शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाकड जनावरांचा प्रश्न आणखीच जटिल!

By admin | Updated: May 30, 2017 02:14 IST

गाई-म्हशींसह इतर प्राण्यांना शेतकरी असल्याचा पुराव असल्याशिवाय विकता यणार नाही. तसेच फक्त शेतीसाठीच विकता

लोकमत न्यूज नेटवर्कबेल्हा : गाई-म्हशींसह इतर प्राण्यांना शेतकरी असल्याचा पुराव असल्याशिवाय विकता यणार नाही. तसेच फक्त शेतीसाठीच विकता येतील, असा केंद्र सरकारने अध्यादेश काढला आहे. यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न आणखी जटील होणार आहे. जनावरांच्या बाजारावर याचा मोठा परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असा बैलबाजार बेल्हा (ता. जुन्नर) येथे भरतो. या बाजारात लाखोंची उलाढाल होते. आजच्या आठवडेबाजारात अनेक शेतकरीवर्गाला केंद्र सरकारने नवीन अध्यादेश जारी केला, त्याबद्दल काहीच माहिती नव्हते. पशुधन विकताना दाखला देणे बंधनकारक करण्यात आले असल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे.मात्र या अध्यादेशाबद्दल शेतकरी बबन दगडू पवार म्हणाले, की या नवीन अध्यादेशामुळे शेतकरीवर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. भाकड गाई घरीच राहतील. या भाकड जनावरांची व्यवस्था केंद्र सरकारने करावी. शेतकरीवर्गाने जनावरे बाजारात विक्रीसाठी आणायचीच नाहीत. शेतकरीविरोधी हे शासन असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी शेतकरी भाऊ नाना गाडगे म्हणाले, भाकड बैल कुठे ठेवायचे हे बैल केंद्र सरकारने खरेदी करावेत, तसेच जनावरे कत्तलीसाठी नसल्याचे हमीपत्र जनावर खरेदी व विक्री करणारे अशा दोघांना द्यावे लागणार असल्यामुळे दोघांनाही त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. या नवीन अध्यादेशाचा शेतकरीवर्गाने निषेध या वेळी केला. व्यापारीवर्गालाही याचा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. त्यातच बैलगाडा शर्यतीही बंद असल्यामुळे त्याचा फटकाही शेतकरीवर्गाला बसत आहे.याबाबत येथील उपबाजार समितीचे कार्यालयीनप्रमुख शैलेश नायकोडी म्हणाले, की या केंद्र सरकारने नवीन अध्यादेश या निर्णयाचा खरेदी व विक्रीवर मोठा परिणाम होऊ शकतो. या नवीन अध्यादेशाची अंमलबजावणी काही दिवसांत सुरू होईल. त्याआधीच अनेक शेतकऱ्यांनी याला कडाडून विरोध केला आहे. आजच्या बैलबाजारात बैलांची आवक चांगल्या प्रमाणात झाली होती. शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या बैलांना चांगली मागणी होती.काय आहेत नियमया अध्यादेशात पशुविक्रीचा व्यवहार करण्यापूर्वी विक्रेता व खरेदीदाराला शेतकरी असल्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. या केलेल्या व्यवहाराच्या पाच प्रती तयार करून त्या स्थानिक महसूल कार्यालय, जिल्ह्यातील स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुबाजार समितीकडे सादर कराव्या लागतील. त्याची एक प्रत विक्रेता व खरेदीदार यांच्याकडे ठेवावी लागेल. जनावरे आणणाऱ्यांकडून हे प्राणी शेतीच्या कामासाठी असून कत्तलीसाठी नाहीत, असे हमीपत्र लिहून घेण्याची सूचना या बाजारांवर लक्ष ठेवणाऱ्या समित्यांना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेपासून ५० किमी आणि राज्य सीमेपासून २५ किमी अंतराच्या परिसरात जनावरांचा बाजार भरविण्यावरही बंदी आहे. बाजारात प्राण्यांचे होणारे हाल दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पर्यावरण मंत्रालयाने हे नियम तयार केले आहेत.