शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

विमानतळ विरोधासाठी पुरंदरचे रस्ते रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:18 IST

पुरंदर विमातळाविरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक होत आहेत.

वाघापूर : पुरंदर विमातळाविरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक होत आहेत. सोमवारी पूर्व भागातील सर्व रस्ते प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी सकाळपासून रोखून धरले. सकाळी १० पासून दुपारी २ पर्यंत बैलगाड्या आणि गुराढोरांसह ते रस्त्यावर उतरले. रस्त्यावरच दगडांच्या चुली करून स्वयंपाक करण्यात आला, तर अनेक ठिकाणी शासनाचा गोंधळ घालण्यात आला. तसेच, हातात काळे झेंडे घेऊन शासनाविरोधात घोषणा देत जोरदार निषेध करण्यात आला.दरम्यान, शेतकºयांनी आंदोलन करू नये, यासाठी पोलिसांनी दबावतंत्राचा वापर केला. रविवारी रात्री प्रत्येक गावात फिरून आंदोलन केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या. तसेच, सकाळीही गावोगावी पोलिसांनी पिंजरे उभे करून पुन्हा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या निर्णयावर ठाम असलेले शेतकरी पोलिसांच्या दबावतंत्राला झुगारून हजारोंच्या संख्येने रस्त्यावर आले. त्यांनी संपूर्ण रस्ते ३ ते ४ तास रोखून धरले. सासवड-वाघापूर, पिसर्वे-सासवड, कुंभारवळण-पारगाव, एखतपूर-खानवडी, उरुळी कांचन-जेजुरी असे सर्व रस्ते ब्लॉक केले व शेतकरी एक झाल्यास काय होऊ शकते, हे दाखवून दिले. तर, जेजुरीच्या पोलीस अधिकाºयांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊनही शेतकरी रस्त्यावरून हटले नाहीत. शेवटी त्यांनाच अशी कोणतीही कारवाई केली नसल्याचा खुलासा द्यावा लागला.वनपुरी येथे सासवड-वाघापूर रस्त्यावर सरपंच नामदेव कुंभारकर आणि उदाचीवाडी गावाचे सरपंच यांच्यासह शेतकºयांनी तब्बल ३ तास रस्ता रोखून धरला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद सदस्य आणि विमानतळविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, माजी सरपंच रामदास कुंभारकर, एकनाथ कुंभारकर, मच्छिंद्र कुंभारकर, हनुमंत कुंभारकर, संतोष हगवणे, मनेश हगवणे, किसन तात्या कुंभारकर, ग्रामपंचायत सदस्या राजश्री कुंभारकर, लंकेश महामुनी, महादेव कुंभारकर, शाळांमधील विद्यार्थी तसेच वनपुरी, उदाचीवाडी आणि पंचक्रोशीतील शेतकरी व महिल्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.खानवडी येथे सरपंच होले यांच्या मार्गदर्शनाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी उपसरपंच वैजयंता होले, सदस्य रामदास होले, वर्षा खोमणे, लक्ष्मण बोरावके, रवींद्र फुले, रामभाऊ नेवसे सचिन होले, भाऊ खोमणे, सुरेश होले, नवनाथ होले तसेच महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारगाव-मेमाणे येथील चौफुला येथे सरपंच सर्जेराव मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४ तास रस्ता रोको करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी सरपंच जितेंद्र मेमाणे विठ्ठल मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, नंदूसेठ मेमाणे, हरिभाऊ मेमाणे संदीप मेमाणे त्याचप्रमाणे शेकडो महिला, मुले गुरेढोरे घेऊन रस्त्यावर उतरली होती. या वेळी रस्त्यातच दगडी चूल मांडून त्यावर सरकारच्या दशक्रिया विधीचा स्वयंपाक करण्यात आला व त्यानंतर रस्त्यावरच जागरण-गोंधळ घालून ‘सरकारचे डोके ठिकाणावर येऊ दे’असे देवीला साकडेदेखील घालण्यात आले.वनपुरी येथील निकिता हगवणे या विद्यार्थिनीने, स्त्रीशिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविणाºया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक जर विमानतळात जाणार असेल, तर त्यांची जयंती साजरी करून उपयोग काय? असा जळजळीत सवाल केला आहे.>विमानतळाची जमीन ही शेतकºयांच्या मालकीची व हक्काची आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने शेतकºयांनी आपला विरोध व्यक्त केला आहे. परंतु, तरीही शासन दखल घेत नसेल तर भविष्यात सर्व आंदोलने आक्रमक पद्धतीने केली जातील. तसेच, यामध्ये शासनाने शेतकºयांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्यास पहिली गोळी मी झेलेन.-बाबाराजे जाधवराव, प्रदेशाध्यक्ष, मनसे शेतकरी संघटना>विमानतळाच्या नावावर सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळत आहे. ज्यांच्या जमिनी आहेत, त्यांना विश्वासात का घेतले जात नाही? शेतकºयांच्या हक्काच्या जमिनीला हात लावाल, तर तो हात हेच शेतकरी जागेवर ठेवणार नाहीत.- जालिंदर कामठे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षयापुढे आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे. आमचे म्हणणे विचारात न घेता शासन मुंबईमध्ये बसून एक-एक निर्णय घेत आहे; त्यामुळे जोपर्यंत विमानतळ प्रकल्प मागे घेत नाही, तोपर्यंत हटणार नाही.- दत्तात्रय झुरंगे, अध्यक्ष (विमानतळविरोधी संघर्ष समिती)

टॅग्स :Puneपुणे