शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भाकड जनावरांचा प्रश्न आणखीच जटिल!

By admin | Updated: May 30, 2017 02:14 IST

गाई-म्हशींसह इतर प्राण्यांना शेतकरी असल्याचा पुराव असल्याशिवाय विकता यणार नाही. तसेच फक्त शेतीसाठीच विकता

लोकमत न्यूज नेटवर्कबेल्हा : गाई-म्हशींसह इतर प्राण्यांना शेतकरी असल्याचा पुराव असल्याशिवाय विकता यणार नाही. तसेच फक्त शेतीसाठीच विकता येतील, असा केंद्र सरकारने अध्यादेश काढला आहे. यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न आणखी जटील होणार आहे. जनावरांच्या बाजारावर याचा मोठा परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असा बैलबाजार बेल्हा (ता. जुन्नर) येथे भरतो. या बाजारात लाखोंची उलाढाल होते. आजच्या आठवडेबाजारात अनेक शेतकरीवर्गाला केंद्र सरकारने नवीन अध्यादेश जारी केला, त्याबद्दल काहीच माहिती नव्हते. पशुधन विकताना दाखला देणे बंधनकारक करण्यात आले असल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे.मात्र या अध्यादेशाबद्दल शेतकरी बबन दगडू पवार म्हणाले, की या नवीन अध्यादेशामुळे शेतकरीवर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. भाकड गाई घरीच राहतील. या भाकड जनावरांची व्यवस्था केंद्र सरकारने करावी. शेतकरीवर्गाने जनावरे बाजारात विक्रीसाठी आणायचीच नाहीत. शेतकरीविरोधी हे शासन असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी शेतकरी भाऊ नाना गाडगे म्हणाले, भाकड बैल कुठे ठेवायचे हे बैल केंद्र सरकारने खरेदी करावेत, तसेच जनावरे कत्तलीसाठी नसल्याचे हमीपत्र जनावर खरेदी व विक्री करणारे अशा दोघांना द्यावे लागणार असल्यामुळे दोघांनाही त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. या नवीन अध्यादेशाचा शेतकरीवर्गाने निषेध या वेळी केला. व्यापारीवर्गालाही याचा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. त्यातच बैलगाडा शर्यतीही बंद असल्यामुळे त्याचा फटकाही शेतकरीवर्गाला बसत आहे.याबाबत येथील उपबाजार समितीचे कार्यालयीनप्रमुख शैलेश नायकोडी म्हणाले, की या केंद्र सरकारने नवीन अध्यादेश या निर्णयाचा खरेदी व विक्रीवर मोठा परिणाम होऊ शकतो. या नवीन अध्यादेशाची अंमलबजावणी काही दिवसांत सुरू होईल. त्याआधीच अनेक शेतकऱ्यांनी याला कडाडून विरोध केला आहे. आजच्या बैलबाजारात बैलांची आवक चांगल्या प्रमाणात झाली होती. शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या बैलांना चांगली मागणी होती.काय आहेत नियमया अध्यादेशात पशुविक्रीचा व्यवहार करण्यापूर्वी विक्रेता व खरेदीदाराला शेतकरी असल्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. या केलेल्या व्यवहाराच्या पाच प्रती तयार करून त्या स्थानिक महसूल कार्यालय, जिल्ह्यातील स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुबाजार समितीकडे सादर कराव्या लागतील. त्याची एक प्रत विक्रेता व खरेदीदार यांच्याकडे ठेवावी लागेल. जनावरे आणणाऱ्यांकडून हे प्राणी शेतीच्या कामासाठी असून कत्तलीसाठी नाहीत, असे हमीपत्र लिहून घेण्याची सूचना या बाजारांवर लक्ष ठेवणाऱ्या समित्यांना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेपासून ५० किमी आणि राज्य सीमेपासून २५ किमी अंतराच्या परिसरात जनावरांचा बाजार भरविण्यावरही बंदी आहे. बाजारात प्राण्यांचे होणारे हाल दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पर्यावरण मंत्रालयाने हे नियम तयार केले आहेत.