शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

राजगुरुनगर-मंचर महामार्ग नव्हे, मंदमार्ग

By admin | Updated: July 10, 2015 01:12 IST

पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर राजगुरुनगर ते मंचरदरम्यान वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे महामार्ग चर्चेत आला आहे.

पेठ : पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर राजगुरुनगर ते मंचरदरम्यान वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे महामार्ग चर्चेत आला आहे. या मार्गावर होणारे अपघात व वाहतूककोंडी यांमुळे वाहतूक मंदावत आहे. चौपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक व प्रवासी करीत आहेत.वाहतूक खात्याचे दुर्लक्ष व वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्याची वाहनचालकांची प्रवृत्ती यांमुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढतच आहे. या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या किंवा गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे लक्षात येते. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वेगाने वाढणाऱ्या चार ते पाच वर्षांच्या तुलनेत सध्या वाहनांची संख्या ही वाढतच आहे. या महामार्गावर वेगाने वाढणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीला मर्यादा पडत आहेत. त्यातच अवजड वाहनांचे प्रमाणदेखील प्रचंड वाढले आहे. त्यामुळे या घाटात वारंवार अपघात होतात. या दोन्ही घाटांतील रस्ता हा अरुंद असून वळणे नागमोडी आहेत. त्यामुळे सध्या पडलेले खड्डे चुकवण्याच्या नादात या ठिकाणी अपघात होतात. खेड घाटात तर दरड कोसळण्यासारखे प्रकारदेखील घडत आहेत. पुणे ते आळेफाट्यादरम्यान औद्योगिक क्षेत्राचा विस्तार प्रचंड वेगाने होत आहे. पुणे ते नाशिक रेल्वेमार्ग झाल्यास रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. परंतु, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. (वार्ताहर)> लग्नसराईच्या हंगामात राजगुरुनगर व मंचर येथे वाहतुकीच्या खोळंबा होतो. अवजड वाहने व कंटेनर यांना दिवसा या महामार्गावरून ये-जा करण्यास बंदी घालावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. काही दिवसांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या ठिकाणी रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे काढण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाने सपाटाच लावला आहे. लवकरात लवकर या महामार्गाचे संपूर्ण चौपदरीकरण झाल्यानंतर अपघातांच्या संख्येत निश्चितच घट होईल व अपघातांमध्ये जाणारे जीव वाचतील व नागरिक-प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल.