शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

पावसाने घर, अंगणवाडीची पडझड

By admin | Updated: May 7, 2015 04:48 IST

आंबवडे खोऱ्यातील टिटेघर या गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळाखोल्या, अंगणवाडी इमारत व गावातील १० ते १५ घरांची छत उडून गेली.

भोर : आंबवडे खोऱ्यातील टिटेघर या गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळाखोल्या, अंगणवाडी इमारत व गावातील १० ते १५ घरांची छत उडून गेली. पावसाने झोडपल्याने विद्युतवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.काल सायंकाळी पावणेचार वाजता टिटेघर गावाच्या डोंगराच्या बाजूकडून आलेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने टिटेघर येथील जिल्हा परिषदेच्या चार प्राथमिक शाळाखोल्या, अंगणवाडी इमारत व गावातील १० ते १५ घरांचे छत उडून गेले. शाळेतील व अंगणवाडीतील फर्निचर, सहित्याची मोडतोड झाली आहे. घरांचे छप्पर उडाल्याने धान्य, कपड्यांसह इतर सहित्य खराब झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे विद्युतप्रवाह वाहून नेणाऱ्या तारा तुटल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे जिल्हा परिषदेची शाळा आयएसओ करण्यासाठी शाळेची रंगरंगोटी करून सजावट करण्यात आली होती. मात्र, शाळेचे छप्पर उडून भिंतीला तडे गेल्याने शाळेच्या चारही वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन शाळाखोल्या करणे गरजेचे असून घरांची नुकसानभरपाई मिळावी, असे ग्रामस्थ व राजीव केळकर यांनी केली आहे.तहसीलदार राम चोबे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मंडलाधिकारी व तलाठी यांना दिले असून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. दरम्यान, काल गटविकास अधिकारी संजीव गायकवाड व जिल्हा परिषदेच्या सदस्या गितांजली आंबवले यांनी टिटेघर गावातील शाळा, घरे यांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी आनंदराव आंबवले व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)तारा तुटल्याने गाव अंधारात> पावसाने नुकसान झालेल्या टिटेघर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा व अंगणवाडीचा नुकसानीचा अहवाल घेऊन त्यानुसार दुरुस्ती किंवा नवीन शाळा जिल्हा परिषदेकडून मंजूर करून घेऊ, असे या भागाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या गीतांजली आंबवले यांनी सांगितले.> दरम्यान, कालच्या पावसाने गावातील विजेच्या तारा तुटून खांब वाकले होते. यामुळे गाव अंधारात आहे. याची त्वरित दखल घेत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गावात काम करीत आहेत. आज वीजपुरवठा सुरळीत होईल, असे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता विलास शिर्के यांनी सांगितले. > टिटेघर गावात काल मुसळधार पाऊस व वादळी वारा झाला. या वेळी गावातील तीन लग्ने व एक साखरपुडा असल्याने सर्व नागरिक बाहेरगावी गेले होते. त्यामुळे गावात काही मोजकेच लोक होते. यामुळे सदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. > वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटून जमिनीवर पडल्या होत्या. त्याचा शॉक लागून जीवितहानी झाली असती; मात्र याचे प्रसंगावधान राखून संदीप मारुती नवघणे याने डीपीतील फ्यूज काढल्याने ती झाली नाही.> वडतुंबी येथील एका लग्नाचा मंडप वादळी वाऱ्यामुळे अचानक पडल्याने संपूर्ण वऱ्हाड मंडपाखाली सापडले. त्या वेळी प्रसंगावधान राखून छत फाडून लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.