शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सत्तेचा वापर जनकल्याणासाठी केला - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 09:33 IST

बारामती येथे शारदा प्रांगणात युवा नेते युगेंद्र पवार यांच्या पुढाकारातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी  जयंती उत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

बारामती - देशात अनेक कर्तृत्ववान महिला जन्माला आल्या.यामध्ये संकटावर मात करुन मिळालेली सत्ता रयतेचे राज्य म्हणुन चालविण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले.त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्याची चिंता न करता त्यांनी कर्तृत्व,शाैर्य दाखविले. मिळालेल्या सत्तेचा वापर देशातील जनकल्याणासाठी केला. देशाच्या कानाकोपर्यात बारव,विहीरी निर्माण करुन उपेक्षितांची तहान भागविली. सर्वसामान्यांच्या हाताला काम देण्यासाठी वस्त्रोद्योग उभारले.याचा आज अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यश्लोेक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गाैरव केला.

बारामती येथे शारदा प्रांगणात युवा नेते युगेंद्र पवार यांच्या पुढाकारातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते.पवार पुढे म्हणाले,देशात अनेक राजे होवून गेले. मात्र, गेल्या २०० ते ३०० वर्षांपासून सामान्यांच्या अंत:करणात ज्यांच्याविषयी आजहि आस`था आहे.त्यांनी सामान्यांचे राज्य प्रस`थापित केले.छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले.हा इतिहास आहे.अहिल्यादेवींच्या कार्यातून आजही नव्या पिढीला आजच्या कार्यक्रमातून मोठी प्रेरणा मिळेल.देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत धनगर समाजाचे मोठे योगदान आहे. या चळवळीत बारामतीच्या जगन्नाथ कोकरे तुरुंगवास भोगल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नमुद केले.

राजकारणाच्या सुरवातीच्या काळात सर्वसामान्य कुटुंबातील लोक माझ्या मागे उभे राहीले.पुर्ण शक्ती माझ्या मागे उभा केली.यात पणदरेचे धुळाबापू कोकरे,विठठलराव कोकरे यांच्यासह अनेकांची नावे घेता येतील.या लोकांमुळेच देश आणि राज्याच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळाल्याचे पवार यांनी नमुद केले. बारामतीत अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक निर्मिती करण्याबाबत प्रमुख लोकांबरोबर चर्चा करणार असल्याचे देखील पवार म्हणाले.आजच्या कार्यक्रमानिमित्त अहिल्यादेवींचे स्मरण करताना नविन पिढी यशस्वी होइल,यासाठी प्रयत्नशील राहु,असे पवार म्हणाले. 

यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,धनगर आरक्षणाबाबत भाजप नेते राज्यात आणि दिल्लीत वेगवेगळी भुमिका घेतात.त्यांच्या मनात असणारी आरक्षणाबाबतची भुमिका त्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे.स्वत:च्या सोयीचे राजकारण भाजप नेत्यांनी करु नये,असा टोला सुळे यांनी लगावला.राज्यात आॅक्टोंबर मध्ये आघाडी सरकार आल्यानंतर अहिल्यादेवी,जिजाऊ,सावित्रीबाइ या तिन्ही मातांच्या कर्तृत्वाची भावी पिढीपर्यंत पोहचण्यासाठी शिक्षण धोरणात समावेश करणार.शिक्षणात मनुस्मृती येवु देणार नसल्याचा इशारा सुळे यांनी दिला.

यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भुषणराजे होळकर यांनी पुढील वर्षी अहिल्यादेवींची ३०० वी जयंती आहे.या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्यात अहिल्यादेवींच्या ३०० स्मारकांची निर्मिती करण्याची मागणी केली.त्या स्मारकातून युवा पिढीला प्रेरणा मिळेल,असे त्यांनी नमुद केले. यावेळी उत्तम जानकर,आमदार संजय जगताप,सक्षणा सलगर,युगेंद्र पवार यांची भाषणे झाली.यावेळी राष्ट्रवादी महिला काॅंग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे,आप्पासाहेब जगदाळे,अॅड संदीप गुजर,सत्यव्रत काळे,जगन्नाथ शेवाळे,शर्मिला पवार,सदाशिव सातव,अॅड.एस.एन जगताप,विठ्ठल देवकाते आदी उपस`थित होते.आभार सतीश खाेमणे यांनी मानले.

निवृत्त पोलीस अधिकारी मधोजी शिंदे यांनी धनगर आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सांगितले.या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘शिंदेसाहेबां’नी आरक्षणा च्या प्रश्नात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांना पुर्ण ताकतीने मदत करणार असून लाेकांना न्याय देण्याची काळजी घेणार आहे,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिंदे यांच्या भूमिकेला पाठींबा व्यक्त केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार