शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

गुंजवणीच्या पाण्यासाठी पुरंदरचा एकमुखी ठराव , २ टीएमसी पाणी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 03:19 IST

गुंजवणी प्रकल्पातील बंद पाइपलाइनच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि भोर, वेल्ह्यासह पुरंदरच्या शेतक-यांना आमच्या वाट्याचे २ टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावे, असा एकमुखी ठराव आज करण्यात आला.

खळद : गुंजवणी प्रकल्पातील बंद पाइपलाइनच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि भोर, वेल्ह्यासह पुरंदरच्या शेतक-यांना आमच्या वाट्याचे २ टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावे, असा एकमुखी ठराव आज करण्यात आला.शिवरी येथील शिवपार्वती लॉन्स मंगल कार्यालयात शनिवारी गुंजवणी प्रकल्पाबाबत जनसुनावणी पार पडली. यावेळी ११०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून जनसुनवाई हा याचाच एक भाग असून, या जनसुनवाईनंतर लगेचच तो मंजुरीसाठी ठेवण्यात येईल व अंतिम मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया होऊन वर्षभरात कामाला सुरुवात होईल, असे अधिकाºयांनी सांगत सहकार्याचे आवाहन केले.जनसुनावणीला पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, उपसभापती दत्तात्रय काळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, हरिभाऊ लोळे,रमेश इंगळे, कैलास कामथे, दिलीप गिरमे, शिवाजीराव पवार, राजेंद्र झेंडे, बाळासाहेब थेऊरकर, अनिल जगताप, बबनराव कामथे, आत्माराम कामथे, सतीश लिंभोरे, किशोर लिंभोरे, राजाभाऊ क्षीरसागर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट, उपअभियंता दिगंबर दुबल, शिवाजी डेंगळे, शहाजी सस्ते आदींनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे दिली.यावेळी प्रकल्पाची तांत्रिक व अन्य स्वरूपाची माहिती अधिकाºयांनी उपस्थितांना दिली. बंद जलवाहिनी असलेला गुंजवणी हा देशातील पहिला अत्याधुनिक प्रकल्प असल्याची माहिती यावेळी अधीक्षक अभियंता धुमाळ यांनी दिली. ते म्हणाले की,या प्रकल्पाला केंद्राकडून दुष्काळी निधीतून काही कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. उर्वरित तरतूद राज्य शासनाने केलेली आहे.या जनसुनवाईदरम्यान सर्वांनी या योजनेचे स्वागत केले. मात्र, जुन्या योजनेत ज्या २५ गावांचा समावेश आहे, या गावांतील जमिनीवर सीलिंग करण्यात आले असून, आता या योजनेत नारायणपूर अंतर्गत १७ नवीन गावांचा समावेश झाला असल्याने आमचे सीलिंग कमी करून या गावांवरही सीलिंग टाकावे, अशी जोरदार मागणी या भागातील शेतकºयांनी केली.योजनेची वैशिष्ट्ये३६५ दिवस २४ तास पाणी उपलब्धता शेतकºयांना त्यांच्या सोयीनुसार पिके घेण्याचे स्वातंत्र्य ठिबक किंवा पाट पद्धतीने पाणी वापरण्याची तिन्ही तालुक्यांतील शेतकºयांना मुभा. २४०० मि.मी. व्यासाचा पाईप आवश्यक तेथे स्लुईस व एअर वॉल्व्ह सिंचनाखालील क्षेत्र : वेल्हा - ८५० हेक्टर, भोर - ९४३५ हेक्टर, पुरंदर - १११०७ हेक्टर पाण्याचे प्रेशरहेड आउटलेटच्या मुखाशी असल्याने नारायणपूर उपसा सिंचन योजनेतील शेतकºयांना विद्युत पंप बसवण्याची आवश्यकताराहणार नाही. ६४८५ अश्वशक्तीने होणार पंपिंग पाणीवापर संस्थांची निर्मिती

टॅग्स :Waterपाणी