शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

नववर्षाच्या सुरुवातीलाच पाणी पाणी रे!

By admin | Updated: November 27, 2015 01:36 IST

पाण्यासाठी मोर्चा काढला.. त्यामुळे दोन दिवसांतून एकदा प्यायचं पाणी तरी मिळालं. विहिरीचं पाणी खारट लागतं.. जनावरंसुद्धा त्याला तोंड लावत नाहीत.

बारामती : ‘पाण्यासाठी मोर्चा काढला.. त्यामुळे दोन दिवसांतून एकदा प्यायचं पाणी तरी मिळालं. विहिरीचं पाणी खारट लागतं.. जनावरंसुद्धा त्याला तोंड लावत नाहीत. खारट पाण्यामुळे जनावरांचं दूध कमी आलं. गावात चारा मिळत नाही, टनाला २ हजार ७०० रुपये देऊन बागायती भागातून ऊस आणावा लागतो. तेव्हा कुठं जनावरं जगत्यात.’ बारामतीच्या जिरायती भागात सर्वत्रच अशा प्रतिक्रिया ऐकण्यास मिळतील. सलग चार वर्षे दुष्काळ या भागात ठाण मांडून बसला आहे. पुढील दोन महिने सरले की, या भागावर नववर्षाच्या सुरुवातीला पाणी पाणी... करण्याची वेळ येणार, असेच चित्र सध्या या भागात दिसते. बारामती तालुक्यातील अंजनगाव, जळगाव सुपे, कऱ्हा वागज, जळगाव कडेपठार या गावांमध्ये दुष्काळाच्या झळा नोव्हेंबर महिन्यातच गडद झाल्या आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांनी हातची पिकं सोडून दिली आहेत. जळगाव सुपे येथील खोमणेवस्ती परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सध्या टँकर सुरू आहे. येथील विहिरींचे पाणी क्षारयुक्त असल्याने ते पिण्यास योग्य नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. तसेच, सध्या परिसरात चारा पिके दिसतात. विहिरींच्या पाण्यावर ती जोपासली जात आहेत. मात्र, क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनी खारपड होण्याचा धोका असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. चारा पिके घेण्याशिवाय पर्याय नाही. दूध दर पडले. चाऱ्याच्या किमती आवाच्या सवा असल्याने हातात पैसा टिकणे अवघड झाले आहे. जनावरं विकावी म्हटलं तर कोणी घेईना, असे येथील तरुण दूध उत्पादकांनी सांगितले. या भागामध्ये सिंचनाची कोणतीही कायमस्वरूपी सुविधा नाही. पाऊस चांगला झाला, कऱ्हा नदी वाहू लागली आणि बंधारे भरले तरच या भागात आबादी आबाद असते; मात्र मागील चार वर्षांपासून पावसाने जिरायती भागात तोंड दाखवले नाही की कऱ्हा नदीही वाहिली नाही. त्यामुळे बंधारे तर सोडाच; परंतु ओढ्यावरील डबकीदेखील भरली नाहीत. त्यामुळे येथील परिस्थिती गंभीर बनली आहे. पशुधन जगवण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची कसरत होत आहे. चाऱ्याबरोबरच जनावरांची तहान भागविण्याचे आव्हान शेतकऱ्यांना स्वीकारावे लागत आहे. जिरायती भागात चरित्रार्थासाठी दूध व्यवसाय महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊनही हा व्यवसाय चालवावा लागत आहे. चारा आणि पाण्याच्या गंभीर समस्येतून जनावरांची विक्री झाल्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यातील दावण रिकामी होण्याची भीती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)