शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विमानतळ विरोधासाठी पुरंदरचे रस्ते रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:18 IST

पुरंदर विमातळाविरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक होत आहेत.

वाघापूर : पुरंदर विमातळाविरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक होत आहेत. सोमवारी पूर्व भागातील सर्व रस्ते प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी सकाळपासून रोखून धरले. सकाळी १० पासून दुपारी २ पर्यंत बैलगाड्या आणि गुराढोरांसह ते रस्त्यावर उतरले. रस्त्यावरच दगडांच्या चुली करून स्वयंपाक करण्यात आला, तर अनेक ठिकाणी शासनाचा गोंधळ घालण्यात आला. तसेच, हातात काळे झेंडे घेऊन शासनाविरोधात घोषणा देत जोरदार निषेध करण्यात आला.दरम्यान, शेतकºयांनी आंदोलन करू नये, यासाठी पोलिसांनी दबावतंत्राचा वापर केला. रविवारी रात्री प्रत्येक गावात फिरून आंदोलन केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या. तसेच, सकाळीही गावोगावी पोलिसांनी पिंजरे उभे करून पुन्हा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या निर्णयावर ठाम असलेले शेतकरी पोलिसांच्या दबावतंत्राला झुगारून हजारोंच्या संख्येने रस्त्यावर आले. त्यांनी संपूर्ण रस्ते ३ ते ४ तास रोखून धरले. सासवड-वाघापूर, पिसर्वे-सासवड, कुंभारवळण-पारगाव, एखतपूर-खानवडी, उरुळी कांचन-जेजुरी असे सर्व रस्ते ब्लॉक केले व शेतकरी एक झाल्यास काय होऊ शकते, हे दाखवून दिले. तर, जेजुरीच्या पोलीस अधिकाºयांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊनही शेतकरी रस्त्यावरून हटले नाहीत. शेवटी त्यांनाच अशी कोणतीही कारवाई केली नसल्याचा खुलासा द्यावा लागला.वनपुरी येथे सासवड-वाघापूर रस्त्यावर सरपंच नामदेव कुंभारकर आणि उदाचीवाडी गावाचे सरपंच यांच्यासह शेतकºयांनी तब्बल ३ तास रस्ता रोखून धरला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद सदस्य आणि विमानतळविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, माजी सरपंच रामदास कुंभारकर, एकनाथ कुंभारकर, मच्छिंद्र कुंभारकर, हनुमंत कुंभारकर, संतोष हगवणे, मनेश हगवणे, किसन तात्या कुंभारकर, ग्रामपंचायत सदस्या राजश्री कुंभारकर, लंकेश महामुनी, महादेव कुंभारकर, शाळांमधील विद्यार्थी तसेच वनपुरी, उदाचीवाडी आणि पंचक्रोशीतील शेतकरी व महिल्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.खानवडी येथे सरपंच होले यांच्या मार्गदर्शनाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी उपसरपंच वैजयंता होले, सदस्य रामदास होले, वर्षा खोमणे, लक्ष्मण बोरावके, रवींद्र फुले, रामभाऊ नेवसे सचिन होले, भाऊ खोमणे, सुरेश होले, नवनाथ होले तसेच महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारगाव-मेमाणे येथील चौफुला येथे सरपंच सर्जेराव मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४ तास रस्ता रोको करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी सरपंच जितेंद्र मेमाणे विठ्ठल मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, नंदूसेठ मेमाणे, हरिभाऊ मेमाणे संदीप मेमाणे त्याचप्रमाणे शेकडो महिला, मुले गुरेढोरे घेऊन रस्त्यावर उतरली होती. या वेळी रस्त्यातच दगडी चूल मांडून त्यावर सरकारच्या दशक्रिया विधीचा स्वयंपाक करण्यात आला व त्यानंतर रस्त्यावरच जागरण-गोंधळ घालून ‘सरकारचे डोके ठिकाणावर येऊ दे’असे देवीला साकडेदेखील घालण्यात आले.वनपुरी येथील निकिता हगवणे या विद्यार्थिनीने, स्त्रीशिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविणाºया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक जर विमानतळात जाणार असेल, तर त्यांची जयंती साजरी करून उपयोग काय? असा जळजळीत सवाल केला आहे.>विमानतळाची जमीन ही शेतकºयांच्या मालकीची व हक्काची आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने शेतकºयांनी आपला विरोध व्यक्त केला आहे. परंतु, तरीही शासन दखल घेत नसेल तर भविष्यात सर्व आंदोलने आक्रमक पद्धतीने केली जातील. तसेच, यामध्ये शासनाने शेतकºयांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्यास पहिली गोळी मी झेलेन.-बाबाराजे जाधवराव, प्रदेशाध्यक्ष, मनसे शेतकरी संघटना>विमानतळाच्या नावावर सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळत आहे. ज्यांच्या जमिनी आहेत, त्यांना विश्वासात का घेतले जात नाही? शेतकºयांच्या हक्काच्या जमिनीला हात लावाल, तर तो हात हेच शेतकरी जागेवर ठेवणार नाहीत.- जालिंदर कामठे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षयापुढे आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे. आमचे म्हणणे विचारात न घेता शासन मुंबईमध्ये बसून एक-एक निर्णय घेत आहे; त्यामुळे जोपर्यंत विमानतळ प्रकल्प मागे घेत नाही, तोपर्यंत हटणार नाही.- दत्तात्रय झुरंगे, अध्यक्ष (विमानतळविरोधी संघर्ष समिती)

टॅग्स :Puneपुणे