शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

भातपिकाला पावसाने जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:17 IST

पंधरवड्यानंतर पुनरागमन : बळीराजा आनंदी

भोर : सुमारे १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भोर तालुक्यात दोन दिवस दमदार पाऊस झाला. भातपिकाला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. भात हे भोर तालुक्यातील प्रमुख पीक आहे. भाताची ५० हेक्टरवर रोपवाटिका करून सुमारे ७५०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने भातखाचरातील पाणी आटले होते. परिणामी पिकाला अन्नद्रव्याची कमतरता जाणवून वाढीवर विपरीत परिणाम होत होता.

पिकावर विषाणूजन्य करपा व बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती असल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत होते. मात्र गेल्या दोन दिवसांत रात्री झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. तालुक्यात इंद्रायणी, बासमती, फुले समृद्धी, रत्नागिरी २४, कर्जत आंबेमोहोर, तामसाळ या हळव्या आणी गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जाते. सध्या भात पोसण्याची वेळ असताना पावसाअभावी डोंगर उतारावरील झरे आटले, तसेच ओढ्या, नाल्यांचे पाणीही आटले होते. त्यामुळे भातावर काही ठिकाणी जिवाणूजन्य करपा व काही भागात विषाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. अनेक ठिकाणी भाताच्या ओंब्या बाहेर पडत असताना पाणी नसल्याने दाणे भरण्यास अडचण होणार होती.अचानक पावसाने मारली दडीतालुक्यात भाताची ७५०० हेक्टरवर लागवड झाली असून त्यातील ५० एकरवर यंत्राद्वारे लागवड करण्यात आली आहे. वेळेवर पाऊस झाल्याने १०० टक्के भाताची लागवड झाली होती. भाताचे पिक जोमात होते. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल, असे वाटत असताना अचानक पावसाने दडी मारली होती. पिकावर त्याचे दुष्परिणाम जाणवत होते.

टॅग्स :Puneपुणे