शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

पावसाने घर, अंगणवाडीची पडझड

By admin | Updated: May 7, 2015 04:48 IST

आंबवडे खोऱ्यातील टिटेघर या गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळाखोल्या, अंगणवाडी इमारत व गावातील १० ते १५ घरांची छत उडून गेली.

भोर : आंबवडे खोऱ्यातील टिटेघर या गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळाखोल्या, अंगणवाडी इमारत व गावातील १० ते १५ घरांची छत उडून गेली. पावसाने झोडपल्याने विद्युतवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.काल सायंकाळी पावणेचार वाजता टिटेघर गावाच्या डोंगराच्या बाजूकडून आलेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने टिटेघर येथील जिल्हा परिषदेच्या चार प्राथमिक शाळाखोल्या, अंगणवाडी इमारत व गावातील १० ते १५ घरांचे छत उडून गेले. शाळेतील व अंगणवाडीतील फर्निचर, सहित्याची मोडतोड झाली आहे. घरांचे छप्पर उडाल्याने धान्य, कपड्यांसह इतर सहित्य खराब झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे विद्युतप्रवाह वाहून नेणाऱ्या तारा तुटल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे जिल्हा परिषदेची शाळा आयएसओ करण्यासाठी शाळेची रंगरंगोटी करून सजावट करण्यात आली होती. मात्र, शाळेचे छप्पर उडून भिंतीला तडे गेल्याने शाळेच्या चारही वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन शाळाखोल्या करणे गरजेचे असून घरांची नुकसानभरपाई मिळावी, असे ग्रामस्थ व राजीव केळकर यांनी केली आहे.तहसीलदार राम चोबे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मंडलाधिकारी व तलाठी यांना दिले असून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. दरम्यान, काल गटविकास अधिकारी संजीव गायकवाड व जिल्हा परिषदेच्या सदस्या गितांजली आंबवले यांनी टिटेघर गावातील शाळा, घरे यांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी आनंदराव आंबवले व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)तारा तुटल्याने गाव अंधारात> पावसाने नुकसान झालेल्या टिटेघर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा व अंगणवाडीचा नुकसानीचा अहवाल घेऊन त्यानुसार दुरुस्ती किंवा नवीन शाळा जिल्हा परिषदेकडून मंजूर करून घेऊ, असे या भागाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या गीतांजली आंबवले यांनी सांगितले.> दरम्यान, कालच्या पावसाने गावातील विजेच्या तारा तुटून खांब वाकले होते. यामुळे गाव अंधारात आहे. याची त्वरित दखल घेत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गावात काम करीत आहेत. आज वीजपुरवठा सुरळीत होईल, असे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता विलास शिर्के यांनी सांगितले. > टिटेघर गावात काल मुसळधार पाऊस व वादळी वारा झाला. या वेळी गावातील तीन लग्ने व एक साखरपुडा असल्याने सर्व नागरिक बाहेरगावी गेले होते. त्यामुळे गावात काही मोजकेच लोक होते. यामुळे सदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. > वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटून जमिनीवर पडल्या होत्या. त्याचा शॉक लागून जीवितहानी झाली असती; मात्र याचे प्रसंगावधान राखून संदीप मारुती नवघणे याने डीपीतील फ्यूज काढल्याने ती झाली नाही.> वडतुंबी येथील एका लग्नाचा मंडप वादळी वाऱ्यामुळे अचानक पडल्याने संपूर्ण वऱ्हाड मंडपाखाली सापडले. त्या वेळी प्रसंगावधान राखून छत फाडून लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.