शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

राजगुरुनगरकरांची शौैचालयाच्या दुर्गंधीतून होणार मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:15 IST

राजगुरुनगरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. सार्वजनिक ठिकाणी शौैचालयाच्या दुर्गंधीतून त्यांची मुक्तता होणार आहे. या ठिकाणी नगरपालिकेने दुर्गंधीविरहित सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

राजगुरुनगर : राजगुरुनगरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. सार्वजनिक ठिकाणी शौैचालयाच्या दुर्गंधीतून त्यांची मुक्तता होणार आहे. या ठिकाणी नगरपालिकेने दुर्गंधीविरहित सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वीजबचत तसेच पाणीबचतही होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी दिली.राजगुरुनगर शहरात वाडा रस्त्यावर प्रांत कार्यालय, खेड पंचायत समिती चौक, दिलावर खान दर्गा, गढई मैदान बाजार, नगर परिषद बाजारतळ, स्मशानभूमी, पाबळ रोड, तिन्हेवाडी रोड, मासे बाजार आदी ठिकाणी ‘दुर्गंधीविरहित सार्वजनिक स्वच्छतागृहे’ ठेवण्यात येणार आहेत.राजगुरुनगरमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या नगण्य आहे. गावाची लोकसंख्या आणि आकारमान तर वाढलेच; त्याचबरोबर दळणवळणही खूप वाढले आहे. त्याप्रमाणात स्वच्छतागृहांची संख्या वाढली नाहीच. उलट, आधी काही ठिकाणी असलेली स्वच्छतागृहे लोकांनी पाडून टाकली आहेत. अनेक सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छतागृहे नाहीत. जी काही उरली आहेत तेथे लोकांनी नळ तोडून, भांडी तोडून, दगडगोटे टाकून त्यांची दुरवस्था केली आहे. त्यामुळे तिथे खूप दुर्गंधी असते. या परिस्थितीमुळे लोकांची फार अडचण होते.राजगुरुनगर शहरातील ही समस्या ओळखून नगर परिषदेने पुढाकार घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुण्यातील एका कंपनीने बनविलेली अत्याधुनिक स्वच्छतागृहे ठिकठिकाणी बसविण्याचा विचार नगरसेवकांपुढे ठेवला. सर्वांनी त्याला मान्यता दिली.>स्वच्छतागृहाच्या संचावर सौरपत्रे बसविण्यात आल्याने स्वतंत्र वीजचे गरज नाहीमुतारीची भांडी नवीन ‘जेलयुक्त’ तंत्रज्ञान वापरून बनविली आहेत. त्यामुळे पाणी वापरण्याची गरज राहत नाही, तसेच दुर्गंधी राहत नाही. हे विशिष्ट ‘जेल’ तीन-चार महिन्यांनी पुन्हा भरता येते.या स्वच्छतागृहाच्या भिंती उष्णतारोधक पदार्थाने बनविलेल्या असल्यामुळे पत्रा किंवा ‘फायबर’ भिंतींसारख्या असल्याने तापत नाहीत. शिवाय, या भिंती मजबूत असल्याने सहजासहजी तोडता येत नाहीत.या स्वच्छतागृहाच्या संचावर सौरपत्रे बसविण्यात आले आहेत; त्यामुळे त्या संचाला विजेची गरज नाही. शौचालयात स्टीलची भांडी वापरण्यात आल्याने ती सुलभतेने स्वच्छ करता येतात.या संचांमध्ये मुळातच पाईपला जोडलेले नळ बसविण्यात आल्याने ते चोरट्यांना खोलूननेता येत नाहीत. संचाचातळ अल्युमिनियमचा, तसेच आतील बाजू मार्बलसारख्या डिझाईनची आहे.