शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

थंडीने गोठली दुधाची मात्रा

By admin | Updated: December 20, 2014 00:03 IST

कडाक्याची थंडी आणि आहारासह जनावरांची निगा घेण्यात शेतकऱ्यांकडून होणा-या बेफिकिरीमुळे परिसरातील पशुधनापासून मिळणा-या दुधाच्या प्रमाणात घट होऊ लागली आहे

पिंपरी : कडाक्याची थंडी आणि आहारासह जनावरांची निगा घेण्यात शेतकऱ्यांकडून होणा-या बेफिकिरीमुळे परिसरातील पशुधनापासून मिळणा-या दुधाच्या प्रमाणात घट होऊ लागली आहे. दुग्ध उत्पादनात सरासरी १० टक्क्यांनुसार ५० हजार लिटर घट असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे. पिंपरी - चिंचवड शहर परिसरात १५ हजारांवर दुभती जणांवरे आहेत. यासह मावळ तालुक्यातील दुभत्या जनावरांची संख्या ४५ हजार ९२१ आहे. त्यामध्ये १२ हजार ८४८ गाई, २३ हजार ११३ म्हशी, १ हजार ३०६ मेंढ्या, ८ हजार ६५४ शेळ्यांचा समावेश आहे.मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांकडेही २४ हजार ९३१ दुभती जनावरे आहेत. त्यामध्ये १० हजार १८० गाई, ११ हजार ११३ म्हशी, ५२१ मेंढ्या, २ हजार ९१८ शेळ्यांचा समावेश आहे. सध्या तापमान ९ अंशांपर्यंत घसरले आहे. ठरावीक शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करीत दुभत्या जनावरांसाठी बंदिस्त गोठे बांधले आहेत. येथील दूध उत्पादनावर तुलनेने कमी परिणाम होतो. मात्र ४ ते दहा पशुधन असणाऱ्या बहुतेक शेतकऱ्यांकडील गोठे साध्या पद्धतीचे आहेत. त्यांनी घराशेजारी भिंतीलगतच लाकडांच्या खांबांवर कौलांचे छप्पर करून, तावदान ठोकून कमी खर्चात गोठे तयार केले आहेत. त्यांना जास्त फटका बसत आहे. (वार्ताहर)