शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्ह्यातील धरणांत पाऊस पडेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 04:59 IST

गेल्या काही महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामासाठी वरसगाव आणि टेमघर या धरणांतील पूर्ण पाणी सोडण्यात आले होते; मात्र या धरणांमध्ये पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र धरण क्षेत्रात अद्याप पावसाने जोर धरला नसल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे पावसाआभावी कोरडीच आहेत.

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामासाठी वरसगाव आणि टेमघर या धरणांतील पूर्ण पाणी सोडण्यात आले होते; मात्र या धरणांमध्ये पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र धरण क्षेत्रात अद्याप पावसाने जोर धरला नसल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे पावसाआभावी कोरडीच आहेत.पुण्यातील धरण परिसरात पाऊस तुरळक आहे. गेल्या महिनाभरात टेमघर वगळता अन्य धरणांमध्ये पावसाने दडी मारली आहे. जलसंपदा विभागाकडून टेमघर आणि वरसगाव या दोन्ही धरणांमध्ये दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीसाठा केला जात नव्हता; परंतु धरणाची दुरुस्तीची कामे झाली असल्याने या धरणांमध्ये पाणीसाठा करण्यास सुरुवात केली आहे.जलसंपदा विभागाने पावसाचा आढावा घेतला असून, एक जूनपासून टेमघर धरणाच्या परिसरात महिनाभरात सुमारे ५०५ मि.मी. पाऊस झाला. वरसगाव आणि पानशेत धरण क्षेत्रात प्रत्येकी सुमारे ३२९ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात सुमारे १६१ मि.मी. पाऊस झाला आहे. खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा वाढल्याशिवाय पुणे शहराचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. दरम्यान, पवना, नीरा देवधर आणि उजनीच्या क्षेत्रात सरासरी ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.टेमघर आणि वरसगाव या धरणांमध्ये पाणी साठविण्यास सुरुवात झाली असली, तरी वरसगाव धरण कोरडेच आहे. उपयुक्त पाणीसाठा हा अजूनही शून्य टक्के आहे. टेमघर धरणामध्ये ०.१६ टीएमसी पाणी आहे. पानशेतमध्ये सुमारे २.७४ टीएमसी पाणी असून, वरसगाव आणि पानशेत या धरणांमध्ये पाणीसाठा वाढत नसल्याने खडकवासला धरणाचीही पातळी खालावली आहे. खडकवासलामध्ये सध्या सुमारे ०.६६ टीएमसी पाणीसाठा आहे.धरणांतील पाणीसाठाभामा आसखेड २.५६पवना १.८२टेमघर ०.१६वरसगाव ०.००पानशेत २.७४खडकवासला ०.६६नीरा देवधर १.१७भाटघर २.८३वीर १.२०उजनी (- १०.४४)

टॅग्स :Puneपुणे