शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

पुरंदर उपसा योजनेत हस्तक्षेप नको

By admin | Updated: January 13, 2017 02:16 IST

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेतही पाणी

 भुलेश्वर : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेतही पाणी मिळविण्यासाठी गावपुढारी हस्तक्षेप करू लागले आहेत. मात्र, व्यवस्थित नियोजन असताना हस्तक्षेप झाल्यास पाणी मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहे. यासाठी नियोजनानुसार पाणी सोडण्याची मागणी लाभार्थी शेतक-यांनी केली आहे.पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून रितसीर फॉर्म भरुन घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे यंदाचा रब्बी हंगामातील १ एमसीएफटी पाण्यासाठी शासनाचा ५७,००० इतका दर आहे. मात्र, या योजनेची पाणीपट्टी शासन भरणार असल्याने सध्या १ एमसीएफटी पाण्यासाठी २१०० रुपयेप्रमाणे भरावे लागत आहे. यामध्ये पाणीपट्टी व स्थानिक उपकर यांचा समावेश आहे. यासाठी ८३.३३ टक्के पाणीपट्टी व १६.६७ टक्के असे विभाजन केले जाते. मागणी अर्ज जमा केल्यानंतर, क्रमवारीनुसार पाणी सोडण्यात येते. तसे या योजनेकडून नियोजन केले जाते. पुरंदर उपसा जलसिंचन योजना कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी अनेक शेतकरी पैसे भरुन पाणी घेतात. पैसे भरुन पाण्याची वाट पाहतात व पाणी घेतात. सध्या मोफत पाणी मिळत असल्याने सर्वच जण पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ज्या ठिकाणी कधी पैसे भरून पाणी गेले नाही, या ठिकाणीही पाणी देण्याची मागणीही होत आहे. पाणी न मिळाल्यास दबावही आणला जातो. यामुळे नियोजनात बदल केल्यास पूर्वीचे नियोजन कोलमोडले जाते. अधिकाऱ्यांची कोंडी नियमाप्रमाणे चालणारे नियोजन बिघडल्याने पाणी मिळणे लांबणीवर जाते. याचा नाहक त्रास अधिकारी वर्गाला सहन करावा लागतो. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे मोफत पाणी सध्या सुरू आहे. नियोजनानुसार पाणी मिळते. यात निवडणुकीचे राजकारण आल्यास नियोजन कोलमडले जाऊ शकते. याचा नाहक त्रास शेतकऱ्यांबरोबरच चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही होतो. यामुळे नियोजनानुसार पाणी घेणे गरजेचे आहे.

सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आपल्या पक्षाच्या लोकांना लवकर पाणी कसे मिळेल, यासाठी गावपुढाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे या योजनेत राजकारण येत आहे.यामुळे ही योजना चालणार कशी, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. यामुळे सुरुवातीपासून सुरू असलेल्या पाण्याच्या नियोजनात कुणीही हस्तक्षेप न करण्याची मागणी लाभार्थी भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.- शरद गायकवाड लाभार्थी शेतकरी