शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या सुरुवातीलाच पाणी पाणी रे!

By admin | Updated: November 27, 2015 01:36 IST

पाण्यासाठी मोर्चा काढला.. त्यामुळे दोन दिवसांतून एकदा प्यायचं पाणी तरी मिळालं. विहिरीचं पाणी खारट लागतं.. जनावरंसुद्धा त्याला तोंड लावत नाहीत.

बारामती : ‘पाण्यासाठी मोर्चा काढला.. त्यामुळे दोन दिवसांतून एकदा प्यायचं पाणी तरी मिळालं. विहिरीचं पाणी खारट लागतं.. जनावरंसुद्धा त्याला तोंड लावत नाहीत. खारट पाण्यामुळे जनावरांचं दूध कमी आलं. गावात चारा मिळत नाही, टनाला २ हजार ७०० रुपये देऊन बागायती भागातून ऊस आणावा लागतो. तेव्हा कुठं जनावरं जगत्यात.’ बारामतीच्या जिरायती भागात सर्वत्रच अशा प्रतिक्रिया ऐकण्यास मिळतील. सलग चार वर्षे दुष्काळ या भागात ठाण मांडून बसला आहे. पुढील दोन महिने सरले की, या भागावर नववर्षाच्या सुरुवातीला पाणी पाणी... करण्याची वेळ येणार, असेच चित्र सध्या या भागात दिसते. बारामती तालुक्यातील अंजनगाव, जळगाव सुपे, कऱ्हा वागज, जळगाव कडेपठार या गावांमध्ये दुष्काळाच्या झळा नोव्हेंबर महिन्यातच गडद झाल्या आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांनी हातची पिकं सोडून दिली आहेत. जळगाव सुपे येथील खोमणेवस्ती परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सध्या टँकर सुरू आहे. येथील विहिरींचे पाणी क्षारयुक्त असल्याने ते पिण्यास योग्य नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. तसेच, सध्या परिसरात चारा पिके दिसतात. विहिरींच्या पाण्यावर ती जोपासली जात आहेत. मात्र, क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनी खारपड होण्याचा धोका असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. चारा पिके घेण्याशिवाय पर्याय नाही. दूध दर पडले. चाऱ्याच्या किमती आवाच्या सवा असल्याने हातात पैसा टिकणे अवघड झाले आहे. जनावरं विकावी म्हटलं तर कोणी घेईना, असे येथील तरुण दूध उत्पादकांनी सांगितले. या भागामध्ये सिंचनाची कोणतीही कायमस्वरूपी सुविधा नाही. पाऊस चांगला झाला, कऱ्हा नदी वाहू लागली आणि बंधारे भरले तरच या भागात आबादी आबाद असते; मात्र मागील चार वर्षांपासून पावसाने जिरायती भागात तोंड दाखवले नाही की कऱ्हा नदीही वाहिली नाही. त्यामुळे बंधारे तर सोडाच; परंतु ओढ्यावरील डबकीदेखील भरली नाहीत. त्यामुळे येथील परिस्थिती गंभीर बनली आहे. पशुधन जगवण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची कसरत होत आहे. चाऱ्याबरोबरच जनावरांची तहान भागविण्याचे आव्हान शेतकऱ्यांना स्वीकारावे लागत आहे. जिरायती भागात चरित्रार्थासाठी दूध व्यवसाय महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊनही हा व्यवसाय चालवावा लागत आहे. चारा आणि पाण्याच्या गंभीर समस्येतून जनावरांची विक्री झाल्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यातील दावण रिकामी होण्याची भीती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)