शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

गुंजवणीच्या पाण्यासाठी पुरंदरचा एकमुखी ठराव , २ टीएमसी पाणी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 03:19 IST

गुंजवणी प्रकल्पातील बंद पाइपलाइनच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि भोर, वेल्ह्यासह पुरंदरच्या शेतक-यांना आमच्या वाट्याचे २ टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावे, असा एकमुखी ठराव आज करण्यात आला.

खळद : गुंजवणी प्रकल्पातील बंद पाइपलाइनच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि भोर, वेल्ह्यासह पुरंदरच्या शेतक-यांना आमच्या वाट्याचे २ टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावे, असा एकमुखी ठराव आज करण्यात आला.शिवरी येथील शिवपार्वती लॉन्स मंगल कार्यालयात शनिवारी गुंजवणी प्रकल्पाबाबत जनसुनावणी पार पडली. यावेळी ११०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून जनसुनवाई हा याचाच एक भाग असून, या जनसुनवाईनंतर लगेचच तो मंजुरीसाठी ठेवण्यात येईल व अंतिम मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया होऊन वर्षभरात कामाला सुरुवात होईल, असे अधिकाºयांनी सांगत सहकार्याचे आवाहन केले.जनसुनावणीला पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, उपसभापती दत्तात्रय काळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, हरिभाऊ लोळे,रमेश इंगळे, कैलास कामथे, दिलीप गिरमे, शिवाजीराव पवार, राजेंद्र झेंडे, बाळासाहेब थेऊरकर, अनिल जगताप, बबनराव कामथे, आत्माराम कामथे, सतीश लिंभोरे, किशोर लिंभोरे, राजाभाऊ क्षीरसागर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट, उपअभियंता दिगंबर दुबल, शिवाजी डेंगळे, शहाजी सस्ते आदींनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे दिली.यावेळी प्रकल्पाची तांत्रिक व अन्य स्वरूपाची माहिती अधिकाºयांनी उपस्थितांना दिली. बंद जलवाहिनी असलेला गुंजवणी हा देशातील पहिला अत्याधुनिक प्रकल्प असल्याची माहिती यावेळी अधीक्षक अभियंता धुमाळ यांनी दिली. ते म्हणाले की,या प्रकल्पाला केंद्राकडून दुष्काळी निधीतून काही कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. उर्वरित तरतूद राज्य शासनाने केलेली आहे.या जनसुनवाईदरम्यान सर्वांनी या योजनेचे स्वागत केले. मात्र, जुन्या योजनेत ज्या २५ गावांचा समावेश आहे, या गावांतील जमिनीवर सीलिंग करण्यात आले असून, आता या योजनेत नारायणपूर अंतर्गत १७ नवीन गावांचा समावेश झाला असल्याने आमचे सीलिंग कमी करून या गावांवरही सीलिंग टाकावे, अशी जोरदार मागणी या भागातील शेतकºयांनी केली.योजनेची वैशिष्ट्ये३६५ दिवस २४ तास पाणी उपलब्धता शेतकºयांना त्यांच्या सोयीनुसार पिके घेण्याचे स्वातंत्र्य ठिबक किंवा पाट पद्धतीने पाणी वापरण्याची तिन्ही तालुक्यांतील शेतकºयांना मुभा. २४०० मि.मी. व्यासाचा पाईप आवश्यक तेथे स्लुईस व एअर वॉल्व्ह सिंचनाखालील क्षेत्र : वेल्हा - ८५० हेक्टर, भोर - ९४३५ हेक्टर, पुरंदर - १११०७ हेक्टर पाण्याचे प्रेशरहेड आउटलेटच्या मुखाशी असल्याने नारायणपूर उपसा सिंचन योजनेतील शेतकºयांना विद्युत पंप बसवण्याची आवश्यकताराहणार नाही. ६४८५ अश्वशक्तीने होणार पंपिंग पाणीवापर संस्थांची निर्मिती

टॅग्स :Waterपाणी