शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

रेल्वे मालधक्का बंद होऊ देणार नाही : वंदना चव्हाण; पियूष गोयल यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 19:33 IST

चर्चा न करता मालधक्का बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला ही दुर्दैवी बाब आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देमालधक्का बंद करण्याचा निर्णय कोणाशीही चर्चा न करता घेण्यात आला : वंदना चव्हाणरेल्वे स्थानक परिसरात वाहनतळासाठीही जागाही उपलब्ध करून द्यावी, चव्हाण यांची मागणी

पुणे : रेल्वे मालधक्का ही पुणे शहराची एक वेगळी ओळख आहे. तिथे वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांशी एका शब्दाचीही चर्चा न करता मालधक्का बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला ही दुर्दैवी बाब आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. त्याच बरोबर रेल्वे स्थानक परिसरात वाहनतळासाठीही जागाही उपलब्ध करून द्यावी असे त्यांनी म्हटले आहे.पुण्यातील रेल्वे मालधक्का प्रसिद्ध आहे. तिथे माल उतरवणे, चढवणे अशी कामे होतात. कित्येक वर्षांपासून तिथे अनेकजण काम करीत आहेत. रेल्वेचीही ती एक गरज आहे. असे असताना हा मालधक्का बंद करण्याचा निर्णय कोणाशीही चर्चा न करता घेण्यात आला. हमाल, कामगार यांच्याबरोबर रेल्वे प्रशासनाने चर्चा करणे आवश्यक होते. या निर्णयाचा विरोध म्हणून हमालांचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी आंदोलन केले तर त्यांची दखल घेण्याचे सौजन्यही रेल्वे प्रशासनाने दाखवलेले नाही अशी टीका चव्हाण यांनी केली.रेल्वेमधून स्थानकात प्रवासी उतरले की रेल्वेची जबाबदारी संपली असे होत नाही. प्रवाशांना, त्यातही महिला प्रवाशांना रेल्वेमधून उतरल्यानंतर सुरक्षितपणे घरी जाता आले पाहिजे. त्यासाठी कूल कॅब हा चांगला पर्याय निर्माण झाला आहे. अशा कूल कॅब्जना वाहनतळ उपलब्ध करून देण्यास रेल्वे प्रशासनाने नकार दिला आहे. प्रशासनाचे हे दोन्ही निर्णय अयोग्य असून त्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी खासदार चव्हाण यांनी गोयल यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. 

टॅग्स :Vandana Chavanवंदना चव्हाणpiyush goyalपीयुष गोयलPune Maldhakkaपुणे मालधक्का