शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगरकरांची शौैचालयाच्या दुर्गंधीतून होणार मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:15 IST

राजगुरुनगरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. सार्वजनिक ठिकाणी शौैचालयाच्या दुर्गंधीतून त्यांची मुक्तता होणार आहे. या ठिकाणी नगरपालिकेने दुर्गंधीविरहित सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

राजगुरुनगर : राजगुरुनगरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. सार्वजनिक ठिकाणी शौैचालयाच्या दुर्गंधीतून त्यांची मुक्तता होणार आहे. या ठिकाणी नगरपालिकेने दुर्गंधीविरहित सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वीजबचत तसेच पाणीबचतही होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी दिली.राजगुरुनगर शहरात वाडा रस्त्यावर प्रांत कार्यालय, खेड पंचायत समिती चौक, दिलावर खान दर्गा, गढई मैदान बाजार, नगर परिषद बाजारतळ, स्मशानभूमी, पाबळ रोड, तिन्हेवाडी रोड, मासे बाजार आदी ठिकाणी ‘दुर्गंधीविरहित सार्वजनिक स्वच्छतागृहे’ ठेवण्यात येणार आहेत.राजगुरुनगरमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या नगण्य आहे. गावाची लोकसंख्या आणि आकारमान तर वाढलेच; त्याचबरोबर दळणवळणही खूप वाढले आहे. त्याप्रमाणात स्वच्छतागृहांची संख्या वाढली नाहीच. उलट, आधी काही ठिकाणी असलेली स्वच्छतागृहे लोकांनी पाडून टाकली आहेत. अनेक सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छतागृहे नाहीत. जी काही उरली आहेत तेथे लोकांनी नळ तोडून, भांडी तोडून, दगडगोटे टाकून त्यांची दुरवस्था केली आहे. त्यामुळे तिथे खूप दुर्गंधी असते. या परिस्थितीमुळे लोकांची फार अडचण होते.राजगुरुनगर शहरातील ही समस्या ओळखून नगर परिषदेने पुढाकार घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुण्यातील एका कंपनीने बनविलेली अत्याधुनिक स्वच्छतागृहे ठिकठिकाणी बसविण्याचा विचार नगरसेवकांपुढे ठेवला. सर्वांनी त्याला मान्यता दिली.>स्वच्छतागृहाच्या संचावर सौरपत्रे बसविण्यात आल्याने स्वतंत्र वीजचे गरज नाहीमुतारीची भांडी नवीन ‘जेलयुक्त’ तंत्रज्ञान वापरून बनविली आहेत. त्यामुळे पाणी वापरण्याची गरज राहत नाही, तसेच दुर्गंधी राहत नाही. हे विशिष्ट ‘जेल’ तीन-चार महिन्यांनी पुन्हा भरता येते.या स्वच्छतागृहाच्या भिंती उष्णतारोधक पदार्थाने बनविलेल्या असल्यामुळे पत्रा किंवा ‘फायबर’ भिंतींसारख्या असल्याने तापत नाहीत. शिवाय, या भिंती मजबूत असल्याने सहजासहजी तोडता येत नाहीत.या स्वच्छतागृहाच्या संचावर सौरपत्रे बसविण्यात आले आहेत; त्यामुळे त्या संचाला विजेची गरज नाही. शौचालयात स्टीलची भांडी वापरण्यात आल्याने ती सुलभतेने स्वच्छ करता येतात.या संचांमध्ये मुळातच पाईपला जोडलेले नळ बसविण्यात आल्याने ते चोरट्यांना खोलूननेता येत नाहीत. संचाचातळ अल्युमिनियमचा, तसेच आतील बाजू मार्बलसारख्या डिझाईनची आहे.