शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

PMC: गरज सरो, वैद्य मरो! आयुष डॉक्टरांना नियुक्त करण्यास पुणे महापालिकेची टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 13:04 IST

कोरोना काळात आयुषच्या डॉक्टरांनी जिवाची पर्वा न करता केले काम

राहुल शिंदे

पुणे : आयुष्य डॉक्टरांना शासनाच्या रिक्त जागांवर नियुक्त करण्याबाबत आयुष्य मंत्रालयाने निर्देश दिलेले आहेत. तसेच पुणे महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आठ महिन्यांपूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त जागांवर आयुष डॉक्टरांना सामावून घेण्यासंदर्भात ठराव झालेला असताना पुणे महापालिका प्रशासनाकडून मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे ‘गरज सरो वैद्य मरो’ अशी भूमिका पालिकेने घेतली आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोरोना महामारीच्या काळात एमबीबीएस डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून आयुष डॉक्टरांनी जिवाची पर्वा न करता हजारो रुग्णांचे प्राण वाचविले. या काळात अनेक डॉक्टरांना व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. कोरोनातून बरे झाल्यावर त्यांनी आपल्या सेवेत कोणताही खंड पडू दिला नाही. देशात एमबीबीएस डॉक्टरांची संख्या तुलनेने कमी असून, हे डॉक्टर खासगी रुग्णालयातच काम करणे अधिक पसंत करतात. शासनाच्या विविध पदांवर तुटपुंज्या वेतनावर काम करण्यास बरेच एमबीबीएस डॉक्टर तयार नसतात. त्यामुळे आयुषच्या बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, आदी डॉक्टरांना शासनाच्या पदांवर काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी आयुष्य डॉक्टरांच्या संघटनेकडून केली जात आहे.

कोरोना काळात एमबीबीएस डॉक्टरांनी केलेली सर्व कामे आयुष्य डॉक्टरांनी जबाबदारीने पार पाडली आहेत. मात्र, शासनाच्या विविध पदांवर आयुष डॉक्टरांना नियुक्त करण्याबाबत पालिका प्रशासन व राज्य शासन उदासीन आहे. महाराष्ट्र वगळता बिहार, उत्तर प्रदेश ,राजस्थान, काश्मीर, आदी राज्यांमध्ये डॉक्टरांना शासनाच्या विविध पदांवर नियुक्त केले जात आहे. त्यामुळे केवळ महामारीच्या काळात आयुष डॉक्टरांचा उपयोग करून घेतला गेला. आता रिक्त जागांवर नियुक्तीसाठी त्यांना शासनाच्या विविध नियमांची माहिती देऊन उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. कोरोना काळात शासनाची ही नियमावली कुठे गेली होती? कोरोना काळातील या डॉक्टरांची गरज संपली. त्यांना वापरून घेतले. मात्र, आता त्यांना डावलणे नीतिमत्तेला धरून आहे का? असा सवाल सर्वसाधारण सभेत डॉक्टरांसाठी ठराव मंजूर करून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdocterडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल