूर्वी कंपन्या कर्मचाऱ्यांच्या निष्ठेवर विश्वास ठेवत. आता कार्यक्षमता पाहिली जाते.स्वत:साठी काही केल्यास मिळणारा आनंद तात्पुरता असतो. इतरांना मदत करण्यातून मिळणारा आनंद चिरंतन असतो. पैशांचीच मदत गरजेची नसते. आपले ज्ञान, कौैशल्य, वेळही इतरांसाठी देता येतो.कुटुंबासाठी दिलेला वेळहीखूप आनंद देतो.काही जण ८५-९० वर्षांचे होईपर्यंत खुर्चीला चिकटून राहतात. लोकांना असे लोक नकोसे होतात. लोक आपल्यावर प्रेम करतात, तोपर्यंतच निवृत्त झाले पाहिजे.आतापर्यंत पुरुषप्रधान संस्कृती पाहायला मिळत होती. आता परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे पुरुषांनी स्त्रियांना गृहीत धरु नये.