शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नववर्षाच्या सुरुवातीलाच पाणी पाणी रे!

By admin | Updated: November 27, 2015 01:36 IST

पाण्यासाठी मोर्चा काढला.. त्यामुळे दोन दिवसांतून एकदा प्यायचं पाणी तरी मिळालं. विहिरीचं पाणी खारट लागतं.. जनावरंसुद्धा त्याला तोंड लावत नाहीत.

बारामती : ‘पाण्यासाठी मोर्चा काढला.. त्यामुळे दोन दिवसांतून एकदा प्यायचं पाणी तरी मिळालं. विहिरीचं पाणी खारट लागतं.. जनावरंसुद्धा त्याला तोंड लावत नाहीत. खारट पाण्यामुळे जनावरांचं दूध कमी आलं. गावात चारा मिळत नाही, टनाला २ हजार ७०० रुपये देऊन बागायती भागातून ऊस आणावा लागतो. तेव्हा कुठं जनावरं जगत्यात.’ बारामतीच्या जिरायती भागात सर्वत्रच अशा प्रतिक्रिया ऐकण्यास मिळतील. सलग चार वर्षे दुष्काळ या भागात ठाण मांडून बसला आहे. पुढील दोन महिने सरले की, या भागावर नववर्षाच्या सुरुवातीला पाणी पाणी... करण्याची वेळ येणार, असेच चित्र सध्या या भागात दिसते. बारामती तालुक्यातील अंजनगाव, जळगाव सुपे, कऱ्हा वागज, जळगाव कडेपठार या गावांमध्ये दुष्काळाच्या झळा नोव्हेंबर महिन्यातच गडद झाल्या आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांनी हातची पिकं सोडून दिली आहेत. जळगाव सुपे येथील खोमणेवस्ती परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सध्या टँकर सुरू आहे. येथील विहिरींचे पाणी क्षारयुक्त असल्याने ते पिण्यास योग्य नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. तसेच, सध्या परिसरात चारा पिके दिसतात. विहिरींच्या पाण्यावर ती जोपासली जात आहेत. मात्र, क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनी खारपड होण्याचा धोका असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. चारा पिके घेण्याशिवाय पर्याय नाही. दूध दर पडले. चाऱ्याच्या किमती आवाच्या सवा असल्याने हातात पैसा टिकणे अवघड झाले आहे. जनावरं विकावी म्हटलं तर कोणी घेईना, असे येथील तरुण दूध उत्पादकांनी सांगितले. या भागामध्ये सिंचनाची कोणतीही कायमस्वरूपी सुविधा नाही. पाऊस चांगला झाला, कऱ्हा नदी वाहू लागली आणि बंधारे भरले तरच या भागात आबादी आबाद असते; मात्र मागील चार वर्षांपासून पावसाने जिरायती भागात तोंड दाखवले नाही की कऱ्हा नदीही वाहिली नाही. त्यामुळे बंधारे तर सोडाच; परंतु ओढ्यावरील डबकीदेखील भरली नाहीत. त्यामुळे येथील परिस्थिती गंभीर बनली आहे. पशुधन जगवण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची कसरत होत आहे. चाऱ्याबरोबरच जनावरांची तहान भागविण्याचे आव्हान शेतकऱ्यांना स्वीकारावे लागत आहे. जिरायती भागात चरित्रार्थासाठी दूध व्यवसाय महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊनही हा व्यवसाय चालवावा लागत आहे. चारा आणि पाण्याच्या गंभीर समस्येतून जनावरांची विक्री झाल्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यातील दावण रिकामी होण्याची भीती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)