शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यावर बोट ठेवून जखमेवर मीठ

By admin | Updated: January 30, 2016 04:05 IST

वायसीएम रुग्णालयात एका रुग्णाला पाय गमवावा लागला, तर त्याला महापालिकेने तीन लाखांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली. त्याचे दु:ख पुसण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर

पिंपरी : वायसीएम रुग्णालयात एका रुग्णाला पाय गमवावा लागला, तर त्याला महापालिकेने तीन लाखांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली. त्याचे दु:ख पुसण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर अर्थसाहाय्य देण्याचा प्रस्ताव फेटाळून पुन्हा त्याच्यापुढे दु:खाचा डोंगर उभा केला. वरकरणी ही चित्रपटाची कहाणी वाटत असेल, पण ही एक सत्यकथा आहे. कायद्यावर बोट ठेवून रुग्णाच्या पायावरील जखमावर मीठ चोळले, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळासाहेब देंडगे यांना पाय गमवावा लागला. दरम्यान, त्यांना तीन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा १२ जानेवारीला स्थायी समितीचे सभापती अतुल शितोळे यांनी केली. वैद्यकीय विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव स्थायीपुढे ठेवण्यात आला. मात्र, नियमात बसत नसल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. यामध्ये तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत हा विषय मंजूर करता येणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच सांगण्यात आले. त्यामुळे घोषणा करूनही स्थायी समितीवर हा प्रस्ताव फेटाळण्याची नामुष्की ओढावली. शिवाय एका व्यक्तीला अर्थसाहाय्य दिल्यानंतर इतरांनाही छोट्या-मोठ्या कारणांवरून अशा प्रकारची मदत द्यावी लागेल, असाही सूर या वेळी आळवण्यात आला. दरम्यान, अगोदर अर्थसाहाय्य देण्याची घोषणा करायची आणि नंतर प्रस्ताव फेटाळायचा. त्यामुळे स्थायी समिती एकप्रकारे कात्रीत सापडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वैद्यकीय विभागाकडून हा प्रस्ताव आला होता. नियमात बसतच नव्हता, तर हा प्रस्ताव आलाच कसा, असाही मुद्दा उपस्थित होत आहे. हा प्रस्ताव स्थायीपुढे येण्यापूर्वी त्यावर अभ्यास होणे गरजेचे होते.(प्रतिनिधी)अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली. मात्र, नियमात बसत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यामुळे देंडगे यांना अर्थसाहाय्य देता येणार नाही. - अतुल शितोळे, सभापती, स्थायी समिती मदतीपासून वंचितडॉक्टरच्या चुकीमुळे पाय गमावण्याची वेळ आलेल्या बाळासाहेब देंडगे यांना महापालिकेने मदत नाकारली आहे. तर आता प्रशासनात समन्वय नसल्याने मदतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांना मदतीपासून वंचित रहावे लागणार आहे.