शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

पुण्याच्या पाण्याचा झाला खेळखंडोबा

By admin | Updated: September 6, 2014 00:00 IST

शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पात 1क्क् टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी दोनवेळा पाणी पुरवठय़ाची मागणी केली आहे.

पुणो : शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पात 1क्क् टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी दोनवेळा पाणी पुरवठय़ाची मागणी केली आहे. परंतु, पुढील वर्षभर शहराला सुरळित पाणी पुरवठा होण्यासाठी एकवेळ पाणी पुरवठय़ावर महापालिका प्रशासन ठाम आहे. गेल्या तीन महिन्यांत एक दिवसा आड, दोनवेळा आणि एकवेळा असे वारंवार पाणी पुरवठय़ाचे  निर्णय़ बदलण्यात आले. त्यामुळे पाणी पुरवठा नियोजन व यंत्रणोचा खेळखंडोबा होणार आहे. 
खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, खडकवासला आणि टेमघर या धरणात 1क्क् टक्के साठा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातूनही कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. मग, पुणोकरांना एकवेळ पाणी पुरवठा का ? असा सवाल शहरातील राजकीय पक्ष व  स्वयंसेवी संस्थानी उपस्थित केला आहे. धरणो भरल्यामुळे दोन वेळ पाणी देण्याची मागणी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. मात्र, वारंवार पाणी पुरवठय़ाच्या नियोजनात बदल करणो अशक्य आहे.  
दरवर्षी धरणो 1क्क् टक्के भरूनही मार्च महिन्यांत पाणी कपात करावी लागते. त्यामुळे महापालिकेने यंदापासून 31 जुलैऐवजी ऑगस्ट अखेर्पयत राखीव साठा ठेवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. त्यामुळे भविष्यात होणारी पाणी टंचाई व कपात टाळता येईल. त्यादृष्टीने वर्षेभर एकवेळ व पुरेसा पाणी पुरवठा सुरू ठेवण्यावर प्रशासन ठाम आहे.(प्रतिनिधी)
 
पुरवठय़ाचा लंपडाव 
प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या धरसोड वृत्तीमुळे  एकवेळ आणि दोनवेळ पाणी पुरवठा केला जात असल्याने वितरण व्यवस्था वारंवार विस्कळीत होत आहे. धरणातील पाणीसाठयाने तळ गाठल्याने जून महिन्यात एकवेळ पाणी देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पाऊस आणखीनच लांबल्याने जुलैच्या दुस-या आठवडयात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. पुन्हा 25 जुलै रोजी एकवेळ पाणी सुरू करण्यात आले. त्यानंतर पुन्हा ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात दोन वेळा पाणी सुरू करण्यात आले. तर पुन्हा 14 ऑगस्टला एक वेळ पाण्याचा निर्णय घेण्यात आला. वारंवार वितरण व्यवस्थेत बदल केल्याने पाणी पुरवठा यंत्रणोचा बिघाड होत असून, त्याचा त्रस सर्वसामान्यांना पुणोकरांना सहन करावा लागत आहे.
पुणोकरांचे पाणी आंध्राला कशाला 
शहराला पाणी पुरवठा करणारी धरणो 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे यापुढे या धरणांमध्ये पडणारा प्रत्येक थेंब नदीत व कालव्यात सोडून ध्यावा लागणार आहे. पुढचे उजनी धरण ही 1क्क् } भरले आहे त्यामुळे नदीत सोडलेले पाणी उजनी मध्ये ही साठवता येणार नाही व ते तेथून आंध्र मध्ये सोडावे लागणार आहे. म्हणजे पानशेत, खडकवासला धरणांचे पाणी थेट आंध्रप्रदेशला जाणार आहे. दुसरीकडे कालव्यातून पुणो जिल्हसाठी पाणी सोडणो सुरूच आहे, आणि पावसाळा संपेपयर्ंत ते सुरूच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हे जादा पाणी पुणोकरांना देऊन एकवेळ पाण्याची कपात मागे घ्यावी अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. तसेच  आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने हा निर्णय तत्काळ घ्यावा अशी मागणी मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.
 
राजकीय पक्ष तसेच स्वयंसेवी संस्थाच्या मागणीनुसार आयुक्तांनी बैठक बोलाविली होती. त्यात एकवेळ पाणी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. 
- व्ही.जी कुलकर्णी, 
पाणीपुरवठा विभाग प्रमुख