शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नारायणगाव : कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या येडगाव धरणातून ३१ जानेवारीपासून कुकडी डावा कालव्याद्वारे रब्बी हंगामाचे पहिल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नारायणगाव : कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या येडगाव धरणातून ३१ जानेवारीपासून कुकडी डावा कालव्याद्वारे रब्बी हंगामाचे पहिल्या टप्प्यातील हे आवर्तन सुरु करण्यात आले. प्रत्यक्षात एक फेब्रुवारीपासून या आवर्तनाला प्रारंभ होणार आहे. यापूर्वी पिंपळगाव जोगे, डिंभे, घोड आणि मीना शाखा कालव्याद्वारे विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

४० दिवसांच्या आवर्तनात अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील ४.९० टीएमसी आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूरसह पारनेरसाठी २.९० टीएमसी असे एकूण ७.८० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी दिली.

दरम्यान, रब्बी हंगामाचे पहिले आवर्तनाचा लाभ पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील १ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात २८ तारखेला झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार रब्बी हंगामातील आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तनाकरिता येडगाव, वडज, माणिकडोह, डिंभे डावा आणि उजवा कालव्यातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. ४० दिवसांच्या या आवर्तनाचा लाभ जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याला होणार आहे. या सात तालुक्यांमधील १ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्राला या आवर्तनाचा लाभ होऊन हे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

चौकट

कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव धरणात १.८९ टीएमसी (९७.४२ टक्के), वडज धरणात ०.९७७ टीएमसी (८३.२८ टक्के), माणिकडोह धरणात ४.३९ टीएमसी (४३.१८ टक्के), पिंपळगाव जोगा १.६३ टीएमसी (४२.०१ टक्के), डिंभा धरणात १०.७९ टीएमसी (८६.४० टक्के) असे एकूण १९.६९ टीएमसी (६६.३६ टक्के) उपयुक्त पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजअखेर २१.३० टीएमसी (७१.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता.

वडज धरणातील पाण्याचा साठा मीना व वडज कालवा आणि मीना नदीच्या वापरासाठी ठेवण्यात आले आहे.

कोट

जुन्नर शहर आणि परिसरातील गावांसाठी दीड टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या आवर्तनासाठी पिंपळगाव जोगे धरणातील मृत पाणी साठा वापरला जाणार नाही . आवर्तन संपल्यानंतर कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेला शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

अतुल बेनके, आमदार

फोटो - डिंभे डावा कालव्याद्वारे सुरु असलेले विसर्ग.