शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धरणक्षेत्रांत पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 05:51 IST

जिल्ह्यातील सर्वच धरण पाणलोट क्षेत्रांत गुरुवारी (दि. ३१) पावसाने विश्रांती घेतली. मात्र, चार दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे तब्बल १४ धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा

पुणे : जिल्ह्यातील सर्वच धरण पाणलोट क्षेत्रांत गुरुवारी (दि. ३१) पावसाने विश्रांती घेतली. मात्र, चार दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे तब्बल १४ धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५४.९४ अब्ज घनफूट (१०२.५६ टक्के) झाला होता. त्यामुळे बुधवारी उजनीतून ६५ हजार क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले.खडकवासला प्रकल्प साखळीतील वरसगाव धरण गुरुवारी शंभर टक्के भरले असून, पाणीसाठा १२.८२ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. पानशेतमध्ये १०.६५ आणि खडकवासला येथे १.९७ टीएमसी (दोन्ही शंभर टक्के) पाणीसाठा झाला असून, टेमघरमध्ये १.९१ टीएमसी (५१.५८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणांत मिळून २७.३६ टीएमसी (९३.८४ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात या प्रकल्पात २८.७९ टीएमसी (९८.४८ टक्के) पाणीसाठा होता.जिल्ह्यातील २४ धरणांपैकी १२ धरणे शंभर टक्के भरली असून, ८ धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात माणिकडोह धरणात ७.५२ टीएमसी (७३.९५ टक्के) आणि पिंपळगाव जोगे धरणात ३.०२ टीएमसी (७७.७५ टक्के) पाणीसाठा आहे. 1 जिल्ह्यातील तब्बल १४ धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने उजनीच्या साठ्यात गेल्या ५ दिवसांत १७ टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे उजनीतून गुरुवारी ६५ हजार क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले.2उजव्या कालव्यातून ३ हजार आणि बंद वाहिनीतून ९०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. उजनी संपूर्ण भरल्याने सोलापूरची पुढील दोन वर्षांची पाणीटंचाई दूर झाल्याचे मानण्यात येत आहे.3कृष्णा खोºयातील कोयना धरणात ९५.४ टीएमसी (९४.९२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र पाहता हे धरणदेखील लवकरच भरेल, अशी चिन्हे आहेत. या खोºयांत धोम धरणात ९.७४ (८३.३१ टक्के) सर्वांत कमी पाणीसाठा असून, इतर धरणे जवळपास भरली आहेत.